शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2024 09:37 IST

Congress Rahul Gandhi News: राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर पुन्हा एकदा टीका केली आहे.

Congress Rahul Gandhi News: लोकसभा निवडणुकीत देशभरात झालेल्या सर्वच टप्प्यात ७० टक्क्यांहून अधिक मतदान होण्याची कामगिरी पश्चिम बंगालने सहाव्या टप्प्यातही कायम ठेवली. २५ मे रोजी लोकसभा निवडणुकीचे सहाव्या टप्प्यातील मतदान झाले. दिल्लीतील ७ जागांवरही मतदान झाले. यातच काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका केली आहे. 

दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केंद्रीय मंत्र्यांसह अनेक व्हीआयपींनी मतदान केले. दिल्लीत सरासरी ५७.६७ टक्के मतदान झाले. उत्तर पूर्व दिल्लीमध्ये सर्वाधिक ६२.८७ टक्के, तर नवी दिल्लीत सर्वात कमी ५२.९३ टक्के मतदान झाले. यानंतर राहुल गांधी यांनी एक्सवर एक पोस्ट करत पंतप्रधान मोदी आणि भाजपावर निशाणा साधला.

पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालले आहे

पंतप्रधानांच्या भाषेची प्रतिष्ठा आणि भाजपाचा जागा या दोन्ही गोष्टी सातत्याने घसरत चालल्या आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी एक्सवरील पोस्टमधून केली आहे. तर दुसऱ्या एका पोस्टमध्ये राहुल गांधी म्हणतात की, देशवासियो, मतदानाच्या पहिल्या पाच टप्प्यात तुम्ही खोटेपणा, द्वेष आणि अपप्रचार यांना नाकारून तुमच्या जीवनाशी संबंधित तळागाळातील समस्यांना प्राधान्य दिले आहे. ३० लाख रिक्त सरकारी पदांवर भरती आणि तरुणांसाठी वर्षाला १ लाख रुपयांची पहिली रोजगार हमी योजना सुरू व्हावी. गरीब कुटुंबातील महिलांच्या खात्यात महिन्याला ८,५०० रुपये येऊ लागतील. शेतकरी कर्जमुक्त झाला होईल आणि त्यांना त्यांच्या पिकांवर योग्य एमएसपी मिळेल. मजुरांना ४०० रुपये रोजंदारी मिळेल. तुमचे जीवन तर सुधारेलच पण लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करेल, यासाठी मतदार म्हणून योगदान दिले, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार बिहारमधील लोकसभेच्या ८ जागांवर ५३.३० टक्के मतदान झाले. उत्तर प्रदेशमधील १४ जागांवर ५४.०३ टक्के मतदान झाले. जम्मूमधील एका जागेवर ५२.२८ टक्के मतदान झाले. पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या ८ जागांसाठी ७८.१९ टक्के मतदान झाले. हरयाणामधील सर्व १० जागांसाठी ५८.३७ टक्के एवढ्या मतदानाची नोंद झाली. राजधानी दिल्लीतील लोकसभेच्या ७ जागांसाठी ५४.४८ टक्के मतदान झाले. झारखंडमधील लोकसभेच्या ४ जागांसाठी ६२.७४ टक्के मतदान झाले. ओदिशामधील लोकसभेच्या ६ जागांसाठी ६०.०७ टक्के एवढे मतदान झाले.  

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा