शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

Corona vaccination: ग्रामस्थांनी कोरोनावरील लस नाकारली, जिल्हाधिकाऱ्यांनी गावची वीज कापली; रेशनही केले बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 08:37 IST

Corona vaccination in India: कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने गेल्या सव्वा दोन महिन्यांपासून देशात धुमाकूळ घातला आहे. आता ही लाट ओसरत असली तरी या लाटेचा मोठा फटका ग्रामीण भागाला बसला आहे.

ठळक मुद्देलसीकरण करण्यासाठी आरोग्य विभागाचे पथक आले असता या पथकाला ग्रामस्थांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागलाआरोग्य पथकाने घरोघरी जाऊन ग्रामस्थांना लस घेण्यासाठी येण्याचे आवाहन केले. मात्र तरीही ग्रामस्थांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाहीआता ग्रामस्थांनी लस घेण्यास नकार दिल्याने नाराज होऊन जिल्हाधिकाऱ्यांनी गावाचा वीजपुरवठाच कापल्याचा आरोप केला जात आहे

लखनौ - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने गेल्या सव्वा दोन महिन्यांपासून देशात धुमाकूळ घातला आहे. आता ही लाट ओसरत असली तरी या लाटेचा मोठा फटका ग्रामीण भागाला बसला आहे. उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यातील बीरपूर गावामध्येही कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला आहे. या गावातील अनेक नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  मात्र असे असूनही ग्रामस्थ कोरोनावरील लस घेण्यास नकार देत आहेत. (Corona vaccination in India) लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभागाचे पथक आले असता या पथकाला ग्रामस्थांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. दरम्यान, ग्रामस्थांनी लस घेण्यास नकार दिल्याने नाराज होऊन जिल्हाधिकाऱ्यांनी गावाचा वीजपुरवठाच कापल्याचा आरोप केला जात आहे. मात्र केवळ थकीत वीजबिल असलेल्यांचाच वीजपुरवठा कापण्यात आल्याचे स्पष्टीकरण अधिकाऱ्यांनी दिले आहे. तरीही लस न घेतल्यानेच वीज कापण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. ( Villagers refuse corona vaccine, SDM cuts off village electricity; Ration also stopped)

बीरपूर गावामध्ये बुधवारी ४५ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी कँम्प लावण्यात आला होता. त्यासाठी सकाळी १० वाजता आरोग्य विभागाचे पथक दाखल झाले होते. मात्र ग्रामस्थ लस घेण्यासाठी येतच नव्हते. त्यानंतर या पथकाने घरोघरी जाऊन ग्रामस्थांना लस घेण्यासाठी येण्याचे आवाहन केले. मात्र तरीही ग्रामस्थांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. 

त्यानंतर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत सांगण्यात आले. तेव्हा येथील एसडीएम देवेश गुप्ता यांच्यासह प्रभारी आरोग्य अधिकारी राम मिलन सिंह.परिहार, एडीओ पंचायत अरविंद राजपूत दाखल झाले. अधिकाऱ्यांनीसुद्धा घरोघरी जाऊन लोकांची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थांनी त्यांनाही धुडकावून लावले. त्यामुळे एसडीएमनी बीरपूर मधील वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले. तसेच गावातील रेशन पुरवठाही रोखला.

दरम्यान, ग्रामस्थांनी लस न घेतल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याचा आरोप केल्यानंतर अधिकाऱ्यांनीही स्पष्टीकरण दिले आहे. एडीएम गजेंद्र कुमार यांनी सांगितले की, ४५ वर्षांवरील व्यक्तींसाठी लसीकरण कँम्प लावण्यात आला होता. एसडीएम तिथे गेले असता ग्रामस्थ लसीकरणाबाबत नकारात्मक दिसत होते. ते लसीकरणाला विरोध करत होते. एसडीएम यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ते ऐकले नाहीत. तसेच लस न घेतल्याने वीज कापण्यात आल्याचा करण्यात आलेला दावा चुकीचा आहे. केवळ वीजबिल थकीत असलेल्यांचाच वीजपुरवठा कापण्यात आला आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशelectricityवीजHealthआरोग्य