शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

काँग्रेसचे तिसरे राज्यही धोक्यात? 20 आमदार संपर्कात असल्याचा भाजपाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 14:52 IST

लोकसभा निवडणुकीआधीच कर्नाटकमध्ये भाजपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांनी जेडीएस-काँग्रेसचे कुमारस्वामी सरकार पडणार अशी वक्तव्ये केली होती.

देशात मोदी सरकार सत्तेवर असतानाही भाजपाच्या ताब्यातून काँग्रेसकडे आलेल्या राज्यांमध्ये सध्या पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत आहेत. भाजपाच्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीनंतर कर्नाटक, मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार पाडण्याचा दावा केलेला असताना यामध्ये आणखी एका राज्याची भर पडली आहे. या राज्यात बसप आणि काँग्रेसचे 20-25 आमदार नाराज असल्याचा दावा भाजपाच्या नेत्यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीआधीच कर्नाटकमध्ये भाजपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांनी जेडीएस-काँग्रेसचे कुमारस्वामी सरकार पडणार अशी वक्तव्ये केली होती. यानंतरही त्यांनी आमदार फोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांना यश आले नव्हते. लोकसभेनंतरही ते प्रयत्नशील आहेत. तसेच मध्यप्रदेशमध्येही काँग्रेस काठावर सत्तेत असल्याने तेथेही लोकसभा निकालानंतर भाजपकडून काँग्रेसची सत्ता हिसकावण्याचे प्रयत्न सुरु आहेत. बहुमत सिद्ध करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या राज्यांच्या यादीत आता राजस्थानचाही नंबर लागला आहे. 

भाजपाचे राजस्थानचे उपाध्यक्ष ज्ञानदेव आहुजा यांनी आज सूचक वक्तव्य केले आहे. मी पक्षाचा प्रवक्ता नाही, पण बसपाचे आणि काँग्रेसचे 20 ते 25 आमदार नाखूश असल्याचे ऐकायला मिळत आहे. यावर जास्त बोलणार नाही, असे म्हटले आहे. 

तर भाजपाचे आणखी एक नेते भवानीसिंग राजावत यांनीही काँग्रेसमध्ये आलबेल नसल्याचे म्हटले आहे. काँग्रेसची सत्ता घालवण्यासाठी आम्हाला मेहनत घ्यायची गरज नाहीय. कारण काँग्रेस स्वत:च करत आहे. लवकरच काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरु होईल आणि सत्ताधारी अल्पमतात जातील, असे त्यांनी सांगितले.

 

मुख्यमंत्र्यांचे पदही धोक्यात

गेल्या वर्षी राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शानदार विजय मिळवून पुनरागमन करणाऱ्या काँग्रेसलाराजस्थानमध्ये लोकसभा निवडणुकीत खातं उघडण्यात देखील यश आले नाही. या पराभवाचे खापर आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावर फोडण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी नाराज असून त्यामुळे गहलोत यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. गहलोत यांचे चिरंजीव वैभव जोधपूरमधून निवडणुकीच्या रिंगणात होते. परंतु, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मुख्यमंत्री गहलोत यांनी देखील आपल्या १३० सभांपैकी ९३ सभा मुलासाठी घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राहुल गांधी नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकRajasthanराजस्थानcongressकाँग्रेसBJPभाजपा