शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
2
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
3
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
4
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
5
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
6
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
7
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
8
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
9
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
10
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
11
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
12
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
13
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
14
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
15
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
16
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
17
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
18
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
19
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
20
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू

ईशान्य भारतात काँग्रेसच्या मतांची टक्केवारी घसरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2018 14:04 IST

मेघालय, त्रिपुरा, नागालँडमध्ये काँग्रेसचे सर्वात जास्त नुकसान झाल्याचे दिसून येते.

नवी दिल्ली: २०१४ नंतर काँग्रेस पक्ष पंजाब आणि काही पोटनिवडणुकांचे अपवाद वगळता अनेक निवडणुकांमध्ये पराभूत झाला आहे. नुकत्याच ईशान्य भारतात झालेल्या निवडणुकांमध्ये नागालँड आणि त्रिपुरामध्ये काँग्रेसला एकही जागा मिळवण्यात यश आले नाही तर मेघालयमध्ये काँग्रेस सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष झाला असला तरी मागील विधानसभेपेक्षा त्यांचे सदस्य घटले आहेत. घटत्या जागांबरोबरच काँग्रेसला मिळणाऱ्या मतांची टक्केवारीसुद्धा ईशान्य भारतात घटल्याचे अभ्यासातून स्पष्ट होत आहे.  मेघालय , त्रिपुरा, आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड येथे काँग्रेसपक्षाला मिळणार्या मतांच्या टक्केवारीत २०१४ नंतर १३ टक्क्यांनी घट झाली आहे. काँग्रेसची मतांची ट्ककेवारी पूर्वी ३८.१% होती तो २४.७ टक्क्यांनी झाली आहे. तसेच विजयी झालेल्या जागांची सरासरी जवळपास निम्मी म्हणजे ३४.८ वरुन १९.५ टक्के इतकी झाली आहे. 

२०१४ साली केंद्रात सत्तेत आल्यावर भारतीय जनता पार्टीला मात्र ईशान्य भारतात अच्छे दिन आले आहेत. या पक्षाच्या मतांच्या टक्केवारीत ईशान्य भारतात २३% इतकी वाढ झाली आहे. भाजपाला मिळणार्या मतांची ट्ककेवारी ३.९% इतकी होती ती आता २७% झाली आहे. भाजपाची विजयी होणार्या जागांची सरासरी १.५ वरुन २३.५ वर पोहोचली आहे यावरुन २००९-२०१४ या लोकसभेच्या पाच वर्षांपेक्षा २०१४-२०१९ या लोकसभेच्या काळात भाजपाला ईशान्य भारतात मोठे यश मिळाल्याचे दिसून येते. मिझोरममध्ये या वर्षाच्या अखेरीस निवडणुका होत आहेत तेव्हा हे दोन्ही पक्ष पुन्हा एकमेकांच्या समोर येतील.

मेघालय, त्रिपुरा, नागालँडमध्ये काँग्रेसचे सर्वात जास्त नुकसान झाल्याचे दिसून येते. मतांच्या टक्केवारीत काँग्रेस गेल्या विधानसभेच्या वेळेस त्रिपुरात माकपानंतर दुसऱ्या क्रमांकावर होता. आता मात्र त्रिपुरात काँग्रेसला केवळ १.८% मते मिळाली आहेत. २०१३ सालच्या निवडणुकीत काँग्रेसला ३४.७% मते मिळाली होती.

टॅग्स :Northeast Election Results 2018ईशान्य भारत निवडणूक निकाल 2018congressकाँग्रेसTripura Election Results 2018त्रिपुरा निवडणूक निकाल 2018