शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

अमेठीत काँग्रेसला मोठा झटका, स्मृती इराणींच्या उपस्थितीत विकास अग्रहरी यांचा भाजपात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 14:53 IST

Lok Sabha Elections 2024 : विकास अग्रहरी यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

अमेठी : लोकसभा निवडणुकीपूर्वी अमेठीतकाँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे प्रदेश सहसंयोजक विकास अग्रहरी यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. केंद्रीय मंत्री आणि खासदार स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत भाजपा जिल्हाध्यक्षांनी विकास यांचा पक्षात समावेश केला. युवा वर्गात मजबूत पकड असलेले विकास अग्रहरी यांची जिल्ह्यात दमदार वक्ता म्हणून ओळख आहे. विकास अग्रहरी यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी २६ एप्रिलनंतर अमेठीत येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत, तर दुसरीकडे अमेठीतील काँग्रेस दिवसेंदिवस कमकुवत होत चालली आहे. अमेठी लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षांतराची प्रक्रिया सुरूच आहे. विकास अग्रहरी यांचा केंद्रीय मंत्री आणि खासदार स्मृती इराणी यांच्या निवासस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राम प्रसाद मिश्रा यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला. जगदीशपूर विधानसभेच्या राणीगंज बाजारपेठेतील रहिवासी विकास अग्रहरी हे खंबीर प्रवक्ते म्हणून ओळखले जात होते. 

भाजपाचे जिल्हा प्रवक्ते चंद्रमौली सिंह म्हणाले की, अमेठीतील सर्व सामान्य जनता स्मृती इराणी यांच्यासोबत आहे. गेल्या १० वर्षात स्मृती इराणी यांनी अमेठीशी बांधलेले नाते दिवसेंदिवस अधिक घट्ट होत आहे. यामुळेच लोक आता काँग्रेस सोडून भाजपामध्ये येत आहेत. दरम्यान, भाजपाचे सदस्यत्व स्वीकारताना विकास अग्रहरी म्हणाले की, स्मृती इराणी यांच्या नेतृत्वाखाली अमेठीचा प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने विकास होत आहे.

हायकमांड जो काही निर्णय घेईल, तो मला मान्य - राहुल गांधीभाजपा नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याविरोधात उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हायकमांड जो काही निर्णय घेईल, तो मला मान्य असेल, असे राहुल गांधी यांनी बुधवारी सांगितले आहे. दरम्यान,राहुल गांधी यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील अमेठीमधून निवडणूक लढवली होती. मात्र अमेठीमधून त्यांचा स्मृती इराणी यांनी पराभव केला होता. तर राहुल गांधी हे वायनाडमधून निवडून आले होते. 

अमेठीबाबत काँग्रेसचा अद्याप सस्पेंस  यंदाच्या निवडणुकीत सुद्धा काँग्रेसने राहुल गांधींना वायनाडमधून उमेदवारी दिली आहे. मात्र अमेठीबाबत अद्याप सस्पेंस कायम आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींच्या पराभवापूर्वी अमेठी ही जागा काँग्रेसचा बालेकिल्ला मानली जात होती. कारण राहुल गांधी यांनी २००४, २००९ आणि २०१४ मध्ये या जागेवरून लोकसभा निवडणूक जिंकली होती. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत अमेठीतून राहुल गांधींना उमेदवारी दिली जाऊ शकते, असेही म्हटले जात आहे.

टॅग्स :BJPभाजपाamethi-pcअमेठीcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Uttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४Smriti Iraniस्मृती इराणीRahul Gandhiराहुल गांधी