शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

गढ़ जीतलो; ग्राम हारलो, ममता बॅनर्जींच्या पदरी पराभवच आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 07:22 IST

रात्री उशिरापर्यंत नंदीग्रामचे नाट्य 

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये किमान २०० जागा जिंकून सरकार  स्थापण्याचे भाजपचे प्रयत्न हाणून पाडताना मतदारांनी  बंगालची सत्ता पुन्हा ममता बॅनर्जी यांच्या हाती तर दिलीच, पण तृणमूल काँग्रेसच्या २१५ उमेदवारांना विजयी करताना भाजपला १०० जागाही मिळू दिल्या नाहीत. हा पराभव भाजपच्या जिव्हारी झोंबणारा असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप नेत्यांनी आता ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे. ममतांनी बंगालमध्ये विजय मिळवला असला तरी त्यांचा नंदीग्राममध्ये पराभव झाला. त्यामुळे ‘गढ़ जीतलो; ग्राम हारलो’ अशी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात व्यक्त हाेत हाेती.

गेल्या महिन्यात देशातील पाच राज्यांत विधानसभेच्या निवडणुका झाल्या. तसेच काही पोटनिवडणुकांचे निकाल रविवारी जाहीर झाले. त्यातून तामिळनाडू व पुदुच्चेरी वगळता कुठारही सत्ताबदल झालेला नाही. तामिळनाडूमध्ये सत्ताधारी अण्णा द्रमुकच्या पराभव  द्रमुक व काँग्रेस आघाडीने केला आहे. तिथे भाजपने अण्णा द्रमुकशी युती केली होती. द्रमुक व मित्रपक्षांना १४८ तर अण्णा द्रमुक व भाजप यांना मिळून ८३ जागांवर विजय मिळाला आहे. अत्यंत लोकप्रिय अभिनेते कमाल हासन हेही कोईम्बतूरमधून पराभूत झाले आहेत. त्यांच्या पक्षाचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. माजी मुख्यमंत्री स्व. करुणानिधी यांचे पुत्र एम. के. स्टॅलिन हे आता प्रथमच मुख्यमंत्री बनतील 

पुदुच्चेरीमध्ये मात्र एआयएनआरसी या मित्र पक्षाच्या साह्याने भाजपला सरकारमध्ये जाता येईल. तेथील एकूण ३० पैकी १३ जागा भाजप व मित्रपक्षाला मिळाल्या आहेत. त्यामुळे तिथे अपक्षांची मदत घ्यावी लागेल. तेथील काँग्रेसचे सरकार दोन महिन्यांपूर्वी बहुमताअभावी कोसळले होते. तेव्हाचे मुख्यमंत्री नारायण सामी यांना तर काँग्रेसने यंदा उमेदवारीही दिली नव्हती. गेली पाच वर्षे सत्तेत असलेल्या आसाममध्ये मात्र भाजपच पुन्हा सरकार स्थापन करेल. तेथील १२७ पैकी ७६ जागा भाजप व मित्र पक्षांनी जिंकल्या आहेत. तिथे आपण सत्तेत येऊ, असे काँग्रेसला वाटत होते. त्यासाठी स्थानिक पक्षांनाही सोबत घेतले होते. पण मतदारांनी काँग्रेस व मित्रपक्षांचे ४८ उमेदवारच विधानसभेत पाठविले आहेत. 

रात्री उशिरापर्यंत नंदीग्रामचे नाट्य नंदीग्राममध्ये सर्वप्रथम ममता बॅनर्जी यांचा १२००ने विजय झाल्याचे जाहीर करण्यात आले हाेते. मात्र, काही वेळाने भाजपचे उमेदवार शुभेंदू अधिकारी हे विजयी झाल्याची घाेषणा करण्यात आली. त्यानंतर तृणमूल काँग्रेसने ट्विट करून मतमाेजणी अद्याप सुरू असल्याचे सांगितले. त्यानंतर अखेर अधिकारी यांचा १९५६ मतांनी विजय झाल्याचे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले. हा प्रकार म्हणजे भाजपचा रडीचा डाव असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.  

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीElectionनिवडणूकWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१