शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

भारतरत्नसाठी सचिन तेंडुलकर लायक नाही; काँग्रेस खासदाराची टीका

By देवेश फडके | Updated: February 7, 2021 20:20 IST

सचिन तेंडुलकर यांच्यासह अक्षय कुमार आणि अन्य सेलिब्रेटिंवर गिल यांनी जोरदार टीका केली.

ठळक मुद्देकाँग्रेस खासदाराची सचिन तेंडुलकरवर जोरदार टीकाअभिनेता अक्षय कुमारचाही घेतला समाचारशेतकरी आंदोलनाविरोधात सरकारची बाजू घेतल्यामुळे आगपाखड

नवी दिल्ली : भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर भारतरत्नसाठी लायक नाही, असे वादग्रस्त विधान काँग्रेसचे खासदार जसबीर एस. गिल यांनी केले आहे. सचिन तेंडुलकर यांच्यासह अक्षय कुमार आणि अन्य सेलिब्रेटिंवर गिल यांनी जोरदार टीका केली. एएनआय वृत्तसंस्थेशी ते बोलत होते. (Congress MP Jasbir S Gill says Sachin Tendulkar does not deserve Bharat Ratna)

शेतकरी आंदोलनाविरोधात ज्यांनी वक्तव्ये केली, त्यांचा आत्मसन्मान संपलेला आहे. त्यांची लायकी नाही. सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) केवळ आपल्या मुलाला इंडियन प्रिमीयर लीगमध्ये स्थान मिळावे, यासाठी सरकारची बाजू घेतली. जनतेने याचा निर्णय घ्यावा. भारतरत्नसाठी सचिन तेंडुलकर पात्र नाही, असे गिल यांनी म्हटले आहे. 

अक्षय कुमारवरही हल्लाबोल

अक्षय कुमार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारतो की, तुम्ही आंबे खाता का, यावरून त्याची वैचारिक पातळी कळते. अक्षय कुमारचा बुद्ध्यांक तेवढाच आहे. त्याचे म्हणणे कोणीही गांभीर्याने घेत नाही. या अशा माणसांना ट्वीट करायला लावल्यामुळे सरकारला आता शेतकरी आंदोलकांची भीती वाटू लागली आहे. हेच स्पष्ट होते, असा दावा गिल यांनी यावेळी केला. 

"कृषी मंत्री असताना पवारांनी शेती सोडून IPL स्पर्धा भरवलेल्या चालतात पण सचिनने..." 

अलीकडेच शेतकरी आंदोलनाला विविध परदेशी सेलिब्रेटिंनी ट्विटरद्वारे पाठिंबा दर्शवला. शेतकरी आंदोलनावरून त्यांनी भारत सरकारवरही टीका केली. सोशल मीडियातून याची चर्चा सुरू झाल्यानंतर त्यावर अनेक भारतीय सेलिब्रेटिंनी सरकारची बाजू घेत परदेशी सेलिब्रिटिंना सुनावले. भारताच्या अंतर्गत मुद्द्यांमध्ये नाक न खुपसण्याचा सल्लाही दिला. यामध्ये भारतरत्न सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांच्यासह अनेक कलाकार, खेळाडू, राजकारणी तसेच दिग्गजांचा समावेश होता.

दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून केंद्रीय कृषी कायद्याविरोधात शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करीत आहेत. केंद्र सरकारने कायदे मागे घ्यावे, या मागणीसाठी शेतकरी आंदोलक ठाम आहेत. मात्र, काही झाले तरी कायदे रद्द करता येणार नाही. शेतकऱ्यांनी सूचना द्याव्यात. कायद्यात तशा प्रकारचे बदल केले जातील. शेतकऱ्यांची चर्चा करण्यास नेहमी तयार आहे, असे सरकारच्या बाजूने सांगण्यात आले आहे. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनSachin Tendulkarसचिन तेंडुलकरAkshay Kumarअक्षय कुमारcongressकाँग्रेस