शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

राहुल, प्रियांका गांधींना मृत आंदोलकांच्या कुटुंबीयांना भेटण्यासापासून रोखलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 14:55 IST

पोलिसांनी त्यांना मेरठ शहराबाहेरच रोखलं आणि मृत कुटुंबीयांना भेटण्यास नकार देण्यात आला आहे.

नवी दिल्ली: सीएए आणि एनआरसी विरोधातील आंदोलनात जीव गमावलेल्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि महासचिव प्रियांका गांधी उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये दाखल झाले होते. मात्र त्यांना पोलिसांनी त्यांना मेरठ शहराबाहेरच रोखलं आणि मृत कुटुंबीयांना भेटण्यास नकार देण्यात आला आहे. यानंतर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी पुन्हा दिल्लीकडे रवाना झाले आहे.

मृत कुटुंबीयांना भेटण्यापासून आम्हाला रोखण्याचे कोणतेच आदेश पोलिसांकडे नाहीत. तरी देखील पोलीस अडवणूक करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केली आहे.

 

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करण्यासाठी उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यात आंदोलन करण्यात येत आहे. तसेच आंदोलनादरम्यान विविध ठिकाणी हिंसाचार देखील घडले आहे. यानंतर पोलिसांनी सहा ते सात शहरांध्ये गोळीबार केल्याने 6 आंदोलकांचा मृत्यू, तर 12 जण जखमी झाले होते. यामध्ये मुझफ्फरनगरमध्ये दोन जण तर मेरठ व फिरोजाबादमध्ये मिळून चार जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.  याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी आज मृतांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी मेरठला रवाना झाले होते. मात्र मेरठ पोलिसांकडून कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याचे कारण सांगत राहुल गांधी व प्रियांका गांधी यांना शहराबाहेरचं रोखण्यात आले.  

सरकारने ठिकठिकाणी इंटरनेट सेवा बंद केली आहे. पण वृत्तवाहिन्यांवरून लोक आंदोलने पाहत आहेत. त्यामुळे वृत्तवाहिन्यांनीही संयम बाळगावा, यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासंदर्भात सल्ला व सूचना जारी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

देशभर पसरत चाललेले आंदोलन पाहून केंद्र सरकारने आता आंदोलकांशी चर्चा करण्याची तयारी चालविली आहे. आंदोलकांनी पुढे यावे आणि आमच्याशी चर्चा करावी, आम्ही त्यांचे म्हणणे ऐकायला तयार आहोत, अशी भूमिका मोदी सरकारने घेतली आहे. सुधारित नागरिकत्व कायदा केला असला तरी त्याचे नियम तयार झालेले नाहीत. त्यामुळे अंमलबजावणीपूर्वी आम्ही सर्व संबंधितांचे म्हणणे ऐकू, असे सरकारने म्हटले आहे. मात्र अशा चर्चेसाठी सरकारने कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक