शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

“४०० पार दावा विसरा, २०० जागांपुढे जात नाही, PM मोदींनी कामाचा विचार करावा”; खरगेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 09:25 IST

Congress Mallikarjun Kharge News: तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगण आणि महाराष्ट्रात भाजपा कमकुवत असून, ४०० पार कशा होणार, अशी विचारणा मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.

Congress Mallikarjun Kharge News: लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या सातव्या टप्प्यातील मतदान ०१ जून रोजी होणार आहे. तर, ०४ जून रोजी मतमोजणी आहे. शेवटच्या टप्प्यातील प्रचाराला चांगलाचा वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे देशातील अनेक भागात तापमान नवे उच्चांक गाठत असून, लोकसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरणही चांगलेच तापल्याचे दिसत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी तीव्र होत आहेत. यातच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना, स्वतःच्या कामांकडे लक्ष द्यावे आणि त्यावर विचार करावा, असा खोचक टोला लगावला आहे. 

मीडियाशी बोलताना खरगे म्हणाले की, जेव्हा तुमच्या जागा कमी होणार आहेत आणि आमच्या वाढणार आहेत अशा वेळी ४०० पारचा दावा विसरा, तो दावा योग्य नाही. ते सरकार बनवू शकत नाहीत आणि २०० जागांच्या पुढे जाणार नाहीत, असा दावा खरगे यांनी केला. तसेच भाजपाचे तामिळनाडू, केरळ आणि तेलंगणामध्ये अस्तित्व नाही. कर्नाटकात त्यांची स्थिती मजबूत नाही. महाराष्ट्रातही भाजपा कमकुवत आहेत. पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये अटीतटीची लढत आहे. तर त्यांना ४०० जागा कशा मिळतील, अशी थेट विचारणा मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.

४ जूननंतर स्वत:च्या कामाचा विचार केला पाहिजे

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर खरगे त्यांची नोकरी गमावतील, अशी टीका भाजपाकडून करण्यात आली होती. यावर, राजकारणात नोकरीसाठी नाही, तर लहानपणापासून लोकांची सेवा करण्यासाठी राजकारणात आलो आहे. इथे आता मला तेवढीच वर्षे झाली आहेत, जेवढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वय आहे. ४ जूननंतर त्यांनी स्वत:च्या कामाचा विचार केला पाहिजे, असा पलटवार खरगे यांनी केला.

दरम्यान, गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या जागा कमी होणार आहेत, तर काँग्रेस आणि इंडिया आघाडीला फायदा होणार आहे, असा दावाही खरगे यांनी केला आहे.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी