शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
2
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
3
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
4
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
5
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
6
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
7
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
8
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
9
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
10
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
11
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
12
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
13
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
14
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
15
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
16
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
17
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
18
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
19
IPL Auction 2026 LIVE: नवोदित कार्तिक शर्मा, प्रशांत वीर, अकिब जावेदवर पैशांचा पाऊस, लागल्या विक्रमी बोली
20
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानशी संवादच साधला नाही ही भारताची १० वर्षातील सर्वात मोठी चूक- मणिशंकर अय्यर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 14:02 IST

"भारताने मैत्रीचा एक हात पुढे केला तर..." पाकिस्तानवर कौतुकाचा वर्षाव

Mani Shankar Aiyar, Pakistan India Dialogue: काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर अनेकदा उघडपणे पंतप्रधान मोदी आणि भाजपाचे सरकार याविरोधात बोलताना दिसतात. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करत असताना, पाकिस्तान आणि तेथील जनतेवर कौतुकाचा वर्षाव केला. ते म्हणाले की, पाकिस्तानात असताना त्यांचे इतक्या खुल्या मनाने स्वागत झाले, तसे इतर कोणत्याही देशात झालेले नाही. डॉन वृत्तपत्राने अय्यर यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, माझ्या अनुभवानुसार, पाकिस्तानी लोक हे अशा पद्धतीचे आहेत, जे कृतीवर प्रतिक्रिया देणे पसंत करतात. त्यामुळे भारताने मैत्रीचा एक हात पुढे केला तर पाकिस्तानही मैत्रीपूर्ण प्रेमाचा वर्षाव करेल. पण भारताने पाकिस्तानशी संवादच साधला नाही ही गेल्या १० वर्षातील सर्वात मोठी चूक असल्याचे ते म्हणाले.

काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी शनिवारी लाहोरच्या अलहमरा येथे फैज महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी 'हिज्र की रख, विसाल के फूल, भारत-पाकिस्तान संबंध' या सत्रादरम्यान ही टिप्पणी केली. डॉनच्या वृत्तानुसार, अय्यर म्हणाले की, जेव्हा ते कराचीमध्ये कॉन्सुल जनरल म्हणून नियुक्त झाले होते, तेव्हा प्रत्येकजण त्यांची आणि त्यांच्या पत्नीची आपुलकीने विचारपूस करायचे, काळजी घ्यायचे. त्यांनी त्यांच्या 'मेमोयर्स ऑफ अ मॅव्हरिक' या पुस्तकात अनेक घटनांबद्दल लिहिले आहे, ज्यात पाकिस्तान हा भारतीयांच्या कल्पनेपेक्षा पूर्णपणे वेगळा देश असल्याचे म्हटले आहे.

भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सुधारण्यासाठी सद्भावना आवश्यक होती. पण २०१४ मध्ये नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून गेल्या १० वर्षांत भारत-पाकिस्तान यांच्यात संवादच साधला नाही. त्यामुळे गोष्टी ताणल्या गेल्या. भारतातील सध्याचे हिंदुत्ववादी सरकार पाकिस्तानशी चर्चा करेल, अशी अपेक्षा करणे मूर्खपणाचे आहे. मी पाकिस्तानच्या जनतेला एवढेच सांगू इच्छितो की त्यांनी हे लक्षात ठेवावे की पंतप्रधान मोदींना कधीही एक तृतीयांशपेक्षा जास्त मते मिळालेली नाहीत, परंतु आमची राजकीय व्यवस्था अशी आहे की जर त्यांच्याकडे एक तृतीयांश मते असतील. तर त्यांच्याकडे दोन तृतीयांश जागा असतात. म्हणूनच दोन तृतीयांश भारतीय तुमच्याशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यास तयार आहेत असे माझे मत आहे.

टॅग्स :Mani Shankar Aiyarमणीशंकर अय्यरIndiaभारतPakistanपाकिस्तानcongressकाँग्रेस