शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

काँग्रेस तयार करणार सोशल मीडिया वॉरियर्स टीम, व्हिडिओ जारी करत राहुल गांधींनी केलं असं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 19:31 IST

रोहन गुप्ता म्हणाले, लोकशाही संस्थांना दाबले जात आहे. तसेच सरकारविरोधी आवाज उचलणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, याला उत्तर देणे आणि देश वाचविणे ही काँग्रेसची जबाबदारी आहे. (Rahul Gandhi)

नवी दिल्ली -काँग्रेसनेसोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चांगली पकड मिळविण्यासाठी कवायत सुरू केली आहे. यासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लोकांना सोशल मिडिया वॉरियर्स टीम जॉइन करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी त्यांनी टोल फ्री नंबरदेखील जारी केला आहे. व्हॉट्सअॅप, वेबसाईट आणि ईमेलच्या सहाय्यानेही या टीमचा भाग होता येऊ शकते.  (Congress Leader Rahul Gandhi message join the social media warrior team)

सोशल मिडिया वॉरियर्स टीमसंदर्भात राहुल गांधी म्हणाले, ही टीम न्यायासाठी लढणाऱ्या योद्ध्यांची आहे. ही द्वेश भावना ठेवणारी सेना नाही. ही हिंसाचार करणारी सेना नाही. ही सत्याची सेना आहे (army of truth). ही सेना भारताच्या विचारांचे रक्षण करेल. 

पक्षाचे वरिष्ठ नेते पवन कुमार बंसल, प्रवक्ते पवन खेडा आणि पक्षाचे सोशल मिडिया प्रमुख रोहन गुप्ता यांनी सोमवारी या अभियानाला सुरुवात केली. बंसल म्हणाले, प्रत्येक शहरातून 5 लाख सोशल मीडिया वॉरियर्स तयार करण्याचे या अभियानाचे लक्ष्य आहे. यांच्या माध्यमाने देशासमोरील मुद्दे उचलले जातील. तसेच या योद्ध्यांच्या माध्यमाने विचार आणि सिद्धांतांवर चर्चा होईल.

रोहन गुप्ता म्हणाले, लोकशाही संस्थांना दाबले जात आहे. तसेच सरकारविरोधी आवाज उचलणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, याला उत्तर देणे आणि देश वाचविणे ही काँग्रेसची जबाबदारी आहे.

तसेच, ते म्हणाले, की आम्ही शांत बसू शकत नाही. देशाचा आवाज उचलणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. यामुळेच आम्ही या अभियानाला सुरुवात करत आहोत. हे अभियान आम्ही एक महिना चालवणार आहोत. जेनेकरून लोक या अभियानाशी जोडले जातील.

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाSocial Mediaसोशल मीडिया