शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

corona virus : एक हजार तबलिगींनी दिली कोरोनाला मात, सरकारने घरी जायची दिली परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 19:39 IST

दिल्लीत निजामुद्दीन येथे हजारो तबलिगी राहत असल्याचे समोर आल्यानंतर देशभरात खळबळ माजली होती.

ठळक मुद्देदिल्लीमध्ये कोरोनाबाधित असलेल्या एक हजार तबलिगींनी कोरोनावर मात केली आहेज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी सूचना दिल्लीचे आरोग्य आणि गृहमंत्री सत्येंद्र जैन यांनी केली आहे.   दिल्लीमध्ये १३ ते २४ मार्चदरम्यान झालेल्या मरकजच्या कार्यक्रमाला सुमारे १६ हजार ५०० तबलिगी पोहोचले होते

नवी दिल्ली - कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा होऊन काही दिवस झाले असतानाच दिल्लीत निजामुद्दीन येथे हजारो तबलिगी राहत असल्याचे समोर आल्यानंतर देशभरात खळबळ माजली होती. दिल्लीतून हे तबलिगी देशातील विविध भागात गेल्याने कोरोनाचा फैलाव करण्यासाठी तबलिगींचे बेजबाबदार वर्तन कारणीभूत ठरल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान, दिल्लीमध्ये कोरोनाबाधित असलेल्या एक हजार तबलिगींनी कोरोनावर मात केली आहे. या आजारातून बरे झालेल्या तबलिगींना घरी जाऊ द्यावे, तसेच ज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी सूचना दिल्लीचे आरोग्य आणि गृहमंत्री सत्येंद्र जैन यांनी केली आहे.   

मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात दिल्लीतील निजामुद्दीन येथील मरकजमध्ये ४ हजारहून तबलिगी वास्तव्य करत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर या सर्व तबलिगींची तपासणी केली असता त्यापैकी बहुतांश जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले होते. या तबलिगींवर विविध ठिकाणी उपचार सुरू होते. आता यापैकी एक हजार तबलिगी कोरोनावर मात करून बरे झाले असून, त्यांना घरी जाण्याची परवानगी सरकारकडून देण्यात आली आहे.  

दरम्यान, देशात कोरोनाचा फैलाव करण्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून तबलिगी जमातीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे. तसेच विविध राज्यांमधील सरकारे आणि प्रशासनानेही कोरोनाच्या फैलावाचे खापर तबलिगींवर फोडले होते.  दरम्यान, मरकजचे संचालक मौलाना साद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.  

महत्त्वाच्या बातम्या

coronavirus: कोरोनामुळे संकटात रोजगार, या योजनेंतर्गत दोन वर्षे खात्यात पैसे जमा करणार मोदी सरकार

coronavirus: अजबच! या देशात माणसांसोबत बकरी आणि फळेही कोरोना पॉझिटिव्ह

भारतासाठी मोठी बातमी...कोरोनावरील ३० लसींची चाचणी वेगवेगळ्या टप्प्यांत; वैज्ञानिकांची मोदींना माहिती 

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये १३ ते २४ मार्चदरम्यान झालेल्या मरकजच्या कार्यक्रमाला सुमारे १६ हजार ५०० तबलिगी पोहोचले होते. दरम्यान, कोरोना संक्रमणाची माहिती मिळाल्यानंतर या तबलिगींनी देशातील विविध भागात क्वारेंटाईन करण्यात आले होते.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीIndiaभारत