शहरं
Join us  
Trending Stories
1
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
2
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
3
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
4
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
5
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
6
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
7
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
8
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
9
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
10
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
11
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
12
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
13
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
14
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
15
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
16
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
17
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
18
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
20
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून

भारतरत्नसाठी सचिन तेंडुलकर लायक नाही; काँग्रेस खासदाराची टीका

By देवेश फडके | Updated: February 7, 2021 20:20 IST

सचिन तेंडुलकर यांच्यासह अक्षय कुमार आणि अन्य सेलिब्रेटिंवर गिल यांनी जोरदार टीका केली.

ठळक मुद्देकाँग्रेस खासदाराची सचिन तेंडुलकरवर जोरदार टीकाअभिनेता अक्षय कुमारचाही घेतला समाचारशेतकरी आंदोलनाविरोधात सरकारची बाजू घेतल्यामुळे आगपाखड

नवी दिल्ली : भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर भारतरत्नसाठी लायक नाही, असे वादग्रस्त विधान काँग्रेसचे खासदार जसबीर एस. गिल यांनी केले आहे. सचिन तेंडुलकर यांच्यासह अक्षय कुमार आणि अन्य सेलिब्रेटिंवर गिल यांनी जोरदार टीका केली. एएनआय वृत्तसंस्थेशी ते बोलत होते. (Congress MP Jasbir S Gill says Sachin Tendulkar does not deserve Bharat Ratna)

शेतकरी आंदोलनाविरोधात ज्यांनी वक्तव्ये केली, त्यांचा आत्मसन्मान संपलेला आहे. त्यांची लायकी नाही. सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) केवळ आपल्या मुलाला इंडियन प्रिमीयर लीगमध्ये स्थान मिळावे, यासाठी सरकारची बाजू घेतली. जनतेने याचा निर्णय घ्यावा. भारतरत्नसाठी सचिन तेंडुलकर पात्र नाही, असे गिल यांनी म्हटले आहे. 

अक्षय कुमारवरही हल्लाबोल

अक्षय कुमार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारतो की, तुम्ही आंबे खाता का, यावरून त्याची वैचारिक पातळी कळते. अक्षय कुमारचा बुद्ध्यांक तेवढाच आहे. त्याचे म्हणणे कोणीही गांभीर्याने घेत नाही. या अशा माणसांना ट्वीट करायला लावल्यामुळे सरकारला आता शेतकरी आंदोलकांची भीती वाटू लागली आहे. हेच स्पष्ट होते, असा दावा गिल यांनी यावेळी केला. 

"कृषी मंत्री असताना पवारांनी शेती सोडून IPL स्पर्धा भरवलेल्या चालतात पण सचिनने..." 

अलीकडेच शेतकरी आंदोलनाला विविध परदेशी सेलिब्रेटिंनी ट्विटरद्वारे पाठिंबा दर्शवला. शेतकरी आंदोलनावरून त्यांनी भारत सरकारवरही टीका केली. सोशल मीडियातून याची चर्चा सुरू झाल्यानंतर त्यावर अनेक भारतीय सेलिब्रेटिंनी सरकारची बाजू घेत परदेशी सेलिब्रिटिंना सुनावले. भारताच्या अंतर्गत मुद्द्यांमध्ये नाक न खुपसण्याचा सल्लाही दिला. यामध्ये भारतरत्न सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांच्यासह अनेक कलाकार, खेळाडू, राजकारणी तसेच दिग्गजांचा समावेश होता.

दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून केंद्रीय कृषी कायद्याविरोधात शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करीत आहेत. केंद्र सरकारने कायदे मागे घ्यावे, या मागणीसाठी शेतकरी आंदोलक ठाम आहेत. मात्र, काही झाले तरी कायदे रद्द करता येणार नाही. शेतकऱ्यांनी सूचना द्याव्यात. कायद्यात तशा प्रकारचे बदल केले जातील. शेतकऱ्यांची चर्चा करण्यास नेहमी तयार आहे, असे सरकारच्या बाजूने सांगण्यात आले आहे. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनSachin Tendulkarसचिन तेंडुलकरAkshay Kumarअक्षय कुमारcongressकाँग्रेस