शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
4
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
5
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
6
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
7
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
8
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
9
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
10
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
11
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
12
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
13
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
14
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
15
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
16
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
17
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
18
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
19
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
20
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वृत्तपत्रांच्या वितरणात सतत येणारे अडथळे हा कायद्याने गुन्हा; देशाच्या वरिष्ठ विधिज्ञांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2020 06:31 IST

वितरणात अडथळे आणले गेल्यामुळे सार्वजनिक आरोग्याबद्दल अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली असताना लोकांना विश्वासार्ह माहिती मिळण्यात अडचणी येतात.

नवी दिल्ली : वृत्तपत्रांना अत्यावश्यक सेवेत समाविष्ट केले गेले असतानाही त्यांच्या वितरणात सतत येत असलेल्या अडथळ्यांबद्दल देशाच्या ज्येष्ठ विधिज्ञांनी काळजी व्यक्त केली आहे.

वितरणात अडथळे आणले गेल्यामुळे सार्वजनिक आरोग्याबद्दल अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली असताना लोकांना विश्वासार्ह माहिती मिळण्यात अडचणी येतात, एवढेच नव्हे तर अत्यावश्यक सेवा कायम राखण्याच्या कायद्याचेही ते उल्लंघन ठरते, असे त्यांचे म्हणणे आहे. या कठीण दिवसांत जबाबदार पत्रकारांच्या लोकांमध्ये घबराट निर्माण न करता बातम्या व लेख अस्तित्वासाठी आवश्यक आहेत, असे हरीश साळवे म्हणाले.

आजच्या युद्धजन्य परिस्थितीत आम्ही अदृश्य अशा शत्रूशी लढत असून, त्याच्याबद्दल आम्हाला फारच थोडी माहिती आहे. या परिस्थितीत माहिती व शत्रूविषयीची माहिती हेच आमच्यासाठी एकमेव शस्त्र आहे, असे साळवे म्हणाले.

अत्यावश्यक सेवेचे कवच ज्याला लाभते (येथे वृत्तपत्रे) त्या सेवेच्या वितरणात लॉकडाऊनच्या दिवसांत जर कोणी अडथळे आणले, तर त्याला वॉरंटशिवाय अटक होईल व एक वर्षापर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षाही.

समाजमाध्यमांच्या या दिवसांत नुसत्या चर्चा व प्रचारालाही अंतिम सत्याचा दर्जा मिळाला आहे. जबाबदार वृत्तपत्राने छापलेला शब्द ही विशेषत: आजच्या युद्धसदृश दिवसांत अत्यंत आवश्यक सेवा आहे. - हरीश साळवे (ज्येष्ठ विधिज्ञ)

वृत्तपत्राची प्रत लोकांना मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. चहाच्या गरम कपासोबत वृत्तपत्र चाळण्याचा आनंद काही वेगळाच.- अभिषेक मनू सिंघवी (ज्येष्ठ विधिज्ञ)

वृत्तपत्रांच्या वितरणावर कोणतेही निर्बंध नाहीत. त्यांचा समावेशच अत्यावश्यक सेवेत केला गेलेला आहे. त्यामुळे कोणीही त्याच्या वितरणात अडथळे आणू शकत नाही.- तुषार मेहता (सॉलिसिटर जनरल)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत