शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 19:14 IST

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनीदेखील या एक्झिट पोलला फेक म्हटले आणि इंडिया आघाडीचा विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

Congress on Lok Sabha Exit Polls : लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यातील मतदान संपताच एक्झिट पोल समोर आले, ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील NDA ला प्रचंड बहुमत मिळणार असल्याचे म्हटले आहे. तर, विरोधक हे एक्झिट पोल बनावट असल्याची टीका करत आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनीदेखील या एक्झिट पोलला फेक म्हटले आणि इंडिया आघाडीचा विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. 

'पंतप्रधान काँग्रेसचाच असेल'मीडियाशी संवाद साधताना जयराम रमेश म्हणाले, इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर सर्वात मोठ्या पक्षाचा, म्हणजेच काँग्रेसचा पंतप्रधान होईल. 4 जून रोजी नरेंद्र राजीनामा देतील आणि 5 जून रोजी इंडिया आघाडी पंतप्रधानाचे नाव जाहीर करेल. एनडीएतील अनेक प्रादेशिक पक्ष आमच्या संपर्कात आहेत. काहींनी थेट माझ्याशी संपर्क साधून सोबत येण्यची इच्छा व्यक्त केली आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला. 

'एक्झिट पोलमध्ये अटलजी अन् पंतप्रधान...'एक्झिट पोलबाबत बोलताना ते म्हणाले की, एक्झिट पोल बनावट आणि बोगस आहे. सर्व एक्झिट पोल एकसमान डेटा देत आहेत. इंडिया आघाडी 295 पेक्षआ जास्त जागा जिंकणार आहे. 2004 मध्ये काय झाले? एक्झिट पोलमध्ये अटलजी जिंकत असल्याचे दाखवले होते, पण नंतर मनमोहन सिंग पंतप्रधान झाले. पंतप्रधान मोदी ज्या बैठका घेत आहेत, त्या केवळ मानसिक दबाव निर्माण करण्यासाठी आहेत, असेही ते यावेळी म्हणाले. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी