शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
4
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
5
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
6
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
9
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
10
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
11
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
12
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
13
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
14
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
15
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
16
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
17
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
18
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
19
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
20
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं

उत्तर प्रदेशात सरकार स्थापन करणं हेच लक्ष्य- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 7:31 PM

लखनऊमध्ये राहुल गांधी, प्रियंका गांधींचा रोड शो

लखनऊ: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनीउत्तर प्रदेशकडे सर्वाधिक लक्ष केंद्रीत केलं आहे. लोकसभेच्या 80 जागा असलेला उत्तर प्रदेश सत्ता स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावतो. दिल्लीचा मार्ग उत्तर प्रदेशातून जात असल्यानं राहुल यांनी या राज्याची जबाबदारी बहिण प्रियंका आणि तरुण खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे सोपवली. यानंतर आज काँग्रेसनं लखनऊमध्ये मोठा रोड शो केला. यामध्ये राहुल गांधींसहप्रियंका गांधी आणि ज्योतिरादित्य सिंधिया उपस्थित होते. दिल्ली काबीज करण्यासाठी आधी उत्तर प्रदेश काबीज करा, असा स्पष्ट संदेश प्रियंका आणि ज्योतिरादित्य यांना राहुल यांनी दिला. याशिवाय येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी कामाला लागण्याच्या सूचनादेखील दिल्या. काँग्रेस पक्षाची सुरुवात उत्तर प्रदेशातून झाली. त्यामुळे या राज्यात पक्ष कमकुवत राहू शकत नाही, असं राहुल गांधी म्हणाले. त्यांनी लखनऊमधील रोड शोनंतर पक्ष कार्यालयाजवळ कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 'उत्तर प्रदेशात काँग्रेस मजबूत करण्याचं काम प्रियंका आणि ज्योतिरादित्य यांना देण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी झालीच पाहिजे, अशी सूचना त्यांना देण्यात आली आहे. याशिवाय विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचं सरकार स्थापन करणं आमचं लक्ष्य आहे. या जबाबदारीपासून एक इंचदेखील मागे हटू नका. प्रियंका, सिंधिया यांच्यासह काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी एक ध्येय समोर ठेवावं,' असं राहुल म्हणाले. काँग्रेस सर्व राज्यात, संपूर्ण देशात बॅकफूटवर नव्हे, तर फ्रंटफूटवर असेल, असंदेखील राहुल यांनी म्हटलं. आम्ही सर्व आव्हानांना निर्भिडपणे सामोरे जाऊ. कारण ही लढाई विचारधारेची आहे. एका बाजूला काँग्रेस आहे. प्रेम, बंधूभाव ही आमची विचारधारा आहे. देशाला जोडण्यासाठी आम्ही काम करतो. तर दुसऱ्या बाजूला भाजपा-आरएसएस आणि नरेंद्र मोदींची विचारसरणी आहे. देश तोडायचा, द्वेष निर्माण करायचा, देशाला कमकुवत करायचं हाच त्यांचा प्रयत्न आहे, अशी टीका राहुल यांनी केली. मोदींनी पाच वर्षात काय केलं, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. देशातला तरुण म्हणतोय, चौकीदार चोर है. चौकीदारानं एकालाही रोजगार दिला नाही. दरवर्षी 2 कोटी तरुणांना रोजगार देऊ, असं मोदी म्हणाले होते. मात्र त्यांनी राफेल डीलमधून अनिल अंबानींना लाभ मिळवून दिला. पंधरा उद्योगपतींचं साडे तीन लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं जातं. मात्र शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जात नाही, असं राहुल म्हणाले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी चौकीदार चोर है अशी घोषणा दिल्या.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीUttar Pradeshउत्तर प्रदेशPriyanka Gandhiप्रियंका गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ