शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

“मोदींसोबत नाही, त्याला जेलमध्ये टाका हेच धोरण”; हेमंत सोरेन कारवाईवरून काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 13:48 IST

Congress Vs Central Govt: ईडीने हेमंत सोरेन यांच्यावर केलेल्या कारवाईवरून काँग्रेसने केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे.

Congress Vs Central Govt: कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने हेमंत सोरेन यांच्यावर अखेर अटकेची कारवाई केली आहे. ईडीकडून अटकेच्या हालचाली सुरू झाल्यानंतर हेमंत सोरेन यांनी राज्यपालांकडे जात मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देऊन सोरेन हे घरी पोहोचताच ईडीने त्यांना अटक केली. यावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. जे लोक पंतप्रधान मोदी यांच्यासोबत नाहीत, त्यांना जेलमध्ये टाकण्याचे काम केले जात आहे, असे सांगत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रावर निशाणा साधला.

मल्लिकार्जुन खरगे यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये मोदींसोबत नाही, त्याला जेलमध्ये टाका हेच सुरू आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना राजीनामा द्यायला भाग पाडणे हे संघराज्य पद्धतीला धक्का लावण्यासारखे आहे. पीएमएलए कायद्याच्या तरतुदी चुकीच्या पद्धतीने कठोर करून विरोधी पक्षाच्या नेत्यांना भीती घालणे, धमकावणे हे सर्व भाजपाच्या टूलकिटचा भाग आहे. कट-कारस्थान करून विरोधी पक्षाच्या सरकारना कमकुवत करण्याचे काम भाजपा करत आहे. भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये जो गेला, स्वच्छ चारित्र्याचा आणि भाजपासोबत न जाणाऱ्यांवर विविध आरोप करून प्रतिमा डागाळण्याचे काम केले जात आहे. या हुकुमशाही प्रवृत्तीपासून लोकशाही वाचवायची असेल तर भाजपाला पराभूत करणे हाच पर्याय आहे. आम्ही घाबरत नाही. रस्त्यांपासून संसदेपर्यंत लढत राहू, या शब्दांत मल्लिकार्जुन खरगे यांनी हल्लाबोल केला. 

भाजपा सत्तेच्या धुंदीत लोकशाही संपवण्याचे अभियान राबवत आहे

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत भाजपावर टीका केली आहे. ईडी, सीबीआय, आयटी या आता सरकारी संस्था राहिलेल्या नाहीत, आता त्या भाजपाच्या विरोधी पक्षांना संपवण्याच्या संस्था बनल्या आहेत. भ्रष्टाचारात बुडालेला भाजपाच सत्तेच्या नशेत लोकशाही नष्ट करण्याचे अभियान राबवत आहे, या शब्दांत राहुल गांधी यांनी टीकास्त्र सोडले.

दरम्यान, हेमंत सोरेन यांनी राजीनामा दिला असला आणि राज्यपालांनी तो मंजूर केला असला तरी सध्या झारखंडच्या काळजीवाहू मुख्यमंत्रिपदी तेच आहेत. घटनात्मकदृष्ट्या हे पद रिक्त राहणे योग्य नसल्याने जोपर्यंत नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होत नाही, तोपर्यंत ते या पदावर राहतील. या सर्व घडामोडींमुळे झारखंडमध्ये राजकीय संकट उभे राहिले आहे. हेमंत सोरेन हे राजीनामा देणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाने नवे मुख्यमंत्री म्हणून चंपई सोरेन यांचे नाव निश्चित केले. तसेच राज्यपालांकडे सरकार बनवण्यासाठीचा दावाही सादर केला होता. मात्र राज्यपालांनी नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही.  

टॅग्स :congressकाँग्रेसJharkhandझारखंडEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेRahul Gandhiराहुल गांधी