शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

CoronaVirus: केंद्रातील मोदी सरकारने देशाची जाहीर माफी मागावी; पी. चिदंबरम यांनी केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2021 1:16 PM

CoronaVirus: जगप्रसिद्ध संशोधन पत्रिका ‘द लॅन्सेट’ने कोरोना परिस्थिती हाताळण्यास भारत सरकार अपयशी ठरल्याचे म्हटले आहे.

ठळक मुद्देदेशाची जाहीर माफी मागावीआरोग्य मंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावापी. चिदंबरम यांची मागणी

नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस नवीन उच्चांक गाठत असून, कोरोनाच्या मृत्यूचे प्रमाणही वाढताना पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, कोरोना लस यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर जगप्रसिद्ध संशोधन पत्रिका ‘द लॅन्सेट’ने कोरोना परिस्थिती हाताळण्यास भारत सरकार अपयशी ठरल्याचे म्हटले आहे. यावरून आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी टीका केली असून, केंद्रातील मोदी सरकारने देशाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे. (congress p chidambaram criticised pm modi and centre govt over corona situation in country)

भारतात २ कोटींपेक्षा अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, दररोज जवळपास ३ लाख ७८ हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद होतेय. याशिवाय आतापर्यंत कोरोनामुळे २ लाख २२ हजार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचा धोका आहे. रुग्णालये भरली आहेत आणि वैद्यकीय कर्मचारी थकले असून, त्यातील अनेकांना कोरोना संसर्ग झाला आहे, असे ‘द लॅन्सेट’ने म्हटले आहे. यावरून आता केंद्रावर जोरदार टीका करण्यात येत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम ट्विट करत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. 

तुमच्या देवाचे हात रक्ताने माखले आहेत; अमेरिकेतील मोदी भक्तांना खुले पत्र

देशाची जाहीर माफी मागावी

आजच्या लॅन्सेटच्या अग्रलेखानंतर थोडी लाज शिल्लक असेल तर सरकारने देशाची सार्वजनिक माफी मागावी. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी पी. चिदंबरम यांनी केली आहे. तसेच कोरोना संकटाशी लढण्याचे काम एका मजबूत टीमवर आणि पंतप्रधानांवर सोडून द्यावे. आरोग्य मंत्री आणि डॉक्टर, सल्लागारांच्या टीमला त्यात स्थान देऊ नये, असेही पी. चिदंबरम यांनी दुसऱ्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे. 

देशाला PM आवास नको, श्वास पाहिजे

दुसरीकडे काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. देशाला PM आवास नको, श्वास पाहिजे, असे ट्विट राहुल गांधींनी केले आहे. ट्विटमध्ये त्यांची तुलना करणारे दोन फोटो शेअर केले आहेत. त्यात एका बाजूला सेंट्रल विस्टा प्रकल्पाचे सुरू असलेले काम आणि दुसऱ्या बाजूला कोरोना झालेले रुग्ण श्वासासाठी लढताना दाखवण्यात आले आहेत.

“देवेंद्र फडणवीसच आभासी”; मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरून शिवसेनेचा पलटवार

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशात एका दिवसात ४ लाख ३ हजार ७३८ नागरिक करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. काहीसा दिलासादायक बाब म्हणजे याच कालावधीत देशभरात ३ लाख ८६ हजार ४४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. तर देशात सलग चौथ्या दिवशी चार हजारांहून अधिक मृत्यूची नोंद झाली आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCentral Governmentकेंद्र सरकारcongressकाँग्रेसP. Chidambaramपी. चिदंबरमPoliticsराजकारण