शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

...तर ऐका मोदीजी, काँग्रेसनं 70 वर्षांमध्ये काय काय केलं; काँग्रेसचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 08:53 IST

काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांचं पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर

लखनऊ: काँग्रेसनं 70 वर्षांमध्ये काय केलं, असा प्रश्न नरेंद्र मोदी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांपासून सव्वासो करोड देशवासीयांना विचारत आहेत. त्यांच्या या प्रश्नाला काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्हाला सत्तेत येऊन पावणे पाच वर्ष झाली. तरीही काँग्रेसनं 70 वर्ष काय केलं, हाच प्रश्न तुम्ही विचारता, असं म्हणत आझाद यांनी स्वातंत्र्यापासून काँग्रेसनं केलेल्या कामांची यादीच दिली.काँग्रेसनं आतापर्यंत काय काय केलं, हे एकदा ऐकाच मोदीजी. तुम्ही ज्या देशाचे पंतप्रधान आहेत, ज्याला आपण भारत म्हणतो, त्या देशाच्या स्वातंत्र्यात काँग्रेसचं योगदान मोठं आहे. गांधीजींच्या नेतृत्त्वाखाली आम्ही इंग्रजांविरुद्ध संघर्ष केला. जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरु देशाचे पंतप्रधान झाले, तेव्हा देश अनेक तुकड्यांमध्ये विभागलेला होता. त्याला काँग्रेसनं एकसंध रुप दिलं. तुम्ही आज एका तुकड्याचे पंतप्रधान नाहीत. याचं श्रेय काँग्रेसला जातं, असं प्रत्युत्तर आझाद यांनी दिलं.आम्ही एका धर्मनिरपेक्ष राष्ट्राची निर्मिती केली. या देशाला एक अशी घटना दिली, की त्यामुळे सर्वांना स्वातंत्र्य आणि समानता मिळालं. दलित, शोषित आणि शेतकऱ्यांसाठी फार काम झालं नाही, असं मोदी म्हणतात. मी त्यांना सांगू इच्छितो, गांधीजींनी स्वातंत्र्य मिळण्याआधीच दलितांच्या हक्कासाठी संघर्ष सुरू केला होता. आम्ही घटनेची अंमलबजावणी सुरू करताच दलितांना आरक्षण दिलं. त्यांना शिष्यवृत्ती दिली. त्यांच्या प्रगतीसाठी कायदे केले. अस्पृश्यतेविरोधीत कायद्याची निर्मिती केली. यानंतरही तुम्ही आम्हालाच विचारता काय केलं? आम्ही घटनेच्या आधारे देश चालवला. धर्माच्या नावानं देश चालवला नाही, अशा शब्दांमध्ये काँग्रेसच्या कार्यकाळात झालेल्या कामांचा उल्लेख आझाद यांनी भाजपावर हल्ला चढवला. राहुल गांधींच्या सूचनेवरुन आम्ही जमीन अधीग्रहण कायदा केला. आश्वासनं द्यायची आणि मग ती सोयीस्करपणे विसरुन जायची, असं भाजपासारखं राजकारण आम्ही करत नाही. काळ्या पैशाचं काय झालं? रोजगार संधींचं काय झालं? शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणार होतात. त्याचं काय झालं? आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. सत्तेवर येताच अवघ्या काही तासांमध्ये आश्वासनांची पूर्तता केली. सध्या आम्ही जाहीरनाम्यावर काम करत आहोत. लवकर तो जनतेसमोर आणू, असं आझाद यांनी पत्रकारांना सांगितलं.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस