शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

130 कोटी जनता हिंदूच या वक्तव्याप्रकरणी मोहन भागवतांविरोधात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 8:47 PM

'मोहन भागवत यांच्या वक्तव्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता'

हैदराबाद : काँग्रेसचे वरिष्ठ नेता व्ही. हनुमंता राव यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. मोहन भागवत यांनी 130 कोटी भारतीयांना हिंदू म्हणून लोकांच्या भावनांचा अवमान केला आहे, असे व्ही. हनुमंता राव यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. मोहन भागवत यांच्या या वक्तव्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असून हे  हैदराबादमधील कायदा-सुव्यवस्थेसाठी योग्य नाही, असे व्ही. हनुमंता राव यांनी म्हटले आहे.

येथील एलबी पोलीस ठाण्यात व्ही. हनुमंता राव यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक रेड्डी यांनी या तक्रारीबाबत दुजोरा दिला आहे. काँग्रेस नेते व्ही. हनुमंता राव यांच्याकडून यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र, याप्रकरणी खटला दाखल होऊ शकतो की नाही, याबाबत कायदेशीर सल्ला घेण्यात येत असल्याची माहिती अशोक रेड्डी यांनी दिली आहे. 

दरम्यान, गेल्या चार दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी हिंदुत्वासंदर्भात मोठे वक्तव्य केले होते. संघाच्या दृष्टीकोनातून देशातील 130 कोटी जनता हिंदूच आहे. देशातील लोकांची धर्म आणि संस्कृती काहीही असो ते हिंदूच आहेत, असे विधान मोहन भागवत यांनी केले होते. तसेच, जे लोक राष्ट्रवादी आहेत. भारतीय संस्कृतीचा सन्मान करतात ते सर्व हिंदू आहेत. संपूर्ण समाज आपलाच असून सर्वांना एकत्र करण्याची संघाची इच्छा आहे, असेही मोहन भागवत यांनी म्हटले होते. ते हैदराबाद येथील विजय संकल्प कार्यक्रमात बोलत होते. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतcongressकाँग्रेस