शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

काँग्रेसचे ‘अब होगा न्याय’; भाजपचे ‘फिर एक बार मोदी सरकार’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 05:57 IST

महिला, शेतकरी, युवकांच्या कल्याणासाठी झटण्याचे आश्वासन; थीम साँग, व्हिडीओ, रिंग टोन आदी प्रचार साहित्य जारी

शीलेश शर्मा ।नवी दिल्ली : ‘अब होगा न्याय’ हेच आगामी लोकसभा निवडणुकांमधील काँग्रेसच्या प्रचाराचे घोषवाक्य असणार आहे. त्याचा संबंध केवळदेशातील सर्वात गरीब कुटुंबांना वर्षाला ७२ हजार रुपयांची मदत देण्यापुरताच नाही, तर युवकांसाठी रोजगारांच्या संधी निर्माण करणे, कृषिमालाला योग्य भाव मिळवून देणे, महिलांच्या सुरक्षेची काळजी घेणे अशा अनेक बाबींशी आहे. काँग्रेसच्या प्रचार समितीचे अध्यक्ष आनंद शर्मा यांनी हे घोषवाक्य रविवारी जाहीर केले. स्टार्टअपसाठी कोणत्याही परवानगीची गरज नाही, मोफत आरोग्यनिदान व उपचार, एका वर्षात २४ लाख रोजगाराच्या संधी निर्माण करणार, १२वीपर्यंत मोफत शिक्षण, महिलांना ३३ टक्के आरक्षण, सुलभ जीएसटी पद्धती ही काँग्रेसची आश्वासने नमूद केलेली पोस्टर लावलेले हजारो ट्रक देशभर प्रचारासाठी फिरविण्यात येणार आहेत. 

‘हिंदुस्थान को न्याय दिलायेंगे, काँग्रेस की सरकार बनायेंगे’असा नाराही प्रचारात दिला जाईल. केवळ ट्रकच्याच नव्हे, तर रेडिओ, वृत्तपत्रे, समाजमाध्यमे यांच्याद्वारेही काँग्रेस आक्रमक प्रचार करणार आहे.प्रचारगीतांत बदलकाँग्रेसच्या प्रचारमोहिमेची आखणी सिल्व्हर पुश या संस्थेने केली आहे. लोकसभा काँग्रेसची प्रचारगीते कवी जावेद अख्तर व निखिल अडवाणी यांनी लिहिली आहे. गीतांतील काही उल्लेखांबद्दल आयोगाने आक्षेप घेतले होते. त्यात गीतांमध्ये योग्य ते बदल काँग्रेसकडून केले आहेत.गेल्या पाच वर्षांतील कामगिरीच्या जोरावर पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना सत्तेवर आणण्याचे मतदारांना आवाहनकरणे, हा आमच्या प्रचाराचा मुख्य केंद्रबिंदू असेल, असे भाजपने रविवारी जाहीर केले. पक्षाचा निवडणूक जाहीरनामा कदाचित सोमवारी प्रसिद्ध केला जाईल, असे संकेतही पक्षाने दिले.केंद्रीय वित्तमंत्री व पक्षाचे प्रचार विभागाचे प्रमुख अरुण जेटली यांनी एका पत्रकार परिषदेत आगामी निवडणुकीत ‘फिर एकबार मोदी सरकार’ ही पक्षाच्या प्रचाराची टॅगलाइन असेल, असे सांगितले. जेटली यांनी पक्षाचे ‘थीम साँग’ व दृष्य प्रचाराचेप्रमुख साहित्य, तसेच प्रचारासाठी तयार केलेले व्हिडीओही जारी केले. याखेरीज मोबाइलवर रिंगटोन म्हणून वापरता येईल, असा छोटेखानी प्रचारी संदेशही पक्षाने तयार केला आहे.‘फिर से मोदी सरकार बनाते है, फिरसे कमल खिलाते है’, हेपक्षाचे प्रचारातील ‘थीम साँग,’ असेल असेही जेटली यांनी सांगितले. ‘आम्हाला ११ खेळाडू आणि ४० कर्णधार असलेले नव्हे, तर एकच कर्णधार असलेले सरकार हवे आहे,’ असे जेटली म्हणाले. भाजपने प्रचाराचे साहित्य बनविण्याचे काम एजन्सीला न देता ‘इन हाउस’ पद्धतीनेच केले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपा