शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

‘राज्यसभेत पहिल्यांदाच खासदारांना मारहाण करण्यात आली!' राहुल गांधींनी सरकारवर केले 'हे' गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 13:58 IST

यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरोप केला की, राज्यसभेत पहिल्यांदाच खासदारांना मारहाण करण्यात आली, बाहेरून लोकांना बोलावले गेले आणि खासदारांसोबत धक्का-बुक्की करण्यात आली. सभापतीची जबाबदारी सभागृह चालवण्याची असते. विरोधकांची बाजू सभागृहात का ठेवू शकत नाही? (Rahul gandhi attacks modi government)

नवी दिल्ली - संसदेचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर विरोधी पक्षांनी गुरुवारी संयुक्त मोर्चा काढला. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात डझनहून अधिक राजकीय पक्ष सहभागी झाले होते. यावेळी राहुल गांधी यांनी सरकारवर गंभीर आरोप केले, तसेच सभागृहात खासदारांसोबत गैरवर्तन झाल्याचेही ते म्हणाले. (Congress Leader Rahul gandhi attacks modi government parliament opposition march rajya sabha)

यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरोप केला की, राज्यसभेत पहिल्यांदाच खासदारांना मारहाण करण्यात आली, बाहेरून लोकांना बोलावले गेले आणि खासदारांसोबत धक्का-बुक्की करण्यात आली. सभापतीची जबाबदारी सभागृह चालवण्याची असते. विरोधकांची बाजू सभागृहात का ठेवू शकत नाही? 

राहुल गांधी म्हणाले, देशाचे पंतप्रधान आज देश विकण्याचे काम करत आहेत. देशाचा आत्मा दोन-तीन उद्योगपतींना विकला जात आहे. विरोधक संसदेत काहीही बोलू शकत नाहीत. देशातील 60 टक्के लोकांचा आवाज दाबला जात आहे, राज्यसभेत खासदारांशी गैरवर्तन करण्यात आले. आम्ही सरकारसोबत पेगासस मुद्द्यावर चर्चा करण्यासंदर्भात बोललो, आम्ही शेतकरी आणि महागाईचा मुद्दा उचलला. तसेच, ही लोकशाहीची हत्या आहे. असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.

राहुल गांधी यांच्याविरुद्ध दाखल याचिकेवर २७ सप्टेंबरला सुनावणी; 'ते' अकाउंट बंद केल्याचे ट्विटरने सांगितले 

जंतर-मंतरवर राहुल गांधी -काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी दिल्लीतील जंतर -मंतरवरही भाषण केले. यावेळी, आज देशात संविधानावर हल्ला होत आहे. नोटाबंदी-जीएसटी लागू करून नरेंद्र मोदी यांनी लघु उद्योग नष्ट केले, ते शेतकऱ्यांवर अत्याचार करतात, देशाच्या संसदेत प्रथमच खासदारांना मारहाण करण्यात आली, असे आरोपही राहुल गांधी यांनी केले.

विरोधी पक्षांची पत्रकार परिषद -विरोधी पक्षांच्या पक्षकार परिषदेत बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, राज्यसभेत काल मार्शल लॉ लावण्यात आला, असे वाटत होते, की आम्ही पाकिस्तानच्या सीमेवर उभे आहोत. सरकार रोजच्या रोज लोकशाहीची हत्या करत आहे. आम्ही या सरकारविरोधात लढत राहू. याशिवाय राजदचे मनोज झा, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि इतर विरोधी नेत्यांनीही सरकारवर हल्ला चढवत गंभीर आरोप केले.

वाद पेटला! राहुल गांधींच्या ट्विटर अकाऊंटनंतर आता काँग्रेसचंही अकाऊंट लॉक

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाParliamentसंसदRajya Sabhaराज्यसभाSanjay Rautसंजय राऊत