शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
8
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
9
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
10
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
11
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
12
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
13
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
14
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
17
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
18
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
19
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
20
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस तयार करणार सोशल मीडिया वॉरियर्स टीम, व्हिडिओ जारी करत राहुल गांधींनी केलं असं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 19:31 IST

रोहन गुप्ता म्हणाले, लोकशाही संस्थांना दाबले जात आहे. तसेच सरकारविरोधी आवाज उचलणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, याला उत्तर देणे आणि देश वाचविणे ही काँग्रेसची जबाबदारी आहे. (Rahul Gandhi)

नवी दिल्ली -काँग्रेसनेसोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चांगली पकड मिळविण्यासाठी कवायत सुरू केली आहे. यासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लोकांना सोशल मिडिया वॉरियर्स टीम जॉइन करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी त्यांनी टोल फ्री नंबरदेखील जारी केला आहे. व्हॉट्सअॅप, वेबसाईट आणि ईमेलच्या सहाय्यानेही या टीमचा भाग होता येऊ शकते.  (Congress Leader Rahul Gandhi message join the social media warrior team)

सोशल मिडिया वॉरियर्स टीमसंदर्भात राहुल गांधी म्हणाले, ही टीम न्यायासाठी लढणाऱ्या योद्ध्यांची आहे. ही द्वेश भावना ठेवणारी सेना नाही. ही हिंसाचार करणारी सेना नाही. ही सत्याची सेना आहे (army of truth). ही सेना भारताच्या विचारांचे रक्षण करेल. 

पक्षाचे वरिष्ठ नेते पवन कुमार बंसल, प्रवक्ते पवन खेडा आणि पक्षाचे सोशल मिडिया प्रमुख रोहन गुप्ता यांनी सोमवारी या अभियानाला सुरुवात केली. बंसल म्हणाले, प्रत्येक शहरातून 5 लाख सोशल मीडिया वॉरियर्स तयार करण्याचे या अभियानाचे लक्ष्य आहे. यांच्या माध्यमाने देशासमोरील मुद्दे उचलले जातील. तसेच या योद्ध्यांच्या माध्यमाने विचार आणि सिद्धांतांवर चर्चा होईल.

रोहन गुप्ता म्हणाले, लोकशाही संस्थांना दाबले जात आहे. तसेच सरकारविरोधी आवाज उचलणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, याला उत्तर देणे आणि देश वाचविणे ही काँग्रेसची जबाबदारी आहे.

तसेच, ते म्हणाले, की आम्ही शांत बसू शकत नाही. देशाचा आवाज उचलणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. यामुळेच आम्ही या अभियानाला सुरुवात करत आहोत. हे अभियान आम्ही एक महिना चालवणार आहोत. जेनेकरून लोक या अभियानाशी जोडले जातील.

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाSocial Mediaसोशल मीडिया