शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
2
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
3
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
4
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
5
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
6
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
7
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
8
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
9
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
10
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
11
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
12
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
13
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
14
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
15
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
16
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
17
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
18
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
19
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
20
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
Daily Top 2Weekly Top 5

"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 16:14 IST

Pramod Tiwari : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद तिवारी यांनी तिरंगा यात्रेवरून भाजपावर हल्लाबोल केला आहे.

ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय जनता पक्षाकडून देशभरात तिरंगा यात्रा आयोजित केली जात आहे. आज लखनौमध्येही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भारत शौर्य तिरंगा यात्रेचं उद्घाटन केलं. आपल्या जवानांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. याच दरम्यान आता काँग्रेस नेत्याने यावरून भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद तिवारी यांनी तिरंगा यात्रेवरून भाजपावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी भाजपावर 'ऑपरेशन सिंदूर'चा राजकीय फायदा घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे. दहशतवादाविरुद्धच्या या लढाईत काँग्रेसचा पाठिंबा देशाच्या सैन्यासोबत होता आणि भविष्यातही राहील असंही म्हटलं आहे. 

दहशतवादाविरुद्धच्या या लढाईत काँग्रेस भारतीय सैन्यासह सरकारसोबत खंबीरपणे उभी आहे असं प्रमोद तिवारी यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी केंद्रातील मोदी सरकारकडे लवकरच विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली. "पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली लवकरच सर्वपक्षीय बैठक बोलावली पाहिजे. जेणेकरून ऑपरेशन सिंदूर ज्या पद्धतीने मध्येच थांबवण्यात आले आणि युद्धबंदी जाहीर करण्यात आली त्यानंतर विरोधकांच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील."

"विरोधकांना जाणून घ्यायचं आहे की, आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?" असा सवाल प्रमोद तिवारी यांनी विचारला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर देशभरात भाजपा शौर्य तिरंगा यात्रा काढली जात आहे. उत्तराखंडची राजधानी लखनौमध्येही आज मुख्यमंत्री धामी यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा यात्रा काढण्यात आली. ज्यामध्ये लोकांनी उत्साहाने सहभाग घेतला. 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndian Armyभारतीय जवान