शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीतील EVM स्ट्राँगरुमचे CCTV अचानक बंद झाल्याचा सुळेंचा आरोप; निवडणूक अधिकारी म्हणाले...
2
Rahul Gandhi : "सरकार स्थापन झालं तर खटा-खट, खटा-खट पैसे..."; राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
4
भाजपा उमेदवार माधवी लता आणखी एका वादात; मतदान केंद्रावर महिलांच्या चेहऱ्यावरून काढला बुरखा;ओळखपत्र तपासले
5
मतदानानंतर मोहन आगाशेंची राजकारणावर टिप्पणी, म्हणाले - "पाच मिनिटं मशीन वाचण्यात गेली..."
6
निलेश लंके हे सोशल मीडियाने निर्माण केलेलं वादळ, खरा चेहरा समोर आला; राधाकृष्ण विखेंचा हल्लाबोल
7
सावनी रविंद्रनंतर सुयश टिळकलाही बजावता आला नाही मतदानाचा हक्क, म्हणाला - "ह्याची खंत वाटते..."
8
पोलीस कॉन्स्टेबल वराला प्रेयसीने भर मंडपातून पळवले, दुसऱ्या तरुणीशी विवाह होण्यापूर्वी रंगला ड्रामा
9
पराभव समोर दिसू लागल्यानं खापर फोडण्याचं काम सुरू केलंय; सामंतांचा राऊतांना टोला
10
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
11
पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड मालिका म्हणजे क्लब क्रिकेट; PCB च्या माजी अध्यक्षाची टीका
12
PAK vs IRE: पहिल्या पराभवानंतर पाकिस्तानने लाज राखली; आयर्लंडची कडवी झुंज!
13
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार
14
राज ठाकरे सुपारीबाज, ही गर्जना भाजपानेच केली, आम्ही नाही; संजय राऊतांचा पलटवार
15
'१९४७ मध्ये धर्माच्या आधारावर पाकिस्तान बनला, मग भारत हिंदू राष्ट्र का नाही बनला?' कंगना राणौतचा सवाल
16
Sonia Gandhi : Video - "महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा
17
Shares to Pick : घसरत्या बाजारातही 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, कोणते आहेत 'हे' Stocks?
18
Narendra Modi : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा
19
अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का? मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर अमित शहांचे प्रत्युत्तर
20
Maharashtra Lok Sabha Election 2024 मराठी कलाविश्वातील या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन

लडाखमधील नागरिकांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले तर...; राहुल गांधींचे मोदी सरकारला आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2020 4:11 PM

नरेंद्र मोदींच्या लडाख दौऱ्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करुन केंद्र सरकारला एक आवाहन केले आहे.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी लडाख दौऱ्यावर गेले होते. नरेंद्र मोदींनी लेह लडाख सीमारेषेवर जाऊन देशातील जवानांचे मनोबल वाढविण्याचं काम केलं आहे. तसेच भारत आणि चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींचा लेह दैरा अतिशय महत्वाचा मानला जात आहे. नरेंद्र मोदींच्या लडाख दौऱ्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करुन केंद्र सरकारला एक आवाहन केले आहे.

राहुल गांधी यांनी लडाखमधील चिनी घुसखोरीविरोधात कृती करण्याची विनंती केंद्र सरकारला केली आहे. देशभक्त असलेले लडाखमधील नागरिक चिनी सैनिकांच्या घुसखोरीविरुद्ध आवाज उठवत आहे. त्यामुळे त्यांच्या या आवाजाकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष करु नये, त्या नागरिकांचे काय म्हणणे आहे हे ऐकायला हवे, अशी मागणी राहुल गांधी यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

राहुल गांधी यांनी ट्विटरवर एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये काही नागरिक चिनी घुसखोराबाबत बोलत आहे. तसेच चिनी सैनिकांची सुरु असलेली हालचालीचे काही फोटो देखील दाखवण्यात येत आहे. त्यामुळे लडाखच्या नागरिकांच्या इशाऱ्याकडे आपण दुर्लक्ष केले तर महागात पडू शकते. केंद्र सरकारने भारतासाठी त्यांचे म्हणणे ऐकावे, असं आवाहन राहुल गांधी यांनी केले आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदींनी शुक्रवारी अचानक लेह दौरा करुन सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला. नरेंद्र मोदी 11 हजार फुटावर असलेल्या लष्कराच्या नीमू पोस्टवर दाखल झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत सीडीएस बिपिन रावत आणि लष्करप्रमुख मुकूंद नरवणेही होते. 

लडाख सीमारेषेवरील भारतीय भूमीवर चीनने अतिक्रमण केल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या महिन्यात भारतीय सैन्यावर चीनने पाठीमागून हल्ला केला. यामध्ये 20 भारतीय जवान शहीद झाले तर चीनचे 40 हून अधिक जवान मारले गेले. यानंतर दोन्ही देशांच्या सीमेवर तणावाची स्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज थेट लेह गाठत सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. यावेळी, मोदींनी सैन्याला संबोधित करत, त्यांना धीर देत देशाची 130 कोटी जनता आपल्यासोबत असल्याचे म्हटलं आहे. आत्मनिर्भर भारताचा संकल्प आपल्या त्याग आणि बलिदानातूनच मजबूत होणार असल्याचे नरेंद्र मोदींनी म्हटले. 

देशवासियांना देशाच्या जवानांच्या पराक्रमाचा अभिमान आहे. आज मी माझ्या वाणीतून आपला जयघोष करतोय, गलवान घाटीत शहीद झालेल्या देशातील जवानांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. देशाच्या कानाकोपऱ्यातून भारतीय जवान आपलं शौर्य दाखवत आहेत. आज प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुगली आहे, देशवासियांनी आपल्यासमोर नतमस्तक केलंय. गलवान खोऱ्यातील नदी, पर्वत, खोऱ्यातील कानाकोपरा देशातील जवानांच्या पराक्रमाची गाथा गात आहे, असं नरेंद्र मोदींनी सांगितले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीladakhलडाखchinaचीनIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकारIndian Armyभारतीय जवान