शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

“मोदी सरकारने बळीराजाला वचने दिली, पण पूर्ण केली नाही”; मल्लिकार्जुन खरगेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 14:48 IST

Farmers Delhi Chalo March: शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे, असे मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे.

Farmers Delhi Chalo March: किमान आधारभूत किमतीसाठी कायदा करण्याच्या प्रमुख मागणीसाठी पंजाब आणि हरियाणातील हजारो शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा राजधानी दिल्लीच्या दिशेने कूच केली आहे. हजारो शेतकरी त्यांचे ट्रॅक्टर, ट्रक घेऊन दिल्लीच्या वेशीवर धडकले आहेत. केंद्र सरकारने विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरली. यानंतर आता शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र केले आहे. यावरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे.

शेतकरी दिल्लीतील शंभू सीमेवर येऊन धडकले आहेत. पोलिसांनी शेतकऱ्यांना पुढे जाण्यास मज्जाव केला आहे. आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आहेत. शेकडो शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. दुसऱ्या बाजूला सिंघू सीमेवरही पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे. या सर्व घडामोडींच्या संदर्भात मल्लिकार्जुन खरगे यांनी एक्सवर एक पोस्ट करत केंद्रावर निशाणा साधला.

मोदी सरकारने बळीराजाला वचने दिली, पण पूर्ण केली नाही

काटेरी तारा, ड्रोनमधून अश्रुधुराचा मारा, खिळे आणि बंदुका, शेतकऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी हुकुमशाही मोदी सरकारने ही सर्व व्यवस्था केली आहे. आंदोलनजीवी आणि परजीवी म्हणून बदनामी केली होती आणि ७५० शेतकऱ्यांचा जीव घेतला होता, याचे स्मरण आहे ना? गेल्या १० वर्षात मोदी सरकारने देशातील शेतकऱ्यांना दिलेली तीन आश्वासने पाळली नाहीत. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे. स्वामिनाथन अहवालानुसार ५० टक्के MSP ची किंमत आणि अंमलबजावणी करणे आणि MSPचा कायदा करणे. ६२ कोटी शेतकऱ्यांनी आवाज उठवण्याची वेळ आली आहे. काँग्रेस पक्ष छत्तीसगडच्या अंबिकापूरमध्ये शेतकरी न्यायासाठी आवाज उठवणार आहे. शेतकरी आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. घाबरणार नाही, झुकणार नाही, अशी पोस्ट मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. 

दरम्यान, किमान आधारभूत किमतीची कायदेशीर हमी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, शेतकरी आणि शेतमजुरांना पेन्शन, कर्जमाफी, गुन्हे मागे घेणे, लखीमपुर खिरी पीडितांना मदत करणे, भूसंपादन कायदा २०१३ ची पुनर्रचना करणे. मागील आंदोलनात मारल्या गेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देणे, अशा मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.  

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेFarmers Protestशेतकरी आंदोलनcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकार