शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
2
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
3
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
4
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
5
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
6
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
7
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
8
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
9
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
10
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
11
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
12
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
13
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
14
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
15
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
18
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
19
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
20
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले

वृत्तपत्रांच्या वितरणात सतत येणारे अडथळे हा कायद्याने गुन्हा; देशाच्या वरिष्ठ विधिज्ञांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2020 06:31 IST

वितरणात अडथळे आणले गेल्यामुळे सार्वजनिक आरोग्याबद्दल अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली असताना लोकांना विश्वासार्ह माहिती मिळण्यात अडचणी येतात.

नवी दिल्ली : वृत्तपत्रांना अत्यावश्यक सेवेत समाविष्ट केले गेले असतानाही त्यांच्या वितरणात सतत येत असलेल्या अडथळ्यांबद्दल देशाच्या ज्येष्ठ विधिज्ञांनी काळजी व्यक्त केली आहे.

वितरणात अडथळे आणले गेल्यामुळे सार्वजनिक आरोग्याबद्दल अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली असताना लोकांना विश्वासार्ह माहिती मिळण्यात अडचणी येतात, एवढेच नव्हे तर अत्यावश्यक सेवा कायम राखण्याच्या कायद्याचेही ते उल्लंघन ठरते, असे त्यांचे म्हणणे आहे. या कठीण दिवसांत जबाबदार पत्रकारांच्या लोकांमध्ये घबराट निर्माण न करता बातम्या व लेख अस्तित्वासाठी आवश्यक आहेत, असे हरीश साळवे म्हणाले.

आजच्या युद्धजन्य परिस्थितीत आम्ही अदृश्य अशा शत्रूशी लढत असून, त्याच्याबद्दल आम्हाला फारच थोडी माहिती आहे. या परिस्थितीत माहिती व शत्रूविषयीची माहिती हेच आमच्यासाठी एकमेव शस्त्र आहे, असे साळवे म्हणाले.

अत्यावश्यक सेवेचे कवच ज्याला लाभते (येथे वृत्तपत्रे) त्या सेवेच्या वितरणात लॉकडाऊनच्या दिवसांत जर कोणी अडथळे आणले, तर त्याला वॉरंटशिवाय अटक होईल व एक वर्षापर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षाही.

समाजमाध्यमांच्या या दिवसांत नुसत्या चर्चा व प्रचारालाही अंतिम सत्याचा दर्जा मिळाला आहे. जबाबदार वृत्तपत्राने छापलेला शब्द ही विशेषत: आजच्या युद्धसदृश दिवसांत अत्यंत आवश्यक सेवा आहे. - हरीश साळवे (ज्येष्ठ विधिज्ञ)

वृत्तपत्राची प्रत लोकांना मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. चहाच्या गरम कपासोबत वृत्तपत्र चाळण्याचा आनंद काही वेगळाच.- अभिषेक मनू सिंघवी (ज्येष्ठ विधिज्ञ)

वृत्तपत्रांच्या वितरणावर कोणतेही निर्बंध नाहीत. त्यांचा समावेशच अत्यावश्यक सेवेत केला गेलेला आहे. त्यामुळे कोणीही त्याच्या वितरणात अडथळे आणू शकत नाही.- तुषार मेहता (सॉलिसिटर जनरल)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत