शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

"काँग्रेसच्या शाळेत शिकून तुम्ही पंतप्रधान झालात", मल्लिकार्जुन खर्गेंचे PM मोदींवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2023 18:05 IST

"मोदी-शहा लंडनमध्ये शिकायला गेले नव्हते, काँग्रेसने उभारलेल्या शाळेत शिकूनच मंत्री झाले."

Congress vs BJP:काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) छत्तीसगड दौऱ्यावर आहेत. यावेळी जंजगीर चंपा येथे आयोजित “भरोसे का संमेलन” कार्यक्रमातून मोदी सरकारवर (Modi Govt) जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी (Narendra Modi) म्हणतात काँग्रेसने 70 वर्षांत काय केलं? काँग्रेसनं उघडलेल्या शाळेतच मोदी आणि शहांनी (Amit Shah) शिक्षण घेऊन आमदार, खासदार, मंत्री आणि आता पंतप्रधान झाले आहेत," अशी टीका त्यांनी यावेळी केली. 

मोदी मणिपूरबाबत काहीच बोलत नाहीतते पुढे म्हणाले की, "नरेंद्र मोदींना देशाचे नंबर वन नेते म्हटले जाते, पण ते संसदेत मणिपूरवर काहीही बोलत नाहीत. मणिपूरमध्ये 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, 500 हून अधिक लोक जखमी आहेत. 5 हजारांहून अधिक घरे जळून खाक झाली आहेत. देशाच्या पंतप्रधानांनी यावर बोलावं, अशी आमची इच्छा आहे. राहुल गांधी तिथे गेले, अनेकांना भेटले. तिथली परिस्थिती त्यांनी माध्यमांसमोर आणली. नरेंद्र मोदी नुसती नाटकं करतात, ते चुकून नाटक कंपनीऐवजी संसदेत आले असावेत," असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला. 

मोदी-शहांनी लंडनमध्ये शिक्षण घेतलंय का?"काँग्रेसने 70 वर्षात काय केलं, असा प्रश्न भाजपवाले विचारतात. मोदी आणि शहा लंडनमध्ये शिकायला गेले नव्हते, त्यांनी काँग्रेसने सुरू केलेल्या शाळेतच शिक्षण घेतले आणि ते आम्हाला विचारतात, आम्ही 70 वर्षांत काय केलं. तुम्हाला शिकवलं, मंत्री-मुख्यमंत्री आणि आता पंतप्रधान केलं. मोदी आल्यानंतर वीज, एम्स, भिलाई स्टील प्लांट, शाळा बांधल्या असतील. मोदी येण्यापूर्वी देशात काहीच नव्हतं ना...आम्ही ज्या गोष्टी उभारल्या, त्या ते विकून खाण्याचे काम भाजप आता करत आहे," अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

बीजेपी फक्त 'राम भरोसे' अन् काँग्रेस 'काम भरोसे'खर्गे पुढे म्हणतात, काँग्रेस फक्त 'राम भरोसे' नाही, तर 'काम भरोसे' आहे. आम्ही जनतेपर्यंत पोहोचतो आणि त्यांची कामे करतोत. 15 लाख खात्यात येणार, 2 कोटी नोकऱ्या दरवर्षी देणार...पंतप्रधान अजून किती खोटं बोलणार? जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी आणि इतर नेत्यांनी देशासाठी काय केलं, ते जनता कधीच विसरणार नाही. भाजपला जिंकण्याचा विश्वास नाही, म्हणूनच ईडी, आयटी, सीबीआईची भीती दाखवत आहेत."

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेAmit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा