शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी भाजपाच्या माजी मुख्यमंत्र्यांची घरी जाऊन मागितली माफी, नेमकं कारण काय?   

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 12:02 IST

Jairam Ramesh : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी मानहानीच्या एका प्रकरणात भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांची माफी मागितली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी मानहानीच्या एका प्रकरणात भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांची माफी मागितली आहे. हल्लीच जयराम रमेश यांनी धुमल यांच्या घरी जाऊन त्यांची लेखी माफी मागितली. याबाबतचा खटला हिमाचल प्रदेशच्या उच्च न्यायालयामध्ये विचाराधीन आहे.

याबाबत माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांनी सांगितले की, सुमारे १० दिवसांपूर्वी मानहानीच्या प्रकरणाची सुनावणी हिमाचल हायकोर्टामध्ये होती. त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी हायकोर्टामध्ये मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर जयराम रमेश हमीरपूर येथे आले. तिथे झालेल्या भेटीवेळी जयराम रमेश यांनी त्यांनी केलेल्या विधानांबाबत माफी मागितली. तसेच मी जे काही आरोप केले ते सर्व निराधार असल्याचे सांगितले.  त्यांनी माफी मागताना यापुढे त्यांच्याकडून अशी चूक होणार नाही, असे सांगितले.

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी २ ऑगस्ट २०१५ रोजी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन माजी मुख्यमंत्री प्रेम कुमार धुमल आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यावर आरोप केले होते. धर्मशाला येथील क्रिकेट स्टेडियमसाठी या दोघांनी जमीन हडप केली, त्यामुळे राज्याचं १०० कोटी रुपयांचं नुकसान झालं, असा आरोप रमेश यांनी केला होता. त्यावेळी अनुराग ठाकूर हे हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते.

दरम्यान, रमेश यांनी केलेल्या आरोपांविरोधात प्रेमकुमार धुमल यांनी हिमाचल प्रदेशमधील हायकोर्टात १०० कोटी रुपयांची मानहानीची याचिका दाखल केली होती. त्यानंतर कोर्टात अनुपस्थित राहिल्याने जयराम रमेश यांना कोर्टाने ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यानंतर रमेश यांनी आपण स्वत: याविषयी धुमल यांच्याशी बोलू, असे न्यायाधीशांना सांगितले. त्यानंतर जयराम रमेश यांनी हमिरपूर येथे जात धुमल यांची भेट घेतली. त्यानंतर माफी मागत या संपूर्ण प्रकरणावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला. 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाHimachal Pradeshहिमाचल प्रदेशIndiaभारत