शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

“मोदी सरकारने बळीराजाला वचने दिली, पण पूर्ण केली नाही”; मल्लिकार्जुन खरगेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 14:48 IST

Farmers Delhi Chalo March: शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे, असे मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे.

Farmers Delhi Chalo March: किमान आधारभूत किमतीसाठी कायदा करण्याच्या प्रमुख मागणीसाठी पंजाब आणि हरियाणातील हजारो शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा राजधानी दिल्लीच्या दिशेने कूच केली आहे. हजारो शेतकरी त्यांचे ट्रॅक्टर, ट्रक घेऊन दिल्लीच्या वेशीवर धडकले आहेत. केंद्र सरकारने विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरली. यानंतर आता शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र केले आहे. यावरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे.

शेतकरी दिल्लीतील शंभू सीमेवर येऊन धडकले आहेत. पोलिसांनी शेतकऱ्यांना पुढे जाण्यास मज्जाव केला आहे. आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आहेत. शेकडो शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. दुसऱ्या बाजूला सिंघू सीमेवरही पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे. या सर्व घडामोडींच्या संदर्भात मल्लिकार्जुन खरगे यांनी एक्सवर एक पोस्ट करत केंद्रावर निशाणा साधला.

मोदी सरकारने बळीराजाला वचने दिली, पण पूर्ण केली नाही

काटेरी तारा, ड्रोनमधून अश्रुधुराचा मारा, खिळे आणि बंदुका, शेतकऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी हुकुमशाही मोदी सरकारने ही सर्व व्यवस्था केली आहे. आंदोलनजीवी आणि परजीवी म्हणून बदनामी केली होती आणि ७५० शेतकऱ्यांचा जीव घेतला होता, याचे स्मरण आहे ना? गेल्या १० वर्षात मोदी सरकारने देशातील शेतकऱ्यांना दिलेली तीन आश्वासने पाळली नाहीत. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे. स्वामिनाथन अहवालानुसार ५० टक्के MSP ची किंमत आणि अंमलबजावणी करणे आणि MSPचा कायदा करणे. ६२ कोटी शेतकऱ्यांनी आवाज उठवण्याची वेळ आली आहे. काँग्रेस पक्ष छत्तीसगडच्या अंबिकापूरमध्ये शेतकरी न्यायासाठी आवाज उठवणार आहे. शेतकरी आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. घाबरणार नाही, झुकणार नाही, अशी पोस्ट मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. 

दरम्यान, किमान आधारभूत किमतीची कायदेशीर हमी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, शेतकरी आणि शेतमजुरांना पेन्शन, कर्जमाफी, गुन्हे मागे घेणे, लखीमपुर खिरी पीडितांना मदत करणे, भूसंपादन कायदा २०१३ ची पुनर्रचना करणे. मागील आंदोलनात मारल्या गेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देणे, अशा मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.  

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेFarmers Protestशेतकरी आंदोलनcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकार