शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

'भारतात आता लोकशाही राहिली आहे का?', प्रियंका गांधींचा संतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 14:48 IST

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली - काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीवरून त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. भारतात आता लोकशाही राहिली आहे की नाही? असा सवाल प्रियंका गांधी यांनी विचारला आहे. जम्मू काश्मीरच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांना अद्यापही घरामध्ये नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. यावरून प्रियंका यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. 

प्रियंका गांधी यांनी बुधवारी (5 फेब्रुवारी) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. 'गेल्या 6 महिन्यांपासून जम्मू काश्मीरच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांना कोणत्याही गुन्ह्याशिवाय बंदिस्त करण्यात आलं आहे. लाखो लोकंही तिथं अडकली आहेत. सहा महिन्यांपूर्वी आम्ही हे सगळं किती दिवस चालणार हे विचारत होतो? मात्र भारतात आता लोकशाही राहिली आहे की नाही?' असं ट्विट प्रियंका यांनी केलं आहे. 

5 ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मीर खोऱ्यात लँडलाईन, इंटरनेट व एसएमएस सेवा बंद करण्यात आली होती. तसेच काही नेत्यांना नजरकैदेमध्ये ठेवण्यात आले होते. त्यातील काही नेत्यांची सुटका करण्यात आली होती. मात्र फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला आणि पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांना अद्यापही नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे.

प्रियंका गांधी यांनी काही दिवसांपूर्वी भाजपा सरकारवर निशाणा साधला होता. किरकोळ महागाई दरामध्ये मोठी वाढ झाली. ही वाढ गेल्या साडेपाच वर्षांतील उच्चांकी आहे. महागाईवरूनप्रियंका गांधी यांनी सरकारवर हल्लाबोल केला. भाजपा सरकारने जनतेचा खिसा कापून त्यांच्या पोटावर लाथ मारली असल्याचं प्रियंका गांधी यांनी म्हटलं होतं. 'भाजीपाला आणि खाण्याच्या पदार्थांचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. भाज्या, तेल, डाळ आणि पीठाचे दरही वाढले असल्याने गरिबांनी काय खायचं? मंदीमुळे लोकांना कामही मिळत नाही आहे' असं प्रियंका गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. 

महत्त्वाच्या बातम्या 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितला राम मंदिराच्या बांधणीचा प्लॅन, लोकसभेत केली मोठी घोषणा

राम मंदिरासाठी ट्रस्टची घोषणा करताच उद्धव ठाकरेंनी केले मोदींचे अभिनंदन

नरेंद्र मोदींच्या 'त्या' निर्णयासाठी राज ठाकरेंकडून अभिनंदन, व्यक्त केली अपेक्षा!

जवानांची सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढणार, CDS बिपीन रावतांचे संकेत

 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारतdemocracyलोकशाही