शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

अमेठी, रायबरेलीत एकतरी बूथ जिंकून दाखवा; अमित शहांना काँग्रेसचं खुलं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 16:32 IST

'शहा अपयशी ठरल्यास त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा'

अमेठी: नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेशातील कैराना आणि नुरपूर पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव केल्यानं विरोधकांचं मनोबल उंचावलं आहे. भाजपाला 2019 मध्ये केंद्रातील सत्ता राखायची असल्यास, उत्तर प्रदेशातील कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या आमदारानं थेट भाजपा अध्यक्ष अमित शहांना खुलं आव्हान दिलं आहे. 'अमेठी, रायबरेली मतदारसंघ जिंकणं दूरच, या मतदारसंघातील एकतरी बूथ जिंकून दाखवा,' असं आव्हान काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार दीपक सिंह यांनी शहांना दिलं आहे. दीपक सिंह काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. 

काही दिवसांपूर्वीच अमित शहांनी काँग्रेसचे परंपरागत मतदारसंघ समजल्या जाणाऱ्या अमेठी आणि रायबरेलीवरुन काँग्रेसवर निशाणा साधला होता. येत्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपा विजयी होईल, असं शहांनी म्हटलं होतं. राहुल गांधी अमेठी मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. तर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी रायबरेलीच्या खासदार आहेत. अमेठी आणि रायबरेलीवर भाष्य करत अमित शहांनी थेट राहुल आणि सोनिया गांधींना आव्हान दिलं होतं. शहांनी दिलेल्या या आव्हानाला आता काँग्रेसनं प्रतिआव्हान दिलं आहे. काँग्रेसचे आमदार दीपक सिंह यांनी ट्विट करत शहांना थेट आव्हान दिलं आहे. 'अमेठी-रायबरेलीमधील एक जागा अमित शहा भाजपाला जिंकून देणार आहेत? स्वप्न पाहणं वाईट नाही. मात्र शहांना मी आव्हान देतो की, त्यांनी अमेठी-रायबरेलीतील किमान एका बूथवर भाजपाला यश मिळवून द्यावं. अमित शहांनी एकतरी बूथ जिंकला, तर मी आमदारकीचा राजीनामा देईन आणि शहा अपयशी ठरले, तर त्यांनी राज्यसभेचा राजीनामा द्यावा,' असं आव्हान सिंह यांनी दिलं. 

 

टॅग्स :Amit Shahअमित शाहUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधी