शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा राजकारणात केव्हा उतरणार? स्वतः त्यांनीच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2021 16:52 IST

जयपूर येथे येण्यासंदर्भात विचारले असता, आपण येथे दर्शणासाठी आलो होतो, यावेळी आपण सर्वांसाठीच आशिर्वाद मागितले, असे त्यांनी सांगितले. याच बरोबर त्यांनी सक्रिय राजकारणात येण्यासंदर्भातही भाष्य केले. (Priyanka Gandhi husband Robert Vadra)

ठळक मुद्देगांधी कुटुंबाचे जावई आणि व्यापारी रॉबर्ट वाड्रा शुक्रवारी जयपूर येथे आले होते. त्यांनी मोती डूंगरी मंदिरात गणपतीचे दर्शण घेतले.त्यांनी सक्रिय राजकारणात येण्यासंदर्भातही भाष्य केले.

जयपूर - गांधी कुटुंबाचे जावई आणि व्यापारी रॉबर्ट वाड्रा (Robert Vadra) शुक्रवारी जयपूर (Jaipur) येथे आले होते. यावेळी त्यांनी मोती डूंगरी मंदिरात गणपतीचे दर्शण घेतले. जयपूर येथे येण्यासंदर्भात विचारले असता, आपण येथे दर्शणासाठी आलो होतो, यावेळी आपण सर्वांसाठीच आशिर्वाद मागितले, असे त्यांनी सांगितले. याच बरोबर त्यांनी सक्रिय राजकारणात येण्यासंदर्भातही भाष्य केले. कोरोनादरम्यान ते पहिल्यांदाच जयपुरात आले होते. (Congress Priyanka Gandhi husband Robert Vadra said about entry in politics)

दिल्लीतील एकाच शाळेत शिकत होते रॉबर्ट वाड्रा अन् प्रियंका गांधी; जाणून घ्या इंटरेस्टिंग लव्ह स्टोरी

जेव्हा राजकीय लढाई आवश्यक वाटेल तेव्हा राजकारणात येईन - सक्रिय राजकारणात येण्यासंदर्भात विराचले असता, रॉबर्ट वाड्रा म्हणाले, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. योग्य वेळ असायला हवी. मी राजकारणापासून दूर असूनही काम करत आहे. एखादी लढाई राजकीय दृष्या आवश्यक आहे, असे जेव्हा वाटले, तेव्हा ती लढाई लढण्यासीठी मी नक्कीच राजकारणात येईन. 

...तर शेतकरी आंदोलन संपेल -शेतकरी आंदोलन आणि महागाईच्या मुद्द्यावर बोलताना रॉबर्ट वाड्रा म्हणाले, शेतकऱ्यांशी चर्चा व्हायला हवी, त्यांच्याशी चर्चा झाली तर शेतकरी आंदोलन संपेल. सरकारने एखादी योजना तयार केली तर त्या योजनेशी लोकांना जोडावे लागेल. केंद्र सरकारने लोकांवर दबाव टाकू नये. महागाईवर बोलताना वाड्रा म्हणाले, यामुळे लोकांचा त्रास वाढत आहे. एवढेच नाही, तर माझ्या जवळपासचे लोक म्हणतात, की आपण आमचा आवाज उचलावा.

“...आता मला संसदेत गेलंच पाहिजे”; रॉबर्ट वाड्रांच्या राजकीय एन्ट्रीला कोण लावतंय ब्रेक? जाणून घ्या

मी राजकीय गोष्टीत पडत नाही -देशभरात काँग्रेस कमकुवत होत असल्यासंदर्भात आणि कठोर निर्णय घेण्यासंदर्भात विचारले असता, मी राजकीय विषयात पडू इच्छित नाही, असे वाड्रा म्हणाले. मी केवळ लोकांना होत असलेला त्रास प्रकाशात आणतो. सायकलवरून ऑफिसात जाणेही, याच प्रकारचे एक प्रतिकात्मक पाऊल होते. आम्ही काम करत राहू. लोक समजतील आणि आम्ही त्याचा आवाज उचलत राहू, असे वाड्रा म्हणाले.

सरकार सुरुवातीपासूनच निशाणा करत आहे -गांधी आणि वाड्रा कुटुंबाला सरकार निशाणा बनवत आहे, असे विचारले असता, ते म्हणाले, हे सुरुवातीपासूनच सुरू आहे, सर्व गोष्टी स्पष्ट आहेत. तपास संस्था जेजे मागत आहेत, ते मी सर्व प्रकारे स्पष्ट करत आहे. आम्ही लोकांसाठी काम करतो. यामुळेच आम्हाला निशाणा केले जात आहे. 

टॅग्स :robert vadraरॉबर्ट वाड्राPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसRajasthanराजस्थान