शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

'CM अरविंद केजरीवालांना जीवे मारण्याचा कट रचला जातोय', आतिशी यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 7:45 PM

आप नेत्या आणि दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी मार्लेन यांनी केजरीवालांच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे.

नवी दिल्ली: दिल्लीतील तिहार तुरुंगात कैद असलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जामीन मिळवण्यासाठी जाणूनबुजून साखर वाढवल्याचा दावा ED ने केला आहे. या दाव्यानंतर आता दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी मार्लेन यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, अरविंद केजरीवालांबद्दल ईडीने कोर्टात खोटी दावा केला. केजरीवालांना घरी बनवलेल्या जेवणाचा पुरवठा रोखण्यासाठी भारतीय जनता पक्ष ईडीच्या माध्यमातून हा कट रचला. केजरीवालांच्या जीवाला धोका पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा गंभीर आरोपही आतिशी यांनी यावेळी केला आहे.

संबधित बातमी- जामीन मिळवण्यासाठी केजरीवाल जाणूनबुजून गोड पदार्थ खात आहेत; ED चा कोर्टात दावा

आतिशी म्हणाल्या, सर्वांना माहित आहे की, अरविंद केजरीवाल यांना गेल्या 30 वर्षांपासून मधुमेह आहे आणि त्यांची साखर नियंत्रित करण्यासाठी दररोज 54 युनिट्स इन्सुलिन घेतात. कोणत्याही डॉक्टरांना विचारा की, एवढ्या प्रमाणात इन्सुलिनची मात्रा अत्यंत गंभीर मधुमेह असलेल्या व्यक्तीला दिली जाते. अरविंद केजरीवाल यांनी वारंवार विनंती करुनही त्यांना इन्सुलिन दिले जात नाही. केजरीवाल यांना त्यांच्या डॉक्टरांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग करायची असेल तर ईडी त्याला विरोध करते, कारण तुम्हा लोकांना केजरीवालांना मारायचे आहे. भाजप केजरीवालांना निवडणुकीत पराभूत करू शकले नाही, त्यामुळे त्यांचा जीव घेण्याचे षडयंत्र रचले जात आहे. 

आतिशी पुढे म्हणाले की, डॉक्टरांच्या सल्ल्याने केजरीवालांना तुरुंगात घरचे अन्न खाण्याची परवानगी मिळाली. पण, भाजप आपल्या तपास एजन्सी ईडीच्या मदतीने केजरीवालांना घरी बनवलेले अन्न खाण्यापासून रोखत आहे. केजरीवाल गोड चहा पीत आहेत, मिठाई खात आहेत, हे ईडीचे दावे पूर्ण खोटे आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच एरिथ्रिटॉल(स्वीटनर) टाकलेले चहा आणि मिठाई केजरीवालांना दिली जात आहे. 

इराणच्या ताब्यातून भारतीय क्रू मेंबरला मायदेशी आणले; जयशंकर म्हणाले-'ही मोदींची गॅरंटी...'

ईडीने आणखी एक दावा केला की, साखरेची पातळी वाढवण्यासाठी केजरीवाल केळी आणि चॉकलेट खात आहेत. मी ईडीला सांगू इच्छिते की, कोणत्याही मधुमेहाच्या डॉक्टरांशी बोला, प्रत्येकजण आपल्या रुग्णांना दोन गोष्टी सोबत ठेवण्यास सांगतो. एक केळी आणि दुसरे चॉकलेट. ईडीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाचा आदेश वाचला तर त्यात स्पष्टपणे लिहिले आहे की, केजरीवालांना तुरुंगात नेहमी कोणत्या ना कोणत्या प्रकारची टॉफी आणि केळी देणे आवश्यक आहे. ईडी केजरीवालांना दिले जाणारे घरचे जेवण थांबवण्यासाठी हे सर्व खोटे दावे करत आहे. घरातील जेवण बंद झाले, तर तिहार तुरुंगात त्यांना काय आणि केव्हा खायला दिले जाईल, हे कोणालाही कळणार नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयBJPभाजपा