शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
3
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
4
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
5
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
6
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
7
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
8
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
9
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
10
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
11
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
12
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
13
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
14
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
15
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
16
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
17
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
18
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
19
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
20
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल

दीड वर्षापासून काँग्रेसला अध्यक्ष नाही, अशी कुठली पार्टी चालते का? काँग्रेसच्या बड्या नेत्याचा घरचा आहेर

By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 22, 2020 5:06 PM

"राहुल गांधी यांनी, आपल्याला पक्षाध्यक्ष राहण्याची इच्छा नाही, असे म्हटल्यापासून ते आतापर्यंत काँग्रेसला अध्यक्ष नाही. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही माहीत नाही, की त्यांना भविष्यात नेमके काय करायचे आहे?"

नवी दिल्ली -काँग्रेसमध्ये सक्रीय नेतृत्वावरून सुरू असलेला कलह थांबण्याचे नाव नाही. पक्षाचे खासदार तथा काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून असहमती दर्शवणाऱ्या 23 नेत्यांपैकी एक असलेले कपिल सिब्बल (Congress leader kapil sibal) यांनी पुन्हा एकदा या मुद्यावर भाष्य केले आहे. काँग्रेस आता प्रभावशाली विरोधी पक्ष राहिला नाही. दीड वर्षांपासून पक्षाला अध्यक्ष नाही. अशी कुठली पार्टी चालते का? असा प्रश्न  सिब्बल यांनी उपस्थित केला आहे.

इंग्रजी वृत्त वाहिनी ‘India Today’ला दिलेल्या मुलाखतीत, पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्याशी बोलताना सिब्बल म्हणाले, राहुल गांधी यांनी, आपल्याला पक्षाध्यक्ष राहण्याची इच्छा नाही, असे म्हटल्यापासून ते आतापर्यंत काँग्रेसला अध्यक्ष नाही. या गोष्टीला साधारणपणे दीड वर्ष झाले आहे. एखादा पक्ष दीड वर्ष नेत्याशिवाय चालू शकतो? काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही माहीत नाही, की त्यांना भविष्यात नेमके काय करायचे आहे अथवा कुठे जायचे आहे.

सिब्बल म्हणाले, नुकत्याच झालेल्या निवडणुकीवरून समजते, की उत्तर प्रदेश शिवाय, जेथे काँग्रेस फॅक्टर नाव्हता, एवढेच काय, पण गुजरात आणि मध्य प्रदेशातही जेथे काँग्रेसची भाजपसोबत थेट लढत होती, निकाल अत्यंत खराब राहिला.

“गुजरातमध्ये आमचा सर्वच्या सर्व आठही जागांवर पराभव झाला. 65 टक्के मते भाजपच्या खात्यात गेले. मात्र, ही काँग्रेसमधील पक्षांतर करणाऱ्या नेत्यांनी रिक्त केलेल्या जागा होत्या. मध्य प्रदेशात काँग्रेसच्या पक्ष बदलणाऱ्या नेत्यांमुळे सर्व 28 जागा रिक्त झाल्या होत्या. पण काँग्रेसला यैंपैकी केवळ आठ जागाच जिंकता आल्या,” असे सिब्बल म्हणाले.

जुलै महिन्यात झालेल्या पक्षाच्या संसदीय गटाच्या बैठकीत हे मुद्दे उपस्थित केले होते. यानंतर 23 नेत्यांनी सोनिया गांधी यांना ऑगस्ट महिन्यात पत्रही लिहिले. मात्र, त्यावर कसल्याही प्रकारची ना चर्चा झाली, ना हा मुद्दा घेऊन कुणी पुढे गेले, असेही सिब्बल म्हणाले. नुकताच, सिब्बल यांच्यावर काही मंडळींनी निशाणा साधला असतानाच, त्यांनी हे वक्तव्य केले आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी तर, पक्षांतर्गत समस्या त्यांनी माध्यमांत बोलू नये, असे म्हटले होते. 

टॅग्स :kapil sibalकपिल सिब्बलcongressकाँग्रेसIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधी