शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

काँग्रेस नेत्यांनी जनतेच्या हक्कांसाठी लढावे; राहुल गांधी यांचा नाराज नेत्यांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 5:20 AM

पक्षातील नाराज २३ नेत्यांचे नाव न घेता राहुल गांधी यांनी त्यांना हा टोला लगावला.

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षातील नेत्यांनी आपापसात भांडत बसण्यापेक्षा, लोकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी काँग्रेसने लढावे, असे जनतेला वाटते असे उद्गार काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी काढले. त्या पक्षातील नाराज २३ नेत्यांचे नाव न घेता राहुल गांधी यांनी त्यांना हा टोला लगावला.काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत ते म्हणाले की, कोणती व्यक्ती कोणत्या पदावर आहे याला जनतेच्या लेखी फारसे महत्व नाही. त्यापेक्षा लोकशाहीला, राज्यघटनेला वाचविण्यासाठी तसेच लोकांच्या हक्कांच्या रक्षणासाठी काँग्रेसने एकजुटीने लढा उभारला आहे हे चित्र पाहाण्यात जनतेला अधिक रस आहे. अमरिंदरसिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या जागी चरणजितसिंग चन्नी यांची निवड करण्यात आली. हा निर्णय सोनिया गांधी यांनी दूरध्वनीवरून कळविताच चन्नी यांच्या डोळ्यात अश्रू तरळले, अशी आठवणही राहुल गांधी यांनी सांगितली.राहुल गांधी म्हणाले की, एखाद्याचे मत न ऐकणे ही देखील अस्पृश्यताच आहे. दलित, आदिवासी, ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती आदी लोकांचेही मत मोदी सरकार जाणून घेत नाही. भाजप व रा. स्व. संघाला समाजात दुही निर्माण करायची आहे.डोळ्यांत अश्रू तरळले : चरणजितसिंग चन्नीचरणजितसिंग चन्नी म्हणाले की, दलित समाजातील असलेल्या व अतिशय सामान्य परिस्थितीतून वर आलेल्या माझ्यासारख्या माणसाने मुख्यमंत्री होण्याची कधी स्वप्ने बघणे शक्यच नव्हते. पण राहुल गांधी व सोनिया गांधी यांच्यामुळेच मी पंजाबचा मुख्यमंत्री होऊ शकलो. मला मुख्यमंत्री करण्यात येणार असल्याचा निर्णय सोनिया गांधी यांनी कळविताच माझ्या डोळ्यांत अश्रू तरळले होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस