शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

“भले काँग्रेसला मत देऊ नका, पण चांगले काम केले असेल तर अंत्ययात्रेला नक्की या”: खरगे भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 23:00 IST

Congress Mallikarjun Kharge News: भाजपा आणि संघ विचारसरणीला पराभूत करणे हेच ध्येय आहे. राजकारणातून कधी संन्यास घेणार नाही, असे मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे.

Congress Mallikarjun Kharge News: भलेही तुम्हाल काँग्रेसला मतदान करायचे नसेल. मात्र, तुमच्यासाठी जर मी काही चांगली कामे केली असतील, तर कमीत कमी माझ्या अंत्ययात्रेला नक्की या, असे अत्यंत भावूक उद्गार काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काढले. मल्लिकार्जुन खरगे आपल्या गावी कलबुर्गी येथे गेले होते. या ठिकाणाहून मल्लिकार्जुन खरगे यांचे जावई राधाकृष्ण डोड्डामणी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

अफजलपूर येथील एका प्रचारसभेला संबोधित करताना मल्लिकार्जुन खरगे अत्यंत भावूक झाल्याचे सांगितले जात आहे. तुम्ही काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केले नाही, तर मला असे वाटले की, कलबुर्गी येथे आता मला कोणतेच स्थान राहिलेले नाही. मी तुमचा विश्वास जिंकू शकलो नाही. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS च्या विचारसरणीला पराभूत करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत राजकारणात सक्रीय राहणार असल्याचा एल्गार मल्लिकार्जून खरगे यांनी केला.

राजकारणातून कधीही संन्यास घेणार नाही

निवडणुकीच्या रिंगणात असो किंवा नसो. या देशाचे संविधान वाचवण्यासाठी आणि देशाच्या लोकशाहीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहणार. राजकारणातून कधीही संन्यास घेणार नाही. एखाद्या पदावरून निवृत्ती घेतली जाऊ शकते. परंतु, आपली तत्त्वे आणि सिद्धांत यांपासून कधीही निवृत्ती घेता कामा नये. भाजपा आणि संघाच्या विचारधारेला पराभूत करण्यासाठीच राजकारणात आलो आहे. त्यांच्यासमोर झुकणार नाही, असे मल्लिकार्जुन खरगे यांनी ठामपणे सांगितले. तसेच मी सिद्धरामय्या यांना वारंवार सांगतो की, तुम्ही मुख्यमंत्री किंवा आमदार म्हणून निवृत्त होऊ शकता. पण, जोपर्यंत तुम्ही भाजपा आणि आरएसएसच्या विचारसरणीचा पराभव करत नाही, तोपर्यंत तुम्ही राजकारणातून निवृत्त होऊ शकत नाही, असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

दरम्यान, २००९ आणि २०१४ ची लोकसभा निवडणूक मल्लिकार्जुन खरगे याच कलबुर्गी येथून जिंकले होते. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत खरगे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. इंडिया आघाडीतील काही नेत्यांना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले मल्लिकार्जुन खरगे पंतप्रधानपदाचे चेहरे असावेत, असा प्रस्ताव मांडला होता. मात्र, तो प्रस्ताव अंतिम होऊ शकला नाही. 

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसkarnataka lok sabha election 2024कर्नाटक लोकसभा निवडणूक निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४