शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं; काँग्रेसचं मोदींना प्रत्युत्तर, फोटो ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 11:00 IST

Congress Slams Narendra Modi : भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेसने आता नरेंद्र मोदींना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत निशाणा साधला आहे.

स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सशक्त, भ्रष्टाचारमुक्त आणि विकसित देशाच्या निर्माणाचा वज्रनिर्धार व्यक्त केला. २०४७ पर्यंत देशाला विकसित राष्ट्र म्हणून ओळख निर्माण करून द्यायची असून त्यासाठी प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि निष्पक्षपात या त्रिसूत्रीचा अवलंब करणे गरजेचे असल्याच्या मुद्द्यावर पंतप्रधानांनी भर दिला. तसेच भ्रष्टाचार, घराणेशाही आणि लांगूलचालन या तीन वाईट प्रवृत्तींमुळे देशाचा विकास खोळंबला होता, असा दावाही मोदी यांनी केला. यावेळी त्यांनी काँग्रेसला देखील टोला लगावला. 

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेसने आता नरेंद्र मोदींना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत निशाणा साधला आहे. "मोदीजी भ्रष्टाचारावर बोलत होते..." असं म्हणत काही नेत्यांचे फोटो ट्विट केले आहेत. यामध्ये अजित पवार, छगन भुजबळ, नारायण राणे, हसन मुश्रिफ यांच्यासह जय पांडा, हिमंता बिश्व सरमा, सुवेंदु अधिकारी, शिवराज सिंह चौहान, बीएस बोम्मई, रघुवर दास, पेमा खांडू यांचे फोटो देखील आहेत.

पंतप्रधानांनी देशवासीयांमध्ये एक मजबूत राष्ट्रनिर्मितीची पूरेपूर क्षमता असून केवळ भ्रष्टाचार, घराणेशाहीचे राजकारण आणि लांगूलचालन हे या मार्गावरील मुख्य अडथळे होते. गेल्या ७५ वर्षांत काही विकृती समाजात निर्माण झाल्या असून त्यांचा समूळ नायनाट करणे हे आपल्या सरकारचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले.

परिवारवाद आणि घराणेशाही हे सामाजिक न्यायाच्या प्रतिभेचे शत्रू आहेत, ते गरीबांची क्षमता नाकारतात, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. म्हणूनच या देशातील लोकशाहीच्या बळकटीसाठी कुटुंबवादापासून मुक्ती मिळणे आवश्यक आहे. सर्वजन हिताचा आणि सर्वजन सुखाचा हक्क प्रत्येकाला मिळायला हवा. त्यामुळे सामाजिक न्यायाचीही गरज आहे. तुष्टीकरणाने सामाजिक न्यायाची सर्वात मोठी हानी केली आहे. कोणी सामाजिक न्याय नष्ट केला असेल, तर या तुष्टीकरणाच्या विचारसरणीने, तुष्टीकरणाच्या राजकारणाने, तुष्टीकरणाच्या योजनांनी सामाजिक न्यायाचा घात केला आहे. भ्रष्टाचार हा विकासाचा सर्वात मोठा शत्रू आहे, असे मोदी म्हणाले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसCorruptionभ्रष्टाचार