शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
2
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
3
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
4
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
5
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
6
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत
7
Hyundai IPO: दिग्गज कार कंपनी आणणार देशातील सर्वात मोठा IPO, लिस्टिंगचा आहे प्लान
8
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
9
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
10
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
11
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
12
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
13
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
14
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
15
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
16
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
18
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
19
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
20
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या

पराजयानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह; प्रियांका गांधी आघाडी सांभाळणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2019 2:53 AM

विशेष म्हणजे ही बंडखोरी व कलह शांत करण्यासाठी अद्याप पक्षश्रेष्ठींपैकी कोणी पुढाकार घेतलेला नाही.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत फारच मोठा पराभव झाल्यानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह उफाळून आला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरुद्ध प्रदेश अध्यक्ष सचिन पायलट त्यांना पदावरून दूर करण्याच्या मोहिमेत आहेत. गेहलोत यांना आता कोणत्याही समुदायाचा पाया नसल्यामुळे त्यांच्या जागी पायलट यांची नियुक्ती करावी, अशी पायलट समर्थकांची मागणी आहे.पंजाबमध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांनी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्याविरुद्ध आघाडी उभारून बंडच केले आहे. तेलंगणामध्ये काँग्रेसचे १५ आमदार तेलंगण राष्ट्र समितीत प्रवेश करण्याच्या प्रयत्नांत आहेत, तर अंतर्गत कलहामुळे कर्नाटकातील कुमारस्वामी यांचे आघाडीचे सरकार संकटात आले आहे. विशेष म्हणजे ही बंडखोरी व कलह शांत करण्यासाठी अद्याप पक्षश्रेष्ठींपैकी कोणी पुढाकार घेतलेला नाही. त्याचे कारण म्हणजे पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनाम्याची तयारी दाखविल्यानंतर ते पक्षाच्या अंतर्गत प्रश्नांत सक्रिय नाहीत.

प्रियांका गांधी आघाडी सांभाळणार?पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी आघाडी सांभाळण्याच्या तयारीत आहेत. त्या लवकरच कार्यकर्ते व नेत्यांशी चर्चा करतील. त्यांची नजर आता २०२२ मध्ये उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर आहे. त्यासाठी त्या गट पातळीवर पक्ष बळकट करू पाहत आहेत, असे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेस