शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
3
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
4
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
5
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
6
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
7
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
8
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
10
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
11
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
12
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
13
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
14
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
15
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
16
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
17
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
18
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
19
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल
20
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?

दिल्ली नियंत्रणात; बिहार बंदला हिंसक वळण, ४0 जणांना घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 6:52 AM

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरुद्ध आंदोलन सुरूच। दिल्लीतील हिंसाचारप्रकरणी ४0 जणांना घेतले ताब्यात

नवी दिल्ली : नागरिकत्व कायद्याविरुद्ध आंदोलन सुरू असतानाच नवी दिल्लीत हळूहळू स्थिती पूर्वपदावर येत आहे. दिल्लीचा जुना भाग आणि सीमापुरीमध्ये सुरक्षा दलाला तैनात करण्यात आलेले आहे. जुन्या दिल्लीत दरियागंज आणि उत्तरपूर्व दिल्लीच्या सीमापुरीमध्ये शुक्रवारी दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. दरियागंज व्यापारी संघाचे सचिव मनीष सेठ यांनी सांगितले की, शनिवारी सकाळी या भागातील सर्व दुकाने उघडली आणि कोणतीही अशांतता नाही. शाहदरा जिल्ह्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, परिस्थिती नियंत्रणात आहे.

दगडफेक करणाºया ५ जणांना घेतले ताब्यातउत्तर पूर्व दिल्लीत आंदोलनादरम्यान दगडफेक केल्याच्या आरोपात पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेत अतिरिक्त पोलीस उपायुक्त रोहित राजबीर सिंह जखमी झाले होते.

शिक्षण क्षेत्रातील १००० जणांचे कायद्याला समर्थनदेशातील विविध विद्यापीठांतील, शिक्षण क्षेत्रातील १००० पेक्षा अधिक नागरिकांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला समर्थन देत एक निवेदन जारी केले आहे. यात राज्यसभा सदस्य स्वपन दासगुप्ता, आयआयएम शिलाँगचे अध्यक्ष शिशिर बजोरिया, नालंदा विद्यापीठाच्या कुलगुरू सुनैना सिंह, जेएनयूतील प्रोफेसर ऐनूल हसन, अभिजित अय्यर मित्रा, कंचन गुप्ता यांचा समावेश आहे.

दरियागंजमध्ये १५ जणांना अटकजुन्या दिल्लीच्या दरियागंजमध्ये आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारप्रकरणी १५ लोकांना अटक करण्यात आली आहे. दंगल करणे, पोलिसांच्या ड्यूटीमध्ये अडथळा आणण्यासाठी बळाचा वापर करणे आदी आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. पोलिसांनी सांगितले की, आंदोलकांनी शुक्रवारी सायंकाळी सुभाष मार्ग भागात एका उभ्या कारला आग लावली होती. या प्रकरणात आणखी काही लोकांना अटक होऊ शकते, असे पोलिसांनी सांगितले.भीम आर्मीच्या प्रमुखांना १४ दिवसांची कोठडीच्भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना शनिवारी जामा मशिदीच्या बाहेर ताब्यात घेण्यात आले. त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.च्आझाद म्हणाले की, आम्हाला बलिदान द्यावे लागेल जेणेकरून कायदा परत घेण्यात यावा. आम्ही हिंसाचाराचे समर्थन करीत नाही. आम्ही शुक्रवारी सकाळी मशिदीच्या आत बसलो होतो. आमचे लोक हिंसाचारात सहभागी नव्हते.मध्यप्रदेशात ३५ अटकेतच्मध्यप्रदेशातील जबलपूरमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनप्रकरणी पोलिसांनी ३५ लोकांना अटक केली आहे.च्शुक्रवारी झालेल्या हिंसाचारानंतर शहरातील काही भागांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दगडफेकीत २० पोलीस जखमी झाले होते. यातील चार जणांची प्रकृती गंभीर आहे. शहरातील गोहलपूर आणि हनुमानताल भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.‘ताब्यात घेण्यात आलेल्या लोकांना वकिलांना भेटू द्या’च्दरियागंजमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर ताब्यात घेण्यात आलेल्या ४० लोकांना त्यांच्या वकिलांना भेटू द्या, असे निर्देश दिल्लीच्या एका न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.च्ताब्यात घेण्यात आलेल्या नागरिकांमध्ये जे जखमी आहेत त्यांना उपचार उपलब्ध करून द्या, असे निर्देश देतानाच न्यायालयाने म्हटले आहे की, जर एखादा अल्पवयीन या आंदोलनात कथित स्वरूपात सहभागी असेल तरीही त्याला ताब्यात घ्यायला नको.च् त्याच्यावर कायद्यानुसारच कारवाई करायला हवी. त्यानंतर पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी ताब्यात घेण्यात आलेल्या ८ अल्पवयीनांना सोडून देण्यात आले आहे.