शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी भाजपाच्या माजी मुख्यमंत्र्यांची घरी जाऊन मागितली माफी, नेमकं कारण काय?   

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 12:02 IST

Jairam Ramesh : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी मानहानीच्या एका प्रकरणात भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांची माफी मागितली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी मानहानीच्या एका प्रकरणात भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांची माफी मागितली आहे. हल्लीच जयराम रमेश यांनी धुमल यांच्या घरी जाऊन त्यांची लेखी माफी मागितली. याबाबतचा खटला हिमाचल प्रदेशच्या उच्च न्यायालयामध्ये विचाराधीन आहे.

याबाबत माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांनी सांगितले की, सुमारे १० दिवसांपूर्वी मानहानीच्या प्रकरणाची सुनावणी हिमाचल हायकोर्टामध्ये होती. त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी हायकोर्टामध्ये मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर जयराम रमेश हमीरपूर येथे आले. तिथे झालेल्या भेटीवेळी जयराम रमेश यांनी त्यांनी केलेल्या विधानांबाबत माफी मागितली. तसेच मी जे काही आरोप केले ते सर्व निराधार असल्याचे सांगितले.  त्यांनी माफी मागताना यापुढे त्यांच्याकडून अशी चूक होणार नाही, असे सांगितले.

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी २ ऑगस्ट २०१५ रोजी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन माजी मुख्यमंत्री प्रेम कुमार धुमल आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यावर आरोप केले होते. धर्मशाला येथील क्रिकेट स्टेडियमसाठी या दोघांनी जमीन हडप केली, त्यामुळे राज्याचं १०० कोटी रुपयांचं नुकसान झालं, असा आरोप रमेश यांनी केला होता. त्यावेळी अनुराग ठाकूर हे हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते.

दरम्यान, रमेश यांनी केलेल्या आरोपांविरोधात प्रेमकुमार धुमल यांनी हिमाचल प्रदेशमधील हायकोर्टात १०० कोटी रुपयांची मानहानीची याचिका दाखल केली होती. त्यानंतर कोर्टात अनुपस्थित राहिल्याने जयराम रमेश यांना कोर्टाने ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यानंतर रमेश यांनी आपण स्वत: याविषयी धुमल यांच्याशी बोलू, असे न्यायाधीशांना सांगितले. त्यानंतर जयराम रमेश यांनी हमिरपूर येथे जात धुमल यांची भेट घेतली. त्यानंतर माफी मागत या संपूर्ण प्रकरणावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला. 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाHimachal Pradeshहिमाचल प्रदेशIndiaभारत