शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अमेठीत काँग्रेसला मोठा झटका, स्मृती इराणींच्या उपस्थितीत विकास अग्रहरी यांचा भाजपात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 14:53 IST

Lok Sabha Elections 2024 : विकास अग्रहरी यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

अमेठी : लोकसभा निवडणुकीपूर्वी अमेठीतकाँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे प्रदेश सहसंयोजक विकास अग्रहरी यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. केंद्रीय मंत्री आणि खासदार स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत भाजपा जिल्हाध्यक्षांनी विकास यांचा पक्षात समावेश केला. युवा वर्गात मजबूत पकड असलेले विकास अग्रहरी यांची जिल्ह्यात दमदार वक्ता म्हणून ओळख आहे. विकास अग्रहरी यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी २६ एप्रिलनंतर अमेठीत येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत, तर दुसरीकडे अमेठीतील काँग्रेस दिवसेंदिवस कमकुवत होत चालली आहे. अमेठी लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षांतराची प्रक्रिया सुरूच आहे. विकास अग्रहरी यांचा केंद्रीय मंत्री आणि खासदार स्मृती इराणी यांच्या निवासस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राम प्रसाद मिश्रा यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला. जगदीशपूर विधानसभेच्या राणीगंज बाजारपेठेतील रहिवासी विकास अग्रहरी हे खंबीर प्रवक्ते म्हणून ओळखले जात होते. 

भाजपाचे जिल्हा प्रवक्ते चंद्रमौली सिंह म्हणाले की, अमेठीतील सर्व सामान्य जनता स्मृती इराणी यांच्यासोबत आहे. गेल्या १० वर्षात स्मृती इराणी यांनी अमेठीशी बांधलेले नाते दिवसेंदिवस अधिक घट्ट होत आहे. यामुळेच लोक आता काँग्रेस सोडून भाजपामध्ये येत आहेत. दरम्यान, भाजपाचे सदस्यत्व स्वीकारताना विकास अग्रहरी म्हणाले की, स्मृती इराणी यांच्या नेतृत्वाखाली अमेठीचा प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने विकास होत आहे.

हायकमांड जो काही निर्णय घेईल, तो मला मान्य - राहुल गांधीभाजपा नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याविरोधात उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हायकमांड जो काही निर्णय घेईल, तो मला मान्य असेल, असे राहुल गांधी यांनी बुधवारी सांगितले आहे. दरम्यान,राहुल गांधी यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील अमेठीमधून निवडणूक लढवली होती. मात्र अमेठीमधून त्यांचा स्मृती इराणी यांनी पराभव केला होता. तर राहुल गांधी हे वायनाडमधून निवडून आले होते. 

अमेठीबाबत काँग्रेसचा अद्याप सस्पेंस  यंदाच्या निवडणुकीत सुद्धा काँग्रेसने राहुल गांधींना वायनाडमधून उमेदवारी दिली आहे. मात्र अमेठीबाबत अद्याप सस्पेंस कायम आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींच्या पराभवापूर्वी अमेठी ही जागा काँग्रेसचा बालेकिल्ला मानली जात होती. कारण राहुल गांधी यांनी २००४, २००९ आणि २०१४ मध्ये या जागेवरून लोकसभा निवडणूक जिंकली होती. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत अमेठीतून राहुल गांधींना उमेदवारी दिली जाऊ शकते, असेही म्हटले जात आहे.

टॅग्स :BJPभाजपाamethi-pcअमेठीcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Uttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४Smriti Iraniस्मृती इराणीRahul Gandhiराहुल गांधी