शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

'वन नेशन, वन इलेक्शन'वर मल्लिकार्जुन खरगे यांचे उत्तर; म्हणाले, 'काँग्रेसचा विरोध...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 15:42 IST

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी 'वन नेशन वन इलेक्शन'वर आपली प्रतिक्रीया दिली आहे.

देशात काही दिवसातच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. सर्व पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असून दुसरीकडे 'वन नेशन, वन इलेक्शन'ची जोरदार चर्चा सुरू आहे. यावर आता काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रतिक्रीया दिली असून त्यांनी विरोध केला आहे. खरगे  म्हणाले की, 'वन नेशन, वन इलेक्शन ' या कल्पनेला आमचा विरोध आहे. खरगे यांनी 'वन नेशन वन इलेक्शन' या उच्चस्तरीय समितीच्या सचिवांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. 'वन नेशन वन इलेक्शन' या कल्पनेला काँग्रेसचा तीव्र विरोध असल्याचे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

मागील बुधवारी माजी राष्ट्रपती आणि 'वन नेशन, वन इलेक्शन' या उच्चस्तरीय समितीचे प्रमुख रामनाथ कोविंद यांनी माजी मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन चर्चा सुरू केली होती. निवृत्त न्यायाधीशांसह समितीने या विषयावर लोकांचे मत मागितल्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या बैठका झाल्या. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी हे पत्र लिहिले आहे. 

२१ तारखेपर्यंत आत्मसमर्पण करा; बिल्किस बानो प्रकरणी सुप्रीम कोर्टाचे आरोपींना स्पष्ट आदेश

'वन नेशन, वन इलेक्शन' या उच्चस्तरीय समितीचे प्रमुख राष्ट्रपती कोविंद यांनी बुधवारी दिल्लीत मद्रास उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश मुनीश्वर नाथ भंडारी यांची भेट घेतली. वन नेशन वन इलेक्शनवर चर्चा सुरू ठेवत, उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष कोविंद यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती गोर्ला रोहिणी आणि माजी सीईसी सुशील चंद्र यांच्याशी चर्चा केली, असे निवेदनात म्हटले आहे.

चंद्रा आणि न्यायमूर्ती रोहिणी यांनी कोविंद यांची भेट घेतली तेव्हा कायदा सचिव नितेन चंद्राही उपस्थित होते. चंद्रा हे उच्चस्तरीय समितीचे सचिवही आहेत. येत्या काही दिवसांतही सल्लामसलत सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. एकाच वेळी निवडणुका घेण्याच्या कल्पनेचे समर्थन केले आणि सांगितले की ते चांगले प्रशासन करण्यास मदत करेल कारण सरकारांना धोरणे तयार करण्यासाठी आणि अंमलबजावणी करण्यासाठी अधिक वेळ मिळेल.

देशात एकाच वेळी निवडणुका घेतल्याने जनतेची गैरसोय कमी होईल, मानवी संसाधनांचा वापर सुधारेल आणि वारंवार निवडणुका घेण्यावर होणारा खर्च कमी होईल, असेही त्यांनी सांगितल्याचे समजते. समितीने या विषयावर सामान्य जनता आणि राजकीय पक्षांकडून आधीच सूचना मागवल्या आहेत आणि त्यावर विचारही केला आहे. सुप्रीम कोर्ट आणि उच्च न्यायालयांचे माजी मुख्य न्यायमूर्ती, घटनातज्ज्ञ आणि माजी सीईसींसह प्रख्यात कायदेतज्ज्ञांनाही त्यांचे मत जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्यात आला आहे.

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसBJPभाजपा