शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

“नवीन काही नाही, ९० टक्के तेच आहे”; नवे फौजदारी कायदे लागू, वकील अभिषेक मनु सिंघवींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 15:14 IST

Abhishek Manu Singhvi Reaction on 3 New Criminal Law: तीन नवे फौजदारी कायदे म्हणजे प्रलंबित याचिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा घाट घातलेला आहे. सरकाने स्वतःची वेगळी छाप पाडण्याचा व्यर्थ प्रयत्न केल्याची टीका अभिषेक मनु सिंघवी यांनी केली.

Abhishek Manu Singhvi Reaction on 3 New Criminal Law: देशभरात नवे फौजदारी कायदे लागू होत आहेत. भारतीय दंड संहिता (आयपीसी) मध्ये ५११ कलमे होती. मात्र, आता भारतीय न्याय संहितेत ३५८ कलमे आहेत. गुन्हेगारी कायद्यात बदलांसह यातील कलमांचा क्रमही बदलण्यात आला आहे.  तीन नवीन कायदे भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम याप्रमाणे संबोधले जाणार आहेत. यावरून काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी तीव्र नाराजी व्यक्त करत टीका केली आहे. 

पत्रकारांशी बोलताना अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, या तीन नवीन कायद्यांबाबत ज्या दिवशी राज्यसभेत चर्चा सुरू होती, त्या दिवशी प्रमुख वक्ता होतो. मात्र, तेव्हा अनेक खासदारांच्या निलंबनामुळे माझे भाषण रद्द करण्यात आले. या तीन कायद्यांचा अभ्यास केला, काही गोष्टींचे संशोधन केले. तेव्हा मला असे आढळून आले की, हे दुसरे काहीही नाही. यात नवीन काही नाही. केवळ आपली छाप पाडण्याचा केलेला व्यर्थ प्रयत्न आहे.  दुर्दैवाने, कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहे. काही कलमे काढून टाकली आहेत. काही कलमांच्या क्रमात बदल केलेला आहे. ९० टक्के त्याच सगळ्या गोष्टी आहेत. काही शब्द इकडे तिकडे बदलले आणि या सरकारने नवीन कायद्यांचा संच म्हणून पुन्हा लागू केले आहे, अशी टीका सिंघवी यांनी केली. 

देशभरातील कनिष्ठ न्यायालयात साडेतीन ते चार कोटी प्रकरणे प्रलंबित

एक गोष्ट संपूर्णपणे दुर्लक्षित करण्यात आली आहे. ती म्हणजे आपल्या न्यायालयातील न्यायाधीश प्रलंबित प्रकरणांशी झडगत आहेत. देशभरातील कनिष्ठ न्यायालयात साडेतीन ते चार कोटी प्रकरणे प्रलंबित आहेत, उच्च न्यायालयांमध्ये ६० लाखांच्या घरात प्रकरणे प्रलंबित आहेत. तर सर्वोच्च न्यायालयात ७५ ते ८० हजार प्रकरणे प्रलंबित आहेत. तुम्ही एक स्वल्पविराम किंवा पूर्णविराम बदलल्यामुळे गेल्या १०० वर्षातील केस लॉस आहेत, त्यात सगळ्यात बदल घडतो. नवीन फौजदारी कायद्यामुळे तुम्ही प्रलंबित याचिकांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढवण्याला प्रोत्साहन देत आहात आणि याच गोष्टीची मला जास्त काळजी वाटते, असे सिंघवी यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, नवीन कायद्यांमुळे न्यायालयीन व्यवस्थेत बदलांसह तांत्रिक प्रगती होत आहे. न्यायालयीन प्रक्रियेतील विलंब कमी होऊन ऑनलाइन फाईलिंग, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्षीदारांचे म्हणणे ऐकण्यावर भर देण्यात येईल. काश्मीर ते कन्याकुमारी व द्वारका ते आसामपर्यंत संपूर्ण देशात एकच न्यायव्यवस्था लागू होईल. 

टॅग्स :Courtन्यायालयadvocateवकिलcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकार