शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेपर्यंत मोदींना झोपू देणार नाही- राहुल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 13:36 IST

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन राहुल गांधी आक्रमक

नवी दिल्ली: जोपर्यंत देशातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही, तोपर्यंत पंतप्रधान मोदींना झोपू देणार नाही, असा इशारा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना दिला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं. आतापर्यंत मोदींनी शेतकऱ्यांचं एक रुपयाचं कर्जही माफ केलेलं नाही, असं राहुल प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. संसदेच्या कामकाजात सहभागी होण्यापूर्वी त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काल काँग्रेस नेत्यांचे मुख्यमंत्रीपदाचे शपथविधी संपन्न झाले. यानंतर अवघ्या काही तासातच मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये अवघ्या काही तासांमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली. यावरुन राहुल यांनी मोदींवर निशाणा साधला. 'काल काँग्रेसच्या दोन मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफीचा निर्णय घ्यायला त्यांना सहा तासदेखील लागले नाहीत. मात्र मोदी साडेचार वर्षांपासून पंतप्रधान आहेत. त्यांनी या काळात शेतकऱ्यांचं एक रुपयाचंही कर्ज माफ केलेलं नाही,' अशा शब्दांमध्ये राहुल मोदींवर बरसले. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील काँग्रेसचा विजय हा गरीब जनतेचा, तरुणांचा, मजुरांचा, शेतकऱ्यांचा विजय आहे, असं राहुल यांनी म्हटलं. राहुल यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन मोदींना थेट लक्ष्य केलं. 'मोदींनी देशाला दोन भागांमध्ये विभागलं आहे. यातील एका भागात फक्त 15 जण आहेत. यामध्ये मोदींचे लाडके उद्योगपती आहेत. त्यांचं कर्ज लगेच माफ होतं. मात्र दुसऱ्या भारतात असलेल्या सर्वसामान्य जनतेला काही मिळत नाही. शेतकऱ्यांचा एक रुपयादेखील माफ होत नाही. मात्र जोपर्यंत देशातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही, तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही,' असा इशारा राहुल यांनी दिला. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीFarmerशेतकरीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेशChhattisgarhछत्तीसगडRafale Dealराफेल डील