शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
2
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
3
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
4
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
5
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
6
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
7
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
8
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
9
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
10
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
11
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
12
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
13
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
14
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
15
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
16
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
17
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
18
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
19
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
20
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा

लक्ष्मी, दुर्गा, सरस्वती यांची शक्ती घटली...; RSS-BJP विरोधात हे काय बोलून गेले राहुल गांधी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2021 17:40 IST

भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या, नोटाबंदी आणि जीएसटीच्या धोरणाने देशातील देवी लक्ष्मीची शक्ती कमी केली आहे. तसेच, नव्या कृषी कायद्यांमुळे देवी दुर्गाची शक्ती कमी केली आहे, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

नवी दिल्ली - काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्ष (BJP) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) जम्मू-काश्मीरमधील मिश्र संस्कृती नष्ट केल्याचा आरोप केला आहे. या दोन्ही संघटना लोकांमधील प्रेम आणि बंधुत्व नष्ट करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नुकतेच माता वैष्णो देवीचे दर्शन घेऊन परतलेल्या राहुल गांधींनी भाजप आणि संघावर निशाणा साधला आणि देवी लक्ष्मी, दुर्गा आणि सरस्वती यांची शक्ती कमी झाली आहे, असेही म्हटले आहे. (congress leader Rahul gandhi says modi gov policy decreased the power of goddess laxmi durga and saraswati)

राहुल गांधी यांनी, गुलाम नबी आझाद यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत जम्मूच्या त्रिकुटा नगर येथे कार्यकर्त्यांना आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. ते म्हणाले, "तुम्हा लोकांमधील प्रेम आणि बंधुभाव भाजप आणि आरएसएसकडून संपवला जात आहे. त्यांना जम्मू -काश्मीरमधील सर्वसमावेशक संस्कृती नष्ट करायची आहे. तुम्हाला कमकुवत करायची त्यांची इच्छा आहे. आपण स्वतःच पाहू शकता, की केंद्र शासित प्रदेशातील अर्थव्यवस्था, पर्यटन आणि व्यवसायावर वाईट परिणाम झाला आहे.''

"राहुल गांधी हे सध्याच्या भारतीय राजकारणातील 'राजकीय कुक्कू'"; भाजपाची बोचरी टीका

राहुल गांधी म्हणाले, देवी दुर्गा रक्षण करणाऱ्या शक्तीचे प्रतीक आहे, देवी लक्ष्मी एखादे ध्येय साध्य करण्यासाठीच्या शक्तीचे प्रतीक आहे, तर देवी सरस्वती ज्ञानाची शक्ती आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या, नोटाबंदी आणि जीएसटीच्या धोरणाने देशातील देवी लक्ष्मीची शक्ती कमी केली आहे. याशिवाय, नव्या कृषी कायद्यांमुळे देवी दुर्गाची शक्ती कमी केली आहे, असा दावाही त्यांनी केला आहे. एवढेच नाही, तर  "जेव्हा भाजप आणि आरएसएसच्या कुण्या व्यक्तीची शिक्षण संस्थांमध्ये नियुक्ती केली जाते, तेव्हा देवी सरस्वतीची शक्ती कमी होते," असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, "देशावरील दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती यांचा आशीर्वाद कमी झाला आहे. "काल मी मंदिरात (वैष्णो देवी) गेलो, तेथे मला तीन देवी दिसल्या. दुर्गाजी, लक्ष्मीजी आणि सरस्वतीजी. दुर्गा हा शब्द 'दुर्ग' या शब्दापासून बनला आहे आणि देवी दुर्गा म्हणजे संरक्षण करणारी शक्ती आहे. देवी लक्ष्मी ही एक अशी शक्ती आहे, जी एखादे ध्येय साध्य करण्यास मदत करते. तर देवी सरस्वती शिक्षण आणि ज्ञानाची शक्ती आहे. जेव्हा देशात या तीनही शक्ती असतात तेव्हा देश समृद्ध होतो,'' असेही राहुल गांधी म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघcongressकाँग्रेसJammu Kashmirजम्मू-काश्मीर