शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

ईशान्य भारतात काँग्रेसच्या मतांची टक्केवारी घसरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2018 14:04 IST

मेघालय, त्रिपुरा, नागालँडमध्ये काँग्रेसचे सर्वात जास्त नुकसान झाल्याचे दिसून येते.

नवी दिल्ली: २०१४ नंतर काँग्रेस पक्ष पंजाब आणि काही पोटनिवडणुकांचे अपवाद वगळता अनेक निवडणुकांमध्ये पराभूत झाला आहे. नुकत्याच ईशान्य भारतात झालेल्या निवडणुकांमध्ये नागालँड आणि त्रिपुरामध्ये काँग्रेसला एकही जागा मिळवण्यात यश आले नाही तर मेघालयमध्ये काँग्रेस सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष झाला असला तरी मागील विधानसभेपेक्षा त्यांचे सदस्य घटले आहेत. घटत्या जागांबरोबरच काँग्रेसला मिळणाऱ्या मतांची टक्केवारीसुद्धा ईशान्य भारतात घटल्याचे अभ्यासातून स्पष्ट होत आहे.  मेघालय , त्रिपुरा, आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड येथे काँग्रेसपक्षाला मिळणार्या मतांच्या टक्केवारीत २०१४ नंतर १३ टक्क्यांनी घट झाली आहे. काँग्रेसची मतांची ट्ककेवारी पूर्वी ३८.१% होती तो २४.७ टक्क्यांनी झाली आहे. तसेच विजयी झालेल्या जागांची सरासरी जवळपास निम्मी म्हणजे ३४.८ वरुन १९.५ टक्के इतकी झाली आहे. 

२०१४ साली केंद्रात सत्तेत आल्यावर भारतीय जनता पार्टीला मात्र ईशान्य भारतात अच्छे दिन आले आहेत. या पक्षाच्या मतांच्या टक्केवारीत ईशान्य भारतात २३% इतकी वाढ झाली आहे. भाजपाला मिळणार्या मतांची ट्ककेवारी ३.९% इतकी होती ती आता २७% झाली आहे. भाजपाची विजयी होणार्या जागांची सरासरी १.५ वरुन २३.५ वर पोहोचली आहे यावरुन २००९-२०१४ या लोकसभेच्या पाच वर्षांपेक्षा २०१४-२०१९ या लोकसभेच्या काळात भाजपाला ईशान्य भारतात मोठे यश मिळाल्याचे दिसून येते. मिझोरममध्ये या वर्षाच्या अखेरीस निवडणुका होत आहेत तेव्हा हे दोन्ही पक्ष पुन्हा एकमेकांच्या समोर येतील.

मेघालय, त्रिपुरा, नागालँडमध्ये काँग्रेसचे सर्वात जास्त नुकसान झाल्याचे दिसून येते. मतांच्या टक्केवारीत काँग्रेस गेल्या विधानसभेच्या वेळेस त्रिपुरात माकपानंतर दुसऱ्या क्रमांकावर होता. आता मात्र त्रिपुरात काँग्रेसला केवळ १.८% मते मिळाली आहेत. २०१३ सालच्या निवडणुकीत काँग्रेसला ३४.७% मते मिळाली होती.

टॅग्स :Northeast Election Results 2018ईशान्य भारत निवडणूक निकाल 2018congressकाँग्रेसTripura Election Results 2018त्रिपुरा निवडणूक निकाल 2018