शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

“मोदी सरकारने बळीराजाला वचने दिली, पण पूर्ण केली नाही”; मल्लिकार्जुन खरगेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 14:48 IST

Farmers Delhi Chalo March: शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे, असे मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे.

Farmers Delhi Chalo March: किमान आधारभूत किमतीसाठी कायदा करण्याच्या प्रमुख मागणीसाठी पंजाब आणि हरियाणातील हजारो शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा राजधानी दिल्लीच्या दिशेने कूच केली आहे. हजारो शेतकरी त्यांचे ट्रॅक्टर, ट्रक घेऊन दिल्लीच्या वेशीवर धडकले आहेत. केंद्र सरकारने विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरली. यानंतर आता शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र केले आहे. यावरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे.

शेतकरी दिल्लीतील शंभू सीमेवर येऊन धडकले आहेत. पोलिसांनी शेतकऱ्यांना पुढे जाण्यास मज्जाव केला आहे. आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आहेत. शेकडो शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. दुसऱ्या बाजूला सिंघू सीमेवरही पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे. या सर्व घडामोडींच्या संदर्भात मल्लिकार्जुन खरगे यांनी एक्सवर एक पोस्ट करत केंद्रावर निशाणा साधला.

मोदी सरकारने बळीराजाला वचने दिली, पण पूर्ण केली नाही

काटेरी तारा, ड्रोनमधून अश्रुधुराचा मारा, खिळे आणि बंदुका, शेतकऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी हुकुमशाही मोदी सरकारने ही सर्व व्यवस्था केली आहे. आंदोलनजीवी आणि परजीवी म्हणून बदनामी केली होती आणि ७५० शेतकऱ्यांचा जीव घेतला होता, याचे स्मरण आहे ना? गेल्या १० वर्षात मोदी सरकारने देशातील शेतकऱ्यांना दिलेली तीन आश्वासने पाळली नाहीत. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे. स्वामिनाथन अहवालानुसार ५० टक्के MSP ची किंमत आणि अंमलबजावणी करणे आणि MSPचा कायदा करणे. ६२ कोटी शेतकऱ्यांनी आवाज उठवण्याची वेळ आली आहे. काँग्रेस पक्ष छत्तीसगडच्या अंबिकापूरमध्ये शेतकरी न्यायासाठी आवाज उठवणार आहे. शेतकरी आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. घाबरणार नाही, झुकणार नाही, अशी पोस्ट मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. 

दरम्यान, किमान आधारभूत किमतीची कायदेशीर हमी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, शेतकरी आणि शेतमजुरांना पेन्शन, कर्जमाफी, गुन्हे मागे घेणे, लखीमपुर खिरी पीडितांना मदत करणे, भूसंपादन कायदा २०१३ ची पुनर्रचना करणे. मागील आंदोलनात मारल्या गेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देणे, अशा मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.  

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेFarmers Protestशेतकरी आंदोलनcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकार