शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

काँग्रेसचे तिसरे राज्यही धोक्यात? 20 आमदार संपर्कात असल्याचा भाजपाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 14:52 IST

लोकसभा निवडणुकीआधीच कर्नाटकमध्ये भाजपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांनी जेडीएस-काँग्रेसचे कुमारस्वामी सरकार पडणार अशी वक्तव्ये केली होती.

देशात मोदी सरकार सत्तेवर असतानाही भाजपाच्या ताब्यातून काँग्रेसकडे आलेल्या राज्यांमध्ये सध्या पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत आहेत. भाजपाच्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीनंतर कर्नाटक, मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार पाडण्याचा दावा केलेला असताना यामध्ये आणखी एका राज्याची भर पडली आहे. या राज्यात बसप आणि काँग्रेसचे 20-25 आमदार नाराज असल्याचा दावा भाजपाच्या नेत्यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीआधीच कर्नाटकमध्ये भाजपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांनी जेडीएस-काँग्रेसचे कुमारस्वामी सरकार पडणार अशी वक्तव्ये केली होती. यानंतरही त्यांनी आमदार फोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांना यश आले नव्हते. लोकसभेनंतरही ते प्रयत्नशील आहेत. तसेच मध्यप्रदेशमध्येही काँग्रेस काठावर सत्तेत असल्याने तेथेही लोकसभा निकालानंतर भाजपकडून काँग्रेसची सत्ता हिसकावण्याचे प्रयत्न सुरु आहेत. बहुमत सिद्ध करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या राज्यांच्या यादीत आता राजस्थानचाही नंबर लागला आहे. 

भाजपाचे राजस्थानचे उपाध्यक्ष ज्ञानदेव आहुजा यांनी आज सूचक वक्तव्य केले आहे. मी पक्षाचा प्रवक्ता नाही, पण बसपाचे आणि काँग्रेसचे 20 ते 25 आमदार नाखूश असल्याचे ऐकायला मिळत आहे. यावर जास्त बोलणार नाही, असे म्हटले आहे. 

तर भाजपाचे आणखी एक नेते भवानीसिंग राजावत यांनीही काँग्रेसमध्ये आलबेल नसल्याचे म्हटले आहे. काँग्रेसची सत्ता घालवण्यासाठी आम्हाला मेहनत घ्यायची गरज नाहीय. कारण काँग्रेस स्वत:च करत आहे. लवकरच काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरु होईल आणि सत्ताधारी अल्पमतात जातील, असे त्यांनी सांगितले.

 

मुख्यमंत्र्यांचे पदही धोक्यात

गेल्या वर्षी राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शानदार विजय मिळवून पुनरागमन करणाऱ्या काँग्रेसलाराजस्थानमध्ये लोकसभा निवडणुकीत खातं उघडण्यात देखील यश आले नाही. या पराभवाचे खापर आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावर फोडण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी नाराज असून त्यामुळे गहलोत यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. गहलोत यांचे चिरंजीव वैभव जोधपूरमधून निवडणुकीच्या रिंगणात होते. परंतु, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मुख्यमंत्री गहलोत यांनी देखील आपल्या १३० सभांपैकी ९३ सभा मुलासाठी घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राहुल गांधी नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकRajasthanराजस्थानcongressकाँग्रेसBJPभाजपा