शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

राहुल गांधींच्या शिक्षा स्थगितीसाठी अपील कुठे करायचे यावर खल; दिलासा मिळवण्यासाठी धडपड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 10:08 IST

सर्वोच्च न्यायालय, हायकोर्ट की सुरत न्यायालय

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेला स्थगिती मिळविण्यासाठी त्यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी व अन्य कायदेतज्ज्ञ प्रयत्नशील आहेत. या प्रकरणी थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागायची की सुरतच्या सत्र न्यायालयासमोर अपील करायचे यावर गांधी यांच्या वकिलांचा खल सुरू आहे. सत्र न्यायालयाने अपीलावर दिलासा न दिल्यास गुजरात उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेण्याचाही विचार आहे. 

सुरतच्या न्यायालयाने कारावासाची शिक्षा सुनावल्यामुळे राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाले. उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना दिलासा न दिल्यास त्यांच्यापुढील अडचणी वाढणार आहेत. त्यांच्यावर विविध प्रकरणांत पाटणा, गुवाहाटी, मुंबई, झारखंड, लखनऊ, दिल्ली येथील न्यायालयांत सहाहून अधिक खटले सुरू आहेत. २०१५ पासून सुरू असलेले खटल्यांचा निकाल यावर्षी लागावा यासाठी संबंधित राज्ये प्रयत्नशील आहेत.

८ तुघलक लेन बंगला सोडावा लागण्याची शक्यता

काँग्रेस नेते राहुल गांधी हे ८ तुघलक लेन बंगल्यात राहात असून तो बंगला त्यांनी रिकामा करावा यासाठी केंद्रीय नागरी विकास व गृहनिर्माण मंत्रालय हालचाली करण्याची शक्यता आहे. त्यांनी हा बंगला १५ दिवसांत रिकामा करावा असे त्यांना केंद्र सरकारकडून सांगण्यात येईल अशी चर्चा आहे.

वायनाडमध्ये पोटनिवडणूक होणार? 

वायनाडमध्ये पाेटनिवडणुकीची शक्यता आहे. विद्यमान लोकसभेची मुदत जून २०२४मध्ये संपणार आहे. लोकसभेची जागा रिक्त झाल्यावर एक वर्षांपेक्षा अधिक काळानंतर सार्वत्रिक निवडणूक होणार असेल तर त्या मतदारसंघात पोटनिवडणुक घेणे अनिवार्य आहे. राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला तरीही त्यांचे लोकसभा सदस्यत्व आपोआप बहाल होणार नाही. 

राहुल गांधींवरील काही प्रमुख खटले

मोदी आडनावाबद्दल जे उद्गार काढले त्याबाबतच त्यांच्यावर पाटणा येथेही खटला भरण्यात आला आहे. २०१६ मध्ये नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर अहमदाबाद जिल्हा सहकारी बँक गुंतली असल्याचा आरोप केल्याप्रकरणी  राहुल गांधी बँकेने त्यांच्यावर बदनामीचा खटला भरला.पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येशी भाजप-रा.स्व. संघ विचारसरणीचा संबंध जोडल्याबद्दल संघाच्या स्वयंसेवकाने राहुल गांधींवर बदनामीचा खटला दाखल केला. महात्मा गांधी यांची हत्या रा.स्व. संघाने केली, असा आरोप केल्यामुळे भिवंडी येथील न्यायालयात खटला दाखल आहे. ‘नॅशनल हेरॉल्ड’ प्रकरणात काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधी यांना डिसेंबर २०१५ मध्ये जामीन मंजूर झाला आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीCourtन्यायालयcongressकाँग्रेस