शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
3
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
4
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
5
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
6
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
7
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
8
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
9
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
10
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
11
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
12
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
13
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
14
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
15
महापालिका डायरी: होर्डिंगसाठी बीएमसीची परवानगी तर घ्यावी लागेलच!
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

नोकरी मागितल्यावर मोदी सरकार तरुणांना देशद्रोही ठरवतंय; राहुल गांधींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 2:30 PM

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (rahul gandhi) यांनी पुन्हा एकदा केंद्रातील पंतप्रधान मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

ठळक मुद्देराहुल गांधी यांची पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीकाबेरोजगारीवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल#StudentsWantJobs या हॅशटॅगचा वापर

नवी दिल्ली : देशात आताच्या घडीला बेरोजगारी हा सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा असल्याचे पाहायला मिळत आहे. सन २०१९ मध्ये कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढलेल्या प्रादुर्भावामुळे देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर बेरोजगारीची समस्या आणखी तीव्र झाल्याचे पाहायला मिळाले. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (rahul gandhi) यांनी पुन्हा एकदा केंद्रातील पंतप्रधान मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. नोकरी मागितल्यावर तरुणांना हे मोदी सरकार देशद्रोही ठरवत आहे, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला. (congress leader rahul gandhi criticised modi govt over unemployment)

राहुल गांधी यांनी एक ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली. गेल्या अनेक दिवसांपासून राहुल गांधी विविध विषयांवरून मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करीत आहेत. शुक्रवारी सकाळी केलेल्या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी #StudentsWantJobs या हॅशटॅगचा वापर करत विद्यार्थ्यांना नोकरी पाहिजे, मात्र सरकार पोलिसांच्या छड्या, वॉटर गनचा वापर, देशद्रोह्याचा शिक्का आणि बेरोजगारी देत आहे, अशी टीका त्यांनी केली. 

भारत आता लोकशाही असलेला देश राहिला नाही

स्वीडनमधील व्ही-डेमोक्रसी नावाच्या एका संस्थेने लोकशाही बाबत एक अहवाल सादर केला आहे. या संस्थेच्या अहवालाचा हवाला देत राहुल गांधी यांनी, भारत आता हा लोकशाही असेलेला देश राहिला नसल्याचे मोठे वक्तव्य केले. त्यांनी एका वृत्ताचा स्क्रिनशॉट आपल्या ट्विटर अकाऊंटवरून करत हा दावा केला. 

ना प्रायव्हेट जॉब, ना बिझनेस... बेरोजगारीच्या संकटात तरुणांना हवीय सरकारी नोकरी 

दरम्यान, राष्ट्रीय निवडणूक सर्व्हेक्षण अहवालात २५ टक्के तरुणांनी बेरोजगारीची समस्या हा सर्वांत मोठा मुद्दा असल्याचे लोकसभा निवडणुकीवेळी सांगितल्याचे म्हटले आहे. देशभरातील राज्यांमध्ये रोजगाराच्या संधी कमी प्रमाणात उपलब्ध असल्या, तरी अधिकाधिक तरुण वर्ग सरकारी नोकरीसाठी असलेल्या परीक्षांची तयारी करत असल्याचे या सर्व्हेतून समोर आले आहे. तीनपैकी दोन तरुणांनी खासगी नोकरी, सरकारी नोकरी की स्वतःचा व्यवसाय या पर्यायांमधून सरकारी नोकरीचा पर्याय निवडला. तर १० पैकी एका तरुणाने खासगी नोकरीचा पर्याय निवडल्याचे या सर्व्हेमधून समोर आले आहे.  

टॅग्स :UnemploymentबेरोजगारीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार