शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

लक्ष्मी, दुर्गा, सरस्वती यांची शक्ती घटली...; RSS-BJP विरोधात हे काय बोलून गेले राहुल गांधी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2021 17:40 IST

भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या, नोटाबंदी आणि जीएसटीच्या धोरणाने देशातील देवी लक्ष्मीची शक्ती कमी केली आहे. तसेच, नव्या कृषी कायद्यांमुळे देवी दुर्गाची शक्ती कमी केली आहे, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

नवी दिल्ली - काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्ष (BJP) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) जम्मू-काश्मीरमधील मिश्र संस्कृती नष्ट केल्याचा आरोप केला आहे. या दोन्ही संघटना लोकांमधील प्रेम आणि बंधुत्व नष्ट करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नुकतेच माता वैष्णो देवीचे दर्शन घेऊन परतलेल्या राहुल गांधींनी भाजप आणि संघावर निशाणा साधला आणि देवी लक्ष्मी, दुर्गा आणि सरस्वती यांची शक्ती कमी झाली आहे, असेही म्हटले आहे. (congress leader Rahul gandhi says modi gov policy decreased the power of goddess laxmi durga and saraswati)

राहुल गांधी यांनी, गुलाम नबी आझाद यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत जम्मूच्या त्रिकुटा नगर येथे कार्यकर्त्यांना आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. ते म्हणाले, "तुम्हा लोकांमधील प्रेम आणि बंधुभाव भाजप आणि आरएसएसकडून संपवला जात आहे. त्यांना जम्मू -काश्मीरमधील सर्वसमावेशक संस्कृती नष्ट करायची आहे. तुम्हाला कमकुवत करायची त्यांची इच्छा आहे. आपण स्वतःच पाहू शकता, की केंद्र शासित प्रदेशातील अर्थव्यवस्था, पर्यटन आणि व्यवसायावर वाईट परिणाम झाला आहे.''

"राहुल गांधी हे सध्याच्या भारतीय राजकारणातील 'राजकीय कुक्कू'"; भाजपाची बोचरी टीका

राहुल गांधी म्हणाले, देवी दुर्गा रक्षण करणाऱ्या शक्तीचे प्रतीक आहे, देवी लक्ष्मी एखादे ध्येय साध्य करण्यासाठीच्या शक्तीचे प्रतीक आहे, तर देवी सरस्वती ज्ञानाची शक्ती आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या, नोटाबंदी आणि जीएसटीच्या धोरणाने देशातील देवी लक्ष्मीची शक्ती कमी केली आहे. याशिवाय, नव्या कृषी कायद्यांमुळे देवी दुर्गाची शक्ती कमी केली आहे, असा दावाही त्यांनी केला आहे. एवढेच नाही, तर  "जेव्हा भाजप आणि आरएसएसच्या कुण्या व्यक्तीची शिक्षण संस्थांमध्ये नियुक्ती केली जाते, तेव्हा देवी सरस्वतीची शक्ती कमी होते," असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, "देशावरील दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती यांचा आशीर्वाद कमी झाला आहे. "काल मी मंदिरात (वैष्णो देवी) गेलो, तेथे मला तीन देवी दिसल्या. दुर्गाजी, लक्ष्मीजी आणि सरस्वतीजी. दुर्गा हा शब्द 'दुर्ग' या शब्दापासून बनला आहे आणि देवी दुर्गा म्हणजे संरक्षण करणारी शक्ती आहे. देवी लक्ष्मी ही एक अशी शक्ती आहे, जी एखादे ध्येय साध्य करण्यास मदत करते. तर देवी सरस्वती शिक्षण आणि ज्ञानाची शक्ती आहे. जेव्हा देशात या तीनही शक्ती असतात तेव्हा देश समृद्ध होतो,'' असेही राहुल गांधी म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघcongressकाँग्रेसJammu Kashmirजम्मू-काश्मीर