शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

राजकारण तापलं, प्रियांका गांधी ट्रॅक्टर रॅलीत मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना भेटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 08:25 IST

ट्रॅक्टर दूर्घटनेनंतर दिल्ली पोलिसांकडून एक व्हिडिओ जारी करण्यात आला होता. यात, आयटीओजवळील पोलीस बॅरिकेड तोडण्याच्या प्रयत्नात वेगात असलेले एक ट्रॅक्टर उलटल्याचे दिसत आहे. याच ट्रॅक्टरखाली नवरीत सिंग यांचा दबून मृत्यू झाला.

ठळक मुद्देट्रॅक्टर दूर्घटनेनंतर दिल्ली पोलिसांकडून एक व्हिडिओ जारी करण्यात आला होता.आयटीओजवळील पोलीस बॅरिकेड तोडण्याच्या प्रयत्नात वेगात असलेले एक ट्रॅक्टर उलटल्याचे दिसत आहे.याच ट्रॅक्टरखाली येऊन नवरीत सिंग यांचा दबून मृत्यू झाला.

नवी दिल्ली - प्रजासत्ताकदिनी दिल्ली येथे शेतकरी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान जीव गमावणाऱ्या नवरीत सिंग यांच्या मृत्यूवर राजकारण तापले आहे. काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी नवरीत सिंग यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी रामपूरयेथे जात आहेत. प्रियांका गांधींशिवाय आज राष्ट्रीय लोक दलाचे (आरएलडी) नेते जयंत चौधरीदेखील त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी जाणार आहेत. आज नवरीत सिंग यांचा अखेरचा 'अरदास' कार्यक्रम आहे. प्रियांका गांधी या कार्यक्रमात भाग घेणार आहेत. तसेच त्यांच्या कुटुंबीयांचे सांतवण करणार आहेत.

ट्रॅक्टर दूर्घटनेनंतर दिल्ली पोलिसांकडून एक व्हिडिओ जारी करण्यात आला होता. यात, आयटीओजवळील पोलीस बॅरिकेड तोडण्याच्या प्रयत्नात वेगात असलेले एक ट्रॅक्टर उलटल्याचे दिसत आहे. याच ट्रॅक्टरखाली येऊन नवरीत सिंग यांचा दबून मृत्यू झाला. छवविच्छेदनाच्या अहवालातही, नवरित सिंग यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे म्हणण्यात आले आहे.

"शेतकरी आंदोलन एक प्रयोग; ...तर लोक सीएए-एनआरसी अन् राम मंदिराचाही विरोध करतील"

लल्लू सिंहदेखील उपस्थित -प्रियांका गांधी अपल्या दिल्ली येथील निवासस्थानाहून निघाल्या आहेत. त्यांच्यासोबत गाड्यांचा मोठा ताफा ही आहे. याच ताफ्यात उत्तर प्रदेशकाँग्रेसचे अध्यक्ष लल्लू सिंह देखील उपस्थित आहेत. तसेच प्रियांका गांधी समर्थकदेखील त्यांच्यासोबत जात आहेत. NH-24 मार्गाने प्रियांका गांधी यूपीतील रामपूर येथे जात आहेत. 

मी शेतकऱ्यांना जाणतो, ते मागे हटणार नाहीत; सरकारलाच माघार घ्यावी लागेल : राहुल गांधी

गेल्या 26 जानेवारीला आंदोलक शेतकऱ्यांकडून कृषी कायद्याविरोधात ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीसाठी आंदोलक शेतकरी आणि पोलीस यांच्यात चर्चा होऊन मार्गही निश्चित करण्यात आले होते. मात्र, काही उपद्रवी मंडळी या मार्गाने न जाता, अक्षरधाम, आयटीओ मार्गे थेट लालकिल्ल्यापर्यंत पोहोचले. तेथे पोहोचताच त्यांनी एका सांप्रदायाचा झेंडाही तेथे लावला होता.

शेतकरी मागे हटणार नाहीत -"सरकार शेतकऱ्यांच्या समस्येचे निराकरण का करत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की ऑफर टेबलवर आहे. हा कायदा दोन वर्षांसाठी थांबवला जाऊ शकतो. या समस्येचे निराकरण केले गेले पाहिजे. मी  शेतकऱ्यांना चांगले ओळखतो. ते मागे हटणार नाहीत, सरकारलाचा मागे हटावे लागेल," असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

"आता बील मागे घेण्याची मागणी, गादी परत मागितली तर काय कराल?"; जिंद महापंचायतीत टिकैत यांची गर्जना

शेतकऱ्यांना धमकावण्याचे काम"सरकार शेतकऱ्यांना घाबरवण्याचे, धमकावण्याचे काम हे सरकारचे नाही. शेतकऱ्यांशी चर्चा करून त्याचे निराकरण करणे हे त्यांचे काम आहे, सरकार शेतकऱ्यांशी चर्चा का करत नाही. ही समस्या आपल्या देशासाठी चांगली नाही," असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसUttar Pradeshउत्तर प्रदेशFarmer strikeशेतकरी संप