शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

लोकसभा, विधानसभा मतदारसंघात आता काँग्रेस पक्ष नेमणार प्रभारी; शेवटच्या स्तरापर्यंत उतरणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 5:45 AM

काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधी यांना सांगितले होते की, इलेक्शन मॅनेजमेंट भाजपासमोर खूपच कमजोर आहे. त्यामुळे आम्ही निवडणुका हरतो.

आदेश रावल, लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : उदयपूरमध्ये झालेल्या चिंतन शिबिरात काँग्रेसने अनेक नवे विभाग बनविण्याची घोषणा केली होती. यात सर्वात महत्त्वाचा विभाग आहे इलेक्शन मॅनेजमेंट डिपार्टमेंट. दीर्घ काळापासून याची मागणी पक्षातून होत होती. अद्याप हा विभाग स्थापनही झाला नाही तोच काँग्रेसने शेवटच्या स्तरापर्यंत उतरण्याचा कार्यक्रम आखला आहे. 

त्यानुसार, हा विभाग ६५०० काँग्रेस नेत्यांना देशाच्या प्रत्येक विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात पाठविणार आहे. तालुका स्तरापासून ते जिल्हा स्तरापर्यंत एक कार्यपद्धती पक्ष तयार करीत आहे. अगोदर ग्रामीण, तालुका, जिल्हा स्तरापर्यंत समिती स्थापन करण्यात येईल. त्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस समिती आपल्या या विशेष लोकांच्या माध्यमातून सर्वच बाबींची पडताळणी करणारी कार्यपद्धती तयार करेल. जो व्यक्ती विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघाचा प्रभारी असेल तो याची माहिती देईल. मात्र, तिकीट कोणाला द्यायचे याचा निर्णय पक्ष घेईल.

नवा प्रस्ताव का आला समोर?

- आसाम, पश्चिम बंगाल, केरळ विधानसभा निवडणुका हरल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधी यांना हे सांगितले होते की, आमचे इलेक्शन मॅनेजमेंट भाजपासमोर खूपच कमजोर आहे. त्यामुळे आम्ही निवडणुका हरतो.

- अलीकडेच काँग्रेसचा पाच राज्यात पराभव झाला तेव्हा रणनीतीकार प्रशांत किशोर यांनीही हेच सांगितले होते की, इलेक्शन मॅनेजमेंट डिपार्टमेंट असायला हवे.

- प्रशांत किशोर हे या विभागाचे सरचिटणीस होऊ इच्छित होते. तसेच, त्यांची अशीही अट होती की, ते काँग्रेस अध्यक्षांशिवाय कोणालाही रिपोर्ट करणार नाहीत. प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशावर आता पूर्णविराम लागला आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधी