शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

राजस्थानमध्ये राजकीय हालचालींना वेग! पायलट राहुल गांधींना भेटले तर सोनिया गांधींची गहलोत यांच्याशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 08:46 IST

Congress politics : चार दिवसांपूर्वी पीसीसीचे माजी प्रमुख सचिन पायलट यांनी (Sachin Pilot) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेतली होती.

ठळक मुद्दे सचिन पायलट आणि राहुल गांधी यांच्यात जवळपास दीड तास बैठक झाल्याचे सांगितले जाते. सोनिया गांधी यांनी अशोक गेहलोत यांच्याशी राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केल्याचे बोलले जात आहे.

जयपूर : पंजाबमधील राजकीय घडामोडींनंतर (Punjab political crisis) आता राजस्थानमध्ये (Rajasthan) वेगाने सुरू असलेल्या राजकीय हालचालींदरम्यान सूत्रांच्या हवाल्याने एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) से यांच्याशी दूरध्वनीद्वारे राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे.

चार दिवसांपूर्वी पीसीसीचे माजी प्रमुख सचिन पायलट यांनी (Sachin Pilot) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेतली होती. त्यामुळे आता राजकीय विश्लेषक या चर्चा आणि भेटीला राज्यातील नवीन राजकीय समीकरणांचे संकेत मानत आहेत. पंजाबमधील घडामोडींनंतर राजस्थान आणि छत्तीसगडमधील राजकीय परिस्थितीवर लोकांचे लक्ष आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. यावेळी सोनिया गांधी यांनी अशोक गहलोत यांच्याशी राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केल्याचे बोलले जात आहे. या दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारासह संघटनेच्या मुद्यावरही चर्चा झाली आहे. 

दरम्यान, या चर्चेच्या तीन दिवस आधी म्हणजेच 17 सप्टेंबर रोजी सचिन पायलट यांनी दिल्लीत राहुल गांधींची भेट घेतली होती. सचिन पायलट आणि राहुल गांधी यांच्यात जवळपास दीड तास बैठक झाल्याचे सांगितले जाते. पंजाबमधील घडामोडींनंतर सध्याच्या परिस्थितीत सचिन पायलट आणि राहुल गांधी यांची बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. जवळजवळ वर्षानंतर दोघांची भेट झाली.

मंत्रिमंडळ आणि पक्ष संघटनेत बदल होण्याची शक्यताराहुल गांधी आणि सचिन पायलट यांच्या या बैठकीत राजस्थानच्या राजकीय परिस्थितीसह तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. सूत्रांचा दावा आहे की, दोघांच्या बैठकीत राजस्थानमधील पक्ष संघटना आणि मंत्रिमंडळातील बदल आणि सचिन पायलट यांची स्वतःची भूमिका यावर चर्चा झाली. पुढील महिन्यापर्यंत मंत्रिमंडळ आणि संघटनेत बदल होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तसेच, हे सर्व आधीच निश्चित असल्याचे सांगितले जात आहे.

आचार्य प्रमोद कृष्णन यांचे ट्विटकाँग्रेस पार्टी फक्त मुख्यमंत्री अशोक गहलोत हे बरे होण्याची वाट पाहत आहे. अशोक गहलोत यांच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली असून ते पुन्हा आपल्या कामात सक्रीय झाले आहेत. या सर्व घडामोडींमध्ये प्रियंका गांधींचे निकटवर्तीय समजले जाणारे आचार्य प्रमोद कृष्णन यांनीही ट्विट करून त्यात भर घातली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, पंजाबचे वारे राजस्थान आणि छत्तीसगडमधील हवामान खराब करू शकतात.

टॅग्स :Sachin Pilotसचिन पायलटAshok Gahlotअशोक गहलोतRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसRajasthanराजस्थान