शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

सोनिया गांधी ठरल्या नितीशकुमारांसाठी किंगमेकर; एका खेळीने राजकीय दिग्गज पाहातच राहिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 11:03 IST

काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये राजकीय परिवर्तनाची पटकथा शिष्टाचार भेटीने लिहिली गेली.

- एस. पी. सिन्हापाटणा : बिहारमध्ये राजकीय चित्र बदलण्याच्या नितीशकुमार यांच्या प्रयत्नांमध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्याच पुढाकाराने नितीशकुमार यांना पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळाले, असे सूत्रांनी सांगितले.तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री करावे, असा माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा आग्रह होता. त्यानंतर नितीशकुमार यांनी सोनिया गांधी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून मदत मागितली. आधी तर सोनिया गांधी यांनी इन्कार केला; परंतु नंतर नितीशकुमार यांनी अनेकवेळा विनंती केल्यावर बिहारमधील चित्र बदलले.

काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये राजकीय परिवर्तनाची पटकथा शिष्टाचार भेटीने लिहिली गेली. नितीशकुमार यांनी सोनिया गांधी यांना फोन करुन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यानंतर राजकीय चर्चा केली व भाजपकडून येत असलेल्या दबावाचा उल्लेख केला. यावर सोनिया गांधी यांनी राहुल गांधी यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. राहुल यांच्याशी संपर्क साधण्याची जबाबदारी नितीशकुमार यांनी तेजस्वी यादव यांच्यावर सोपविली. तेजस्वी यादव यांनी तत्काळ राहुल गांधी यांच्याशी संपर्क साधला. 

राजकीय दिग्गज पाहातच राहिले

बिहारचे राजकीय चित्र बदलासाठी नितीशकुमार एवढे बहुमत घेऊ इच्छित होते की, भाजपने कोणत्याही स्थितीत सरकार पाडता कामा नये. नितीशकुमार हे जदयू, राजद, डावे पक्ष व काँग्रेस मिळून १६४ ची संख्या पूर्ण होईपर्यंत शांत राहिले व संधी मिळताच खेळी खेळली. याबाबत भाजपला खबरही लागू दिली नाही. संपूर्ण तयारी झाल्यावर आरसीपी सिंह यांचा मुद्दा पुढे करून नितीशकुमार यांनी भाजपची साथ सोडली व राजकीय दिग्गज पाहतच राहिले.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारSonia Gandhiसोनिया गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस