शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

राहुल गांधींच्या शिक्षा स्थगितीसाठी अपील कुठे करायचे यावर खल; दिलासा मिळवण्यासाठी धडपड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 10:08 IST

सर्वोच्च न्यायालय, हायकोर्ट की सुरत न्यायालय

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेला स्थगिती मिळविण्यासाठी त्यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी व अन्य कायदेतज्ज्ञ प्रयत्नशील आहेत. या प्रकरणी थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागायची की सुरतच्या सत्र न्यायालयासमोर अपील करायचे यावर गांधी यांच्या वकिलांचा खल सुरू आहे. सत्र न्यायालयाने अपीलावर दिलासा न दिल्यास गुजरात उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेण्याचाही विचार आहे. 

सुरतच्या न्यायालयाने कारावासाची शिक्षा सुनावल्यामुळे राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाले. उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना दिलासा न दिल्यास त्यांच्यापुढील अडचणी वाढणार आहेत. त्यांच्यावर विविध प्रकरणांत पाटणा, गुवाहाटी, मुंबई, झारखंड, लखनऊ, दिल्ली येथील न्यायालयांत सहाहून अधिक खटले सुरू आहेत. २०१५ पासून सुरू असलेले खटल्यांचा निकाल यावर्षी लागावा यासाठी संबंधित राज्ये प्रयत्नशील आहेत.

८ तुघलक लेन बंगला सोडावा लागण्याची शक्यता

काँग्रेस नेते राहुल गांधी हे ८ तुघलक लेन बंगल्यात राहात असून तो बंगला त्यांनी रिकामा करावा यासाठी केंद्रीय नागरी विकास व गृहनिर्माण मंत्रालय हालचाली करण्याची शक्यता आहे. त्यांनी हा बंगला १५ दिवसांत रिकामा करावा असे त्यांना केंद्र सरकारकडून सांगण्यात येईल अशी चर्चा आहे.

वायनाडमध्ये पोटनिवडणूक होणार? 

वायनाडमध्ये पाेटनिवडणुकीची शक्यता आहे. विद्यमान लोकसभेची मुदत जून २०२४मध्ये संपणार आहे. लोकसभेची जागा रिक्त झाल्यावर एक वर्षांपेक्षा अधिक काळानंतर सार्वत्रिक निवडणूक होणार असेल तर त्या मतदारसंघात पोटनिवडणुक घेणे अनिवार्य आहे. राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला तरीही त्यांचे लोकसभा सदस्यत्व आपोआप बहाल होणार नाही. 

राहुल गांधींवरील काही प्रमुख खटले

मोदी आडनावाबद्दल जे उद्गार काढले त्याबाबतच त्यांच्यावर पाटणा येथेही खटला भरण्यात आला आहे. २०१६ मध्ये नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर अहमदाबाद जिल्हा सहकारी बँक गुंतली असल्याचा आरोप केल्याप्रकरणी  राहुल गांधी बँकेने त्यांच्यावर बदनामीचा खटला भरला.पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येशी भाजप-रा.स्व. संघ विचारसरणीचा संबंध जोडल्याबद्दल संघाच्या स्वयंसेवकाने राहुल गांधींवर बदनामीचा खटला दाखल केला. महात्मा गांधी यांची हत्या रा.स्व. संघाने केली, असा आरोप केल्यामुळे भिवंडी येथील न्यायालयात खटला दाखल आहे. ‘नॅशनल हेरॉल्ड’ प्रकरणात काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधी यांना डिसेंबर २०१५ मध्ये जामीन मंजूर झाला आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीCourtन्यायालयcongressकाँग्रेस