शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

“सावरकर वीर नव्हते, प्रभारी असतो तर विधानसभेतील फोटो काढून टाकला असता”: प्रियांक खरगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 15:35 IST

Priyank Kharge Statement On Veer Savarkar: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र प्रियांक यांनी सावरकरांवर केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Priyank Kharge Statement On Veer Savarkar: सावरकर वीर नव्हते, मी प्रभारी असतो, तर सुवर्ण विधानसभेत लावलेला त्यांचा फोटो काढून टाकला असता, असे विधान कर्नाटकातीलकाँग्रेसचे नेते आणि मंत्री प्रियांक खरगे यांनी केले आहे. प्रियांक खरगे यांनी केलेल्या विधानावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खरगे यांनी केलेल्या विधानावर भाजपने तीव्र नाराजी व्यक्त करत पलटवार केला आहे. 

सावरकरांचे योगदान काय? काँग्रेस कार्यालयातील पत्रकार परिषदेत मी सावरकरांबद्दल दीड तास बोललो. सावरकरांना वीर ही पदवी कशी मिळाली हे भाजपने सांगावे? सावरकरांना वीर ही पदवी कोणी दिली? सावरकर इंग्रजांकडून पेन्शन घेत नव्हते हे भाजप सांगेल का? हे माझे वैयक्तिक मत आहे, सरकारचे नाही. माझ्या हाती असते तर, विधानसभेतून सावरकरांचा फोटो काढून टाकला असता. सावरकर अजिबात वीर नाही आणि याबाबत मी आव्हान द्यायला तयार आहे, असे प्रियांक खरगे यांनी म्हटले आहे. 

प्रियांक खरगे अडाणी आणि अहंकारी आहेत

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार बीके हरिप्रसाद यांनी प्रियांक खरगे यांच्या वक्तव्याचे समर्थन केले. स्वातंत्र्य लढ्यात सावरकरांचे योगदान शून्य आहे. प्रियांक खरगे यांचे मत बरोबर आहेत. सावरकरांचे चित्र काढून टाकावे, यात शंका नाही. भाजपची सत्ता असताना विधानसभेत सावरकरांचे चित्र लावण्यात आले होते. त्यांना इतिहास बदलायचा आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी सावरकरांचे योगदान काय होते हे जगाला माहीत आहे, अशी पुष्टी हरिप्रसाद यांनी जोडली. यावर भाजप नेत्यांनी जोरदार पलटवार करत प्रियांक खरगे हे अडाणी आणि अहंकारी आहेत, अशी टीका केली आहे. 

नेहमी देशविरोधी विधाने करतात

विधानसभेतून सावरकरांचे चित्र हटविल्यास तीव्र निषेध नोंदविला जाईल, असा इशारा भाजप आमदार भरत शेट्टी यांनी दिला. रियांका खरगे यांच्याकडे चुकीची माहिती आहे. त्यांना वाटते की तो सर्वात सुशिक्षित लोकांपैकी एक आहे, परंतु तो विधानसभेतील सर्वात अशिक्षित व्यक्ती आहे. सावरकरांचे चित्र काढण्याचा प्रयत्न केल्यास केवळ सभागृहात नव्हे तर बाहेरही तीव्र विरोध केला जाईल, असे शेट्टी म्हणाले. तर, प्रियांक खरगे यांच्यावर निशाणा साधत भाजप आमदार अश्वथ नारायण म्हणाले की, ग्रामीण विकास आणि पंचायती राज विभागात क्षमता सिद्ध करू द्या. ते अहंकारी आहेत, वादग्रस्त आहेत. ते नेहमीच देशविरोधी वक्तव्ये करत असतात, अशी टीका नारायण यांनी केली.  

टॅग्स :congressकाँग्रेसVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरKarnatak Politicsकर्नाटक राजकारणKarnatakकर्नाटक