शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
3
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
4
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
5
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
6
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  
7
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
8
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
9
गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल
10
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
11
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
12
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
13
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
14
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
15
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
16
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
17
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
18
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
19
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
20
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?

'देशाच्या सुरक्षेशी खेळ, मिस्टर 56 इंच घाबरले'; राहुल गांधींची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 3:30 PM

'हिंदुत्व आणि हिंदू धर्म भिन्न आहेत, भाजप-आरएसएसने भारतात द्वेष पसरवला.'

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. मोदी सरकारकडे सुरक्षेबाबत कोणतीही रणनीती नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येत असून, सीमेवर प्राणाची बाजी लावून सैनिक देशाचे रक्षण करत आहेत. तर सरकार खोट बोलत आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

ट्विटरवर या संदर्भात पोस्ट करत त्यांनी लिहिले की, 'मोदी सरकारकडे कोणतीही रणनीती नाही. आपल्या राष्ट्रीय सुरक्षेशी गुन्हेगारी खेळ केला जात आहे. ते Mr. 56 इंच घाबरले आहेत. सरकार खोट बोलत आहे. माझ्या संवेदना आपल्या जीवावर खेळून सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसोबत आहेत', अशा आशयाचे ट्वीट त्यांनी केले.

'हिंदू धर्म आणि हिंदुत्व वेगळे आहेत' 

तत्पूर्वी, राहुल गांधी यांनी आज(शुक्रवार) पक्षाच्या डिजीटल 'जन जागरण अभियाना'चे उद्घाटन केले. या दरम्यान त्यांनी हिंदू धर्म आणि हिंदूत्व वेगवेगळ्या असल्याचं मत मांडलं. आज लोक हिंदू धर्म आणि हिंदुत्वाला एकच समजू लागले आहेत. मात्र, वास्तवात या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. तुम्ही हिंदू असाल तर तुम्हाला हिंदुत्वाची काय गरज? भाजप-आरएसएसने भारतात द्वेष पसरवला आहे. आमची विचारधारा ही प्रेम आणि बंधुभावाची आहे. 

भारतात काँग्रेसची विचारधारा गरजेचीराहुल गांधी पुढे म्हणाले की, भारतात दोन विचारधारा आहेत, एक काँग्रेस पक्षाची आणि एक आरएसएसची विचारधारा. आजच्या भारतात भाजप-आरएसएसने द्वेष पसरवला आहे आणि एकता, बंधुता आणि प्रेमाची काँग्रेसची विचारधारा भाजपच्या द्वेषी विचारसरणीने झाकोळली आहे, हे मान्य करावेच लागेल. 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ