शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2024 09:37 IST

Congress Rahul Gandhi News: राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर पुन्हा एकदा टीका केली आहे.

Congress Rahul Gandhi News: लोकसभा निवडणुकीत देशभरात झालेल्या सर्वच टप्प्यात ७० टक्क्यांहून अधिक मतदान होण्याची कामगिरी पश्चिम बंगालने सहाव्या टप्प्यातही कायम ठेवली. २५ मे रोजी लोकसभा निवडणुकीचे सहाव्या टप्प्यातील मतदान झाले. दिल्लीतील ७ जागांवरही मतदान झाले. यातच काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका केली आहे. 

दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केंद्रीय मंत्र्यांसह अनेक व्हीआयपींनी मतदान केले. दिल्लीत सरासरी ५७.६७ टक्के मतदान झाले. उत्तर पूर्व दिल्लीमध्ये सर्वाधिक ६२.८७ टक्के, तर नवी दिल्लीत सर्वात कमी ५२.९३ टक्के मतदान झाले. यानंतर राहुल गांधी यांनी एक्सवर एक पोस्ट करत पंतप्रधान मोदी आणि भाजपावर निशाणा साधला.

पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालले आहे

पंतप्रधानांच्या भाषेची प्रतिष्ठा आणि भाजपाचा जागा या दोन्ही गोष्टी सातत्याने घसरत चालल्या आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी एक्सवरील पोस्टमधून केली आहे. तर दुसऱ्या एका पोस्टमध्ये राहुल गांधी म्हणतात की, देशवासियो, मतदानाच्या पहिल्या पाच टप्प्यात तुम्ही खोटेपणा, द्वेष आणि अपप्रचार यांना नाकारून तुमच्या जीवनाशी संबंधित तळागाळातील समस्यांना प्राधान्य दिले आहे. ३० लाख रिक्त सरकारी पदांवर भरती आणि तरुणांसाठी वर्षाला १ लाख रुपयांची पहिली रोजगार हमी योजना सुरू व्हावी. गरीब कुटुंबातील महिलांच्या खात्यात महिन्याला ८,५०० रुपये येऊ लागतील. शेतकरी कर्जमुक्त झाला होईल आणि त्यांना त्यांच्या पिकांवर योग्य एमएसपी मिळेल. मजुरांना ४०० रुपये रोजंदारी मिळेल. तुमचे जीवन तर सुधारेलच पण लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करेल, यासाठी मतदार म्हणून योगदान दिले, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार बिहारमधील लोकसभेच्या ८ जागांवर ५३.३० टक्के मतदान झाले. उत्तर प्रदेशमधील १४ जागांवर ५४.०३ टक्के मतदान झाले. जम्मूमधील एका जागेवर ५२.२८ टक्के मतदान झाले. पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या ८ जागांसाठी ७८.१९ टक्के मतदान झाले. हरयाणामधील सर्व १० जागांसाठी ५८.३७ टक्के एवढ्या मतदानाची नोंद झाली. राजधानी दिल्लीतील लोकसभेच्या ७ जागांसाठी ५४.४८ टक्के मतदान झाले. झारखंडमधील लोकसभेच्या ४ जागांसाठी ६२.७४ टक्के मतदान झाले. ओदिशामधील लोकसभेच्या ६ जागांसाठी ६०.०७ टक्के एवढे मतदान झाले.  

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा