शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

हात बदलेगा हालात.. जम्मू काश्मीरसाठी काँग्रेसचा जाहीरनामा; महिला, युवांसाठी विशेष आश्वासने

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 23:47 IST

महिलांना दरमहा ३०००, शेतकऱ्यांना दरमहा ४०००... वाचा कुणाला काय-काय?

Jammu Kashmir Election, Congress Manifesto: जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. काँग्रेसने या जाहीरनाम्याला 'अब बदलेगा हालात' असे नाव दिले आहे. काँग्रेस नेते पवन खेडा आणि तारिक हमीद कारा यांनी जाहीरनाम्याचे वाचन करताना सांगितले की, गेल्या १० वर्षांपासून अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की काश्मिरी जनतेला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला आहे. पण आता सर्व समस्या संपण्याची वेळ आली आहे. आमच्याकडे टीम आहेत. आम्ही त्यांच्यामार्फत इनपूट गोळा केले आहेत आणि आम्ही त्यालाच लोकांचा जाहीरनामा म्हणतो.

पवन खेडा पुढे म्हणाले की, लोकांना त्यांच्या व्यथा मांडायला कोणीच नाही. कारण इथे थेट दिल्लीची सत्ता आहे. काश्मीर हे स्वप्नांचे कब्रस्तान बनले आहे. जाहीरनाम्याबाबत बोलताना ते म्हणाले की, हा दस्तऐवज केवळ आश्वासनांचा ढीग नाही, तर आम्ही अधिकारांवरही भर देऊन बोलतो. कारण संपूर्ण राज्यघटना अधिकार आणि कर्तव्यांवर आधारित आहे. जाहीरनामा प्रसिद्ध करताना पक्षाने रोजगार, महिला आणि प्रशासनाबाबत अनेक मोठ्या घोषणा केल्यात.

महिलांसाठी घोषणा

पक्षाने जाहीरनाम्यात महिलांसाठी अनेक आश्वासने दिली आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यास ‘महिला सन्मान योजने’अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबातील महिला प्रमुखांना दरमहा ३,००० रुपये दिले जातील. 'सखी शक्ती' अंतर्गत प्रत्येक महिलेला बचत गटाकडून ५ लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाईल. यासोबतच सर्व पोलीस ठाण्यात महिला पोलीस सेल स्थापन करण्यात येतील.

रोजगारासंदर्भात घोषणा

रोजगाराबाबत, काँग्रेस सरकार तरुणांना एका वर्षासाठी दरमहा ३,५०० रुपयांपर्यंतचा बेरोजगारी भत्ता देईल, असे आश्वासन पक्षाने दिले आहे. याशिवाय अनेक विभागांमध्ये रिक्त असलेली १ लाख सरकारी पदे भरली जातील. रिक्त सरकारी जागा भरण्यासाठी आम्ही ३० दिवसांच्या आत जॉब कॅलेंडर देखील जारी केले जाणार आहे.

शेतकऱ्यांना दरमहा ४ हजार रुपये मिळणार

शेतकऱ्यांबाबत घोषणा करताना काँग्रेसने म्हटले की, सरकार आल्यास भूमिहीन शेतकरी किंवा भाड्याच्या जमिनीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना फटका बसेल. सरकार त्यांना चार हजार रुपयांची मदत करणार आहे. शेती करणाऱ्या भूमिहीन शेतकऱ्यांसाठी सरकार ९९ वर्षांच्या लीजची व्यवस्था करेल. तर सफरचंद पिकासाठी किमान ७२ रुपये प्रतिकिलो दर निश्चित केला जाईल. याशिवाय, नैसर्गिक आपत्तींविरूद्ध सर्व पिकांसाठी १०० % पीक विमा देखील दिला जाईल.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसJammu Kashmirजम्मू-काश्मीरElectionनिवडणूक 2024