शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

ईशान्य भारतात काँग्रेसच्या मतांची टक्केवारी घसरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2018 14:04 IST

मेघालय, त्रिपुरा, नागालँडमध्ये काँग्रेसचे सर्वात जास्त नुकसान झाल्याचे दिसून येते.

नवी दिल्ली: २०१४ नंतर काँग्रेस पक्ष पंजाब आणि काही पोटनिवडणुकांचे अपवाद वगळता अनेक निवडणुकांमध्ये पराभूत झाला आहे. नुकत्याच ईशान्य भारतात झालेल्या निवडणुकांमध्ये नागालँड आणि त्रिपुरामध्ये काँग्रेसला एकही जागा मिळवण्यात यश आले नाही तर मेघालयमध्ये काँग्रेस सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष झाला असला तरी मागील विधानसभेपेक्षा त्यांचे सदस्य घटले आहेत. घटत्या जागांबरोबरच काँग्रेसला मिळणाऱ्या मतांची टक्केवारीसुद्धा ईशान्य भारतात घटल्याचे अभ्यासातून स्पष्ट होत आहे.  मेघालय , त्रिपुरा, आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड येथे काँग्रेसपक्षाला मिळणार्या मतांच्या टक्केवारीत २०१४ नंतर १३ टक्क्यांनी घट झाली आहे. काँग्रेसची मतांची ट्ककेवारी पूर्वी ३८.१% होती तो २४.७ टक्क्यांनी झाली आहे. तसेच विजयी झालेल्या जागांची सरासरी जवळपास निम्मी म्हणजे ३४.८ वरुन १९.५ टक्के इतकी झाली आहे. 

२०१४ साली केंद्रात सत्तेत आल्यावर भारतीय जनता पार्टीला मात्र ईशान्य भारतात अच्छे दिन आले आहेत. या पक्षाच्या मतांच्या टक्केवारीत ईशान्य भारतात २३% इतकी वाढ झाली आहे. भाजपाला मिळणार्या मतांची ट्ककेवारी ३.९% इतकी होती ती आता २७% झाली आहे. भाजपाची विजयी होणार्या जागांची सरासरी १.५ वरुन २३.५ वर पोहोचली आहे यावरुन २००९-२०१४ या लोकसभेच्या पाच वर्षांपेक्षा २०१४-२०१९ या लोकसभेच्या काळात भाजपाला ईशान्य भारतात मोठे यश मिळाल्याचे दिसून येते. मिझोरममध्ये या वर्षाच्या अखेरीस निवडणुका होत आहेत तेव्हा हे दोन्ही पक्ष पुन्हा एकमेकांच्या समोर येतील.

मेघालय, त्रिपुरा, नागालँडमध्ये काँग्रेसचे सर्वात जास्त नुकसान झाल्याचे दिसून येते. मतांच्या टक्केवारीत काँग्रेस गेल्या विधानसभेच्या वेळेस त्रिपुरात माकपानंतर दुसऱ्या क्रमांकावर होता. आता मात्र त्रिपुरात काँग्रेसला केवळ १.८% मते मिळाली आहेत. २०१३ सालच्या निवडणुकीत काँग्रेसला ३४.७% मते मिळाली होती.

टॅग्स :Northeast Election Results 2018ईशान्य भारत निवडणूक निकाल 2018congressकाँग्रेसTripura Election Results 2018त्रिपुरा निवडणूक निकाल 2018