शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Karunanidhi Death Update: ...म्हणून करुणानिधींच्या समाधी स्थळावरुन होतोय वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 09:50 IST

Karunanidhi Death: द्रमुक आणि अण्णाद्रमुकमधील वाद कोर्टात 

चेन्‍नई: पाचवेळा तामिळनाडूचे मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या एम. करुणानिधी यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यविधीस्थळावरुन वाद सुरू आहे. करुणानिधी यांच्या दफनासाठी मरीना बीचवर जागा देण्यास राज्य सरकारनं असमर्थतता दर्शवली आहे. करुणानिधी यांचा दफनविधी मरीना बीचवर व्हावा, अशी मागणी द्रमुककडून करण्यात आली होती. त्यानंतर हा वाद मद्रास उच्च न्यायालयात गेला. सध्या या वादावर सुनावणी सुरू आहे. 

राहुल गांधींसह अनेकांकडून समर्थनराहुल गांधी, सीताराम येचुरी. डी. राजा यांच्यासह अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी द्रमुकच्या मागणीचं समर्थन केलं आहे. करुणानिधी यांचा दफनविधी मरीना बीचवर व्हावा, अशी मागणी काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी अण्णा द्रमुक सरकारकडे केली आहे. 'जयललिता यांच्याप्रमाणेच करुणानिधीदेखील तामिळ जनतेचा आवाज होते. त्यामुळे त्यांच्याही दफनविधीसाठी मरीना बीचवर जागा देण्यात यावी,' असं राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

एम. के. स्टॅलिन यांनी केली होती मागणीमरीना बीचवर पार्थिवांवर अत्यंसंस्कार केले जाऊ नयेत, यासाठी दाखल करण्यात आलेली एक जनहित याचिका मद्रास उच्च न्यायालयातून मागे घण्यात आल्यानं हा वाद सुरू झाला. करुणानिधी यांचा अंत्यविधी मरीना बीचवर व्हावा, यासाठी करुणानिधी यांचे पुत्र एम. के. स्टॅलिन यांनी मुख्यमंत्री पलानीस्वामी यांना पत्र लिहिलं होतं. करुणानिधी यांची प्रदीर्घ राजकीय कारकीर्द लक्षात घेता त्यांचा दफनविधी मरीना बीचवर व्हावा, अशी मागणी त्यांनी पत्रातून केली. 

स्टॅलिन यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेटस्टॅलिन यांनी वडिलांच्या निधनापूर्वी याबद्दल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मद्रास उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांमुळे आणि कायदेशीर अडचणींमुळे मरीना बीचवर अत्यंसंस्कार करण्याची परवानगी देऊ शकत नाही, अशा आशयाचं पत्रक सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलं होतं. करुणानिधी निधनावेळी मुख्यमंत्रीपदावर नव्हते. त्यामुळे त्यांच्या अंत्यविधीसाठी मरीना बीचवर जागा देण्यास सरकार इच्छुक नसल्याची चर्चादेखील तामिळनाडूमध्ये आहे.  

रामचंद्रन आणि जयललिता यांचा दफनविधी मरिना बीचवरमाजी मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन आणि त्यांच्या निकटवर्तीय जयललिता यांचा दफनविधी  मरीना बीचवर झाला होता. या दोघांची स्मारकंदेखील मरीना बीचवर आहेत. रामचंद्रन आणि जयललिता यांचा अण्णा द्रमुक पक्ष सध्या तामिळनाडूत सत्तेत आहे. हे दोन्ही नेते करुणानिधी यांचे कट्टर विरोधक होते. करुणानिधी यांच्या पक्षाचे संस्थापक अण्णादुराई यांचा दफननिधी मरीना बीचवर झाला होता. त्यावेळी ते मुख्यमंत्रीपदावर होते.  

टॅग्स :KarunanidhiकरुणानिधीTamilnaduतामिळनाडूRahul Gandhiराहुल गांधी